Canal Advisory Committee : समान पाणी पुरवठा योजनेमुळे पुण्याला असमान पाणीपुरवठा : कालवा सल्लागार समिती बैठक : खासदार गिरीश बापटांचा सभात्याग 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कालवा सल्लागार समिती बैठक : खासदार गिरीश बापटांचा सभात्याग

: समान पाणी पुरवठा योजनेमुळे पुण्याला असमान पाणीपुरवठा

: महापालिका प्रशासनला  देखील करावे लागले मान्य

पुणे : पुणे शहरात पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. सगळ्या धरणातून मुबलक पाणी मिळून देखील पुण्याला पाणी प्रश्न भेडसावत आहे. यावरून आजच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट यांना सभात्याग करावा लागला. तर महापालिका प्रशासनाने मान्य केले कि मुबलक पाणी मिळते आहे. मात्र समान पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहराला असमान पाणी मिळत आहे. यावरून तथा समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी शहराला समान पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.

: गेल्या ४० वर्षात मी कधी सभात्याग केला? : गिरीश बापट

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट संतापलेले पाहायला मिळाले. बापट म्हणाले प्रशासनाला पळता भुई थोडी करू. सोडणार नाही कोणाला.  आयुक्तांच्या घरी जाऊन त्याच्या घरात नळाला किती प्रेशरने पाणी येते त्याची पाहणी करणार. काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा ,कसबा ,नाना, नारायण पेठेत पाणी का नाही ? प्रशासनाचा गलथान कारभार खपवून घेणार नाही. प्रशासनाला वाटतंय , लोकप्रतिनिधी नाही ,आम्हाला रान मोकळ झालंय. ३ दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर आम्ही रस्त्यावर घेऊन येऊ नागरिकांना. मी ४० वर्षात कधी बैठकीतून सभात्याग केलाय,  असा प्रश्न देखील खासदार बापट यांनी विचारला.

: प्रशासनाने दिली कबुली

खासदार बापट यांच्यासोबत आमदार चेतन तुपे यांनी देखील पाणी प्रश्नांवर तक्रार केली. तुपे यांनी भामा आसखेड मधून ज्यादा पाणी घेण्याची सूचना केली. त्यावर महापालिका आणि पाटबंधारे च्या  अधिकाऱ्यांनी उत्तर दिली. पाटबंधारे च्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि आम्ही पाणी कमी केले नाही. पालिकेला पर्याप्त पाणी मिळत आहे. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि धरणातून मुबलक पाणी मिळत आहे, मात्र समान पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे वितरण व्यवस्थेत त्रुटी निर्माण होत आहेत. त्यामुळे कमी पाणी मिळत आहे. लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल. असे आश्वासन यावेळी पालिका अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

: २४*७ योजनेवरून प्रधान सचिवानी देखील महापालिकेला टोकले होते

समान पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या ५ वर्षापासून सुरु आहे. मात्र तरीही योजनेचे काम पूर्ण झाले नाही. समान पाणी पुरवठा होण्याची गोष्ट तर दूरच आहे. दरम्यान नुकतेच राज्य सरकारने देखील पालिकेच्या या योजनेचे वाभाडे काढले होते. प्रधान सचिव महेश पाठक यांनी या योजनेवरून महापालिकेला टोकले होते. त्यामुळे आता तरी पालिका यात लक्ष घालणार का, हा प्रश्न निर्माण होत आहे.

: पुणे शहरात सर्वत्र समान पाणी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. पुणे शहरातही महानगरपालिकेने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ टीएमसी पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री  पवार यांनी जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी, परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.

पवार पुढे म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पाचे पुणे शहरासाठी निश्चित केलेल्या पाण्यापैकी दैनंदिन सुमारे ७५ एमएलडी पाणी उचलले जात नाही. ते पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाईपलाईन, पंपींग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत, जेणेकरुन खडकवासला प्रकल्पावरील तेवढा ताण कमी होईल. महानगरपालिकेने १०० टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात पाण्याच्या अडचणींबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत तसेच सुरू असलेली कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत. नवीन पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन आदी कामे हाती घेताना ही कामे तुकडे (पॅकेजेस) करुन केल्यास एकाच वेळी कामे सुरू होऊन लवकर पूर्ण होतील, असेही  पवार म्हणाले.

 

Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही

: पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी

पुणे : शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात(Water supply) कोणतीही कपात करण्यात येणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खडकवासला प्रकल्पात सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि शहरातील पाण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहूल कूल, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते. खडकवासला प्रकल्पामधून इंदापूर, दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यातील सिंचनासोबत काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. परंतु उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पामधील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.भामा आसखेड धरणामधून जेवढे पाणी घेतले जात आहे, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पामधून कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत. कामे होतील त्यानुसार खडकवासलामधून पाणी कमी करू, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

 

तर, यंदा धरणात पाणी कमी असल्यामुळे महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असा मुद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडला. आळंदीला दोनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, महापालिकेने स्वतंत्रपणे हे पाणी द्यावे, असा नियम नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्पातून शेतीला आवर्तने देताना शहराची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, ही आमची भूमिका होती. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले, याचे समाधान आहे. शहरात नवीन समाविष्ट २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरेसे पाणी मिळणे आवश्यकच होते. पाणीगळती रोखण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिवाय २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु असून, लवकरच पूर्ण करणार आहोत.

         – मुरलीधर मोहोळ, महापौर