Helmet : RTO : PMC : हेल्मेट न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई  : कारवाईत दुजाभाव केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC पुणे

हेल्मेट न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

: कारवाईत दुजाभाव केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने हेल्मेट न घालणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज सकाळी ही कारवाई पुणे महापालिकेत झाली. मात्र या कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप महापालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणेकरांवर हेल्मेट सक्ती लादण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याला विरोध झाल्याने ही सक्ती माघारी घ्यावी लागती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले होते कि ही सक्ती फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असेल. त्यानुसार वाहतूक विभागाने देखील ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुणे महापालिकेत केली. सकाळी 9:30 वाजताच वाहतूक विभागाचे कर्मचारी महापालिकेच्या इन गेटवर थांबून करू लागले. ज्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात महापालिकेचे ID कार्ड होते, त्यांच्यावरच फक्त ही कारवाई होत होती. ज्यांच्याकडे ID नव्हते त्यांना मात्र सोडून देण्यात येत होते. शिवाय pmp डेपोकडील बाजूने जे कर्मचारी प्रवेश करत होते, तिकडे मात्र वाहतूक विभागाचे कुणीही नव्हते. याबाबत मात्र कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेल्मेट च्या दंडाशिवाय आधीच्या मोडलेल्या नियमांचे देखील पावत्या केल्या गेल्या. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना 5 हजार पर्यंत दंड भरावा लागला. हे सगळं होत असताना मात्र गेटवर उभे असलेले सुरक्षा कर्मचारी याचा चांगलाच आनंद घेत होते.

Helmets are not mandatory : पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती नाही; फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News social पुणे

पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती नाही; फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 

 : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 

पुणे:  पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती आताच लागू नाही, असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. काल जे परिपत्रक काढलं त्यात पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच हेल्मेटसक्ती असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं प्रबोधन झाल्यानंतरच सर्वसामान्यांचं प्रबोधन केलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

 काल हेल्मेट (Pune Helmet) वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आदेश देण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांना हेल्मेटसक्तीचा समज झाला होता, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी म्हटलंय.

जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती राहणार नाही. परंतु हेल्मेट परिधान करण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरताना हेल्मेट घातले नसल्यास शिक्षेस पात्र राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ३१ मार्च रोजी जारी केले होते.या संदर्भात डॉ. देशमुख म्हणाले, जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती केलेली नाही. परंतु दुचाकी वाहन चालवताना नागरिकांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. दरम्यान, हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येकी ४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचे ५ गट तयार करण्यात आले आहेत. ते अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याचे फायदे समजून सांगणार आहेत. ही मोहीम शुक्रवार (ता.१) एप्रिलपासून नियमित राबवण्यात येणार आहे.

Helmet compulsory : पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती! : ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती!

: ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे

पुणे: पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती होणार आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. हे आदेश १ तारखेपासून लागू होणार आहेत. अपघातात सर्वांत जास्त अपघात दुचीकी चालवणाऱ्या यांचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतच्या आदेशामध्ये म्हटलंय की, वाहन अपघातामध्ये दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके चाकी गार चालक ने अपमानात दगावतात, त्यापैकी सुमारे ६२ टक्के व्यक्तीना डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे हेल्मेट असल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.

त्यामुळेच, जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाच्या सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे ऑर्डर मध्ये नमूद केले आहे.

New Traffic Rules : हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….! काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम? 

Categories
Breaking News महाराष्ट्र

हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….!

काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम?

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विनापरवाना वाहन चालवल्याचा दंड पाच पटीने वाढवून १० हजार करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.

फॅन्सी नंबर प्लेटवरही होणार कारवाई

अनेकांना दादा, मामा, बाबा अशा नावानी नंबर प्लेट गाड्यांना लावण्याची सवय असते. मात्र, बाईकस्वारांना आता या सवयीला मुरड घालावी लागणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमामध्ये करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास चालकांना १ हजार रुपये दंड आकारला जाईल. विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा परवाना तीन महिन्यासाठी रद्दही केला जाणार आहे. नवीन नियमांची नोटीस जारी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

…तर १० हजार रुपये दंड

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास आणि किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि किया २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाच्या आधारे नवीन नियम लागू होणार आहेत.