Girish Bapat Vs Mohan Joshi : पुणेकरांनी पाठविले दिल्लीत खा. बापट अडकले गल्लीत : लोकसभा निवडणुकीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन जोशी यांनी उडवली खिल्ली

Categories
Breaking News Political पुणे

पुणेकरांनी पाठविले दिल्लीत खा. बापट अडकले गल्लीत

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागत नाही अशा तक्रारी म्हणजे अपयशाची खासदार गिरीश बापट यांची कबुली आहे. महापालिकेत सत्ताअसताना झोपा काढल्यात का ? असा सवाल माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. लोकसभेचे अधिवेशन चालू असतानाही भाजपचे खासदार गिरीश बापट संसदेत गैरहजर आहेत. पुणेकरांनी त्यांना दिल्लीत पाठविले पण, ते गल्लीतच अडकले अशी अवस्था त्यांची आणि त्यांच्याबरोबर भाजपची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

: समान पाणी पुरवठा योजना ५ वर्ष झोपा काढल्या का ?

पुण्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसद अधिवेशन चालू असताना दिल्लीत राहाणे अपेक्षित आहे. अधिवेशन काळात सर्व खात्यांचे मंत्री, सचिव सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणे सोपे जाते. परंतु, खासदार गिरीश बापट दिल्लीत न जाता पुण्यातच थांबले आहेत आणि त्यांनी आपले आणि आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी चालविली आहे. समान पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने बापट यांनी महापालिका प्रशासनावर राग काढलेला आहे. भाजपने ही योजना प्रतिष्ठेची केली. पण, हातात सत्ता असूनही गेल्या पाच वर्षात भाजप ही योजना मार्गी लावू शकलेले नाही आणि आता योजनेच्या कामाला गती मिळत नाही अशी आगपाखड चालू केलेली आहे. आधीची पाच वर्षे बापटांकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते, आता ते खासदार आहेत या सर्व कालावधीत त्यांनी ही योजना मार्गी लावली असती तर, त्यांना दिल्ली सोडून पुण्यातच स्टंटबाजी करत अडकून पडावे लागले नसते, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

: बापटसाहेब,अपयशाब द्दल पुणेकरांना माफीपत्रं पाठवा

समान पाणीपुरवठा योजनेला सहकार्य करा याकरिता माजी नगरसेवकांना आवाहन करणारे पत्र खासदार गिरीश बापट पाठविणारा आहेत. भाजपच्या १०० नगरसेवकांना ‘आजी’ असताना जे जमले नाही ते आता ‘माजी’ झाल्यावर जमणार आहे का? सर्वच प्रकार हास्यास्पद आहे. नदीसुधार प्रकल्प, स्मार्टसिटी प्रकल्प अशा अनेक योजना पूर्ण करण्यात भाजपला अपयश आलेले आहे. वास्तविक या अपयशाबद्दल माफी मागणारी पत्रं खासदार बापट यांनी पुणेकरांना पाठवायला हवीत. पुणेकरांनी तुम्हाला दिल्लीत पाठवलंय, तेव्हा दिल्लीत जा, प्रश्न मार्गी लावा, आपल्या लोकांकडून कामें पूर्ण करुन घ्या, स्टंटबाजी थांबवा. या स्टंटबाजीला पुणेकर आणि तुमच्याच पक्षातील अनेकजण कंटाळले आहेत याचा विचार करा, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

24*7 Water Project : 24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही!  : राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे

Categories
Breaking News PMC पुणे

24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही!

: राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे

पुणे : महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा समतोल करण्यासाठी समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 (Water project) योजना हाती घेतली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र ही योजना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्याच्या प्रधान सचिवांनी या कामाबाबत महापालिकेचे वाभाडे काढले आहेत. महापालिका या कामाबाबत गंभीर नाही. (PMC is not much serious about this project) शिवाय महापालिकेने या योजनेबाबत प्रचंड उशीर केला आहे. ( Badly delayed project) अशा शब्दात प्रधान सचिवांनी महापालिकेला सुनावले आहे.

समान पाणीपुरवठा योजनेला अमृत अभियान अंतर्गत निधी मिळाला आहे. अमृत अभियानांतर्गत शहरास मंजूर करण्यात आलेले प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यासंदर्भात  v.C. द्वारे  आढावा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या 24*7 योजनेबाबत चर्चा झाली. त्यावेळी बैठकीत महापालिकेच्या चुका दाखवून देण्यात आल्या.

: या दाखवून दिल्या चुका

1. हा प्रकल्प किंवा या प्रकल्पातील बदल पूर्ण करण्याबाबत पुणे महापालिका फारशी गंभीर नाही
  2. प्रकल्प अत्यंत विलंबित
 3. गेल्या 10 महिन्यांत नगण्य भौतिक आणि आर्थिक प्रगती.
 4. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पीएमसी प्रकल्पाच्या घटकांची पुनरावृत्ती करेल आणि मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करेल. याबाबत दक्ष असावे.

: प्रधान सचिवांनी महापालिका आयुक्तांना काय दिले आदेश?

दरम्यान याबाबत प्रधान सचिवांनी आता महापालिका आयुक्तांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार  कार्यवृत्तामध्ये नमूद केल्यानुसार सर्व मुद्यांबाबत कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल याची व्यवस्था करावी. तसेच, आपण सदर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्येक १५ दिवसातून एकदा या प्रकल्पांचा उपांगनिहाय आढावा घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणीचे निराकरण करावे. प्रकल्पामधील बिल रेकॉडींग व बिल प्रदानाची कार्यवाही वेळोवेळी केली जाईल व त्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे. सदर प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करणे ही बाब आपल्या २०२१-२२ च्या कार्यमुल्यांकन अहवालासाठी उद्दीष्ट म्हणून विचारात घेण्यात येईल. आपण सदर वरील प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये व्यक्तिगत लक्ष देऊन हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण होतील, याची सर्वंकष दक्षता घ्यावी.

Deepali Dhumal : महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे? : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे?

विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल

पुणे : पुणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे त्यामध्य यामध्ये २४ X 7 या पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल .ॲन्ड.टी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे लाईनचे काम सुरू आहे. या कामांमध्ये महापालिकेचे संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही.शहरातील चांगले चांगले रस्ते त्या ठिकाणी खोदले जातात. या मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन, पावसाळी लाईट, ड्रेनजच्या लाईने तोडफोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत आहे.अशाप्रकारचे वारजे भागामध्ये एल अँड टी च्या माध्यमातून पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकारी व एल अँड टी च्या अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष ते करत आहेत. महापालिकेचे संबंधित अधिकारी व एल अँड टी चे कर्मचारी यांच्यामध्ये काय साटेलोटे असल्याचे नागरिकांमध्ये संशय निर्माण होत आहे. असा आरोप विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र देखील दिले आहे.

आंदोलनाचा इशारा

धुमाळ यांच्या पत्रानुसार वारजे भागामध्ये अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाइनची तोडफोड करुन दूषित पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. हा पाणीपुरवठा लाईन फुटल्यानंतर त्वरित याची दुरुस्ती केली जात नाही. दोन ते चार दिवस पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांना पुरवठा होत आहे. आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती होत नाही व याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे महापालिकेच्या वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन सुध्दा दुर्लक्ष करीत आहेत . त्यामुळे आपणास विनंती की एल अँड टी चे अधिकारी व महापालिकेचे संबंधित कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर पोलीस कारवाई व कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व नागरिकांना आंदोलन करण्या शिवाय गत्यंतर नाही. अन्यथा आम्ही नागरिकांसमवेत एल अँड टी अधिकारी व संबंधित महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे धुमाळ यांनी पत्रात म्हटले आहे.