Dharur Ratna Award | वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dharur Ratna Award | वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव

Dharur Ratna Award | सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार (Tree Friend Arun Pawar) यांचा धारूर ग्रामस्थ आणि ज्ञानलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीने ‘धारूररत्न पुरस्कार’ (Dharur Ratna Award) देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. (Dharur Ratna Award)
           यावेळी प्रा. रत्नाकर खांडेकर, डॉ. श्रीराम नरवडे, सरपंच बालाजी पवार, समाजसेवक गणेश गुरव, प्रा. अण्णा गरड, मधुकर कदम, जयसिंग कदम पाटील, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, श्री श्री रविशंकर यांचे शिष्य प्रशांत संगपाळ, जगदीश पाटील, तुषार पवार, श्रीराम कदम, तानाजी खांडेकर, विशाल पवार, महेश गुरव, बालाजी गुरव, कुलदीप पवार, बालाजी पाटील, अभिजित कामटे, बाळासाहेब कोरे, प्रमोद पवार, महेश गडदे आदी उपस्थित होते.
          वैभव कदम यानी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल, धारूर गावात प्रथम महिला डॉक्टर होण्याचा मान डॉ. श्वेता शिंदे यांनी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये प्रथम, द्वितीय, त्रितीय क्रमांक प्राप्त केलेल्या अमृता गुरव, आर्या शिंदे, सई सुर्यवंशी, पायल कोरे या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन वृक्षमित्र अरूण पवार व डॉ. श्रीराम नरवडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. श्रीराम नरवडे यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव केला. पवार यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दहावीनंतर पिंपरी चिंचवड शहरात मिळेल ते काम करून बांधकाम व्यवसायात नाव कमावले. व्यवसाय करताना समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला. तसेच त्यांनी धारूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे बांधकाम केले, गावात स्वागत कमान बांधली, तसेच दुष्काळी परिस्थितीत गावात पाण्याची सोय, जनावरांना चारा, विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा पुरविली. तसेच हजारो वृक्ष लागवड करून ती जोपासली आहेत, असेही ते म्हणाले.
         प्रास्ताविक दयानंद शिंदे यांनी, सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कामटे यांनी, तर आभार गणेश गुरव यांनी मानले.
——
News Title | Tree friend Arun Pawar honored with ‘Dharur Ratna Award’

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

| मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Marathwada Muktisangram | यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामास (Marathwada Muktisangram) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि शासकीय कार्यालयात 75 हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत, अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Dharashiv Collector Dr Sachin Ombase) यांनी दिली. (Marathwada Muktisangram)
             स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. गोदभरले, जिल्हा माहिती अधिकारी यासीरुद्दीन काझी, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, विवेक भोसले मुरलीधर होनाळकर, भाऊसाहेब उमाटे, डॉ. सतीश कदम, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते. (Marathwada Muktisangram Din)
            यानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅली, प्रभात फेरी, तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित व स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. 75 हजार रोपांचे वृक्षारोपण व जिल्ह्यातील 75 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Marathwada Muktisangram Divas)
            याबरोबरच मौजे हिप्परगा येथील शाळेतील स्मारकाभोवती संरक्षक भिंत उभी करणे, मौजे इट येथे कार्यक्रम घेणे, तुळजापूर येथे शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करणे. नळदुर्ग, गुंजोटी,देवधानोरा, मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहिद झालेले आपसिंगा येथील हुतात्मा श्रीधर वर्तक यांची 5 जुलै रोजी जयंती साजरी करणे, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन आरोग्य तपासणी करणे, उस्मानाबाद येथे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करणे, मौजे चिलवडी येथे स्मृतीस्तंभ उभारणे, 17 सप्टेंबर रोजी सर्व गावांमध्ये दीपोत्सव साजरा करणे, तसेच मराठवाड्यातील जी 52 गावे सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट आहेत, त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करणे आदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
——
News Title | Marathwada Muktisangram |  The Amrit Mahotsav of Marathwada Liberation War will be celebrated this year with various activities

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)