Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News Education Political देश/विदेश पुणे

क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लेखन पॅड आणि कंपास साहित्य भेट दिले. तसेच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. दहावी, बारावी झाल्यानंतर आता मागे पाहायचे नाही. नंतरच्या शिक्षणात तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर सांगा आपण ती नक्की सोडवू. शिकून आपल्याला चांगले काम करायचे आहे. ही जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.” यावेळी तुषार पाटील, क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेच्या मुख्याध्यापिका संकपाळ मॅडम, सतीश साठे, सीमा खेडेकर, विक्रम खेनट यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थिती होते.

Raj’s interaction with students | राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! | काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी? 

Categories
Breaking News Political पुणे

राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी?

पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला काही अंध विद्यार्थी उपस्थित होते. ठाकरेंनी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बसवले.  अंध विद्यार्थ्यांनी राज ठाकरे कडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. दरम्यान व्यासपीठावर सभा झाल्यानंतर राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी याल का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी सांगितले कि आम्ही कुठेही यायला तयार आहोत.

राज यांच्या प्रत्येक भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची असून त्यांनी महागाई, गॅस दरवाढ अशा मुद्दयांना हात घातला पाहिजे असे मत या अंध तरुणांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, लहानापासूनच राज यांची भाषण ऐकत आलो आहे. राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आक्रमक दाखवणारे दुसरे नेतृत्व नाही. बाळासाहेबानंतर राज साहेबच राज्याचा विकास करू शकतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.

सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे 

आम्हाला त्यांचे  मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटतात. अयोद्धेबाबत ते आज बोलणार आहेत. त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस  नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला आहे.