Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

सामाजिक वेदना मांडणारी व मानवी जीवनमूल्य असणारी कादंबरी “कूस” | प्रा. मिलिंद जोशी

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | साहित्यात वाङमय मुल्यासोबत जीवनमूल्यनाचाही सहभाग असायला हवा. समाजाची वेदना मांडणारे साहित्याचं श्रेष्ठ असून सामाजिक अस्वस्थता मांडणारे साहित्य निर्माण होत आहे. आजचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Author Dnyaneshwar Jadhwar) हे समाजभिमुख आहेत. तर समाजाने देखील साहित्याभिमुख झाले पाहिजे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Working President of Maharashtra Sahitya Parishad Prof. Milind Joshi) यांनी रविवारी पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. (Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel)

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस कादंबरीला प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. कूस कादंबरी ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा सोबत, एकूणच कामगारांच्या जगण्याचा मागोवा घेणारी आहे. (Koos Novel)

यावेळी बोलताना समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे कूस बद्दल म्हणाले, “कूस मध्ये वाङ्मयीन मूल्य , तंत्रमूल्य आणि जीवन मूल्य या तीनही मूल्यांचा समावेश आहे म्हणूनच आम्ही कूस कादंबरीची निवड केली आहे. कूस या कादंबरीत अलीकडंच शोषण कोणत्या पातळीवर होत आहे. मानवाच्या भाव भावनाच शोषण कसं होत आणि त्याच विकृतीकरण सध्या समाजात कसं पसरत आहे. निर्मित केंद्र , ऊर्जा केंद्र आहेत जी नष्ट करण्याच्या पाठीमागे हा समाज लागला आहे. म्हणजे स्त्रीच गर्भाशय काडून टाकण्यास इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, त्यात त्या बाईचा बळी जातोय, म्हणजे तिथं एक शोषण करणारी व्यवस्था आहे. तीच व्यवस्थाच जबादार आहे. हा शाश्वत व चिरंतन असणारा विषय लेखकाने बारकाईने मांडला आहे. कूस हि कादंबरी जिथे संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरु होते. दीर्घ काळ वाचकांच्या मनात रेंगाळणे हेच कूस या कादंबरीचं यश आहे.” (Author Dnyaneshwar Jadhwar)

डॉ. वासुदेव वले म्हणले की, “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील सरांनी ज्या पद्धतीने ज्ञानपरंपरा उभी केली आहे, त्या पद्धतीने ज्ञानाची चिकित्सा करणारे साहित्य समाजाला उपयुक्त ठरू शकते. तशा पद्धतीचा आशय आणि गाभा असणारी कूस कादंबरी आहे. म्हणून आम्हाला या कादंबरीचा गौरव यथोचित वाटतोय. लेखनाच्या पातळीवर सकासपणा असणारी आणि मानवी जगण्याचे अनेक कंगोरे मांडणारी ही कादंबरी आहे.”

वाचक नाना लामखेडे म्हणाले, “कूस मधील सुरेखा चा प्रवास वाचून अस्वस्थ वाटत आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेचा तिटकारा वाटतोय कि आपण किती खालच्या पातळीवर येऊन जीवन जगत आहोत. लेखकाने अत्यन्त अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सोबतच अनेक तपशील दिले आहेत. कूस ही कादंबरी वाचनिय तर आहेच पण विचार करण्यास भाग पडतेय त्यामुळे ही कादंबरी चिरंतन टिकून राहील.”

डॉ अशोक कोळी म्हणाले , “ कूस ही कादंबरी मराठी साहित्यात महत्वाची आहे कारण आजपर्यंत साहित्यात असा परिघा बाहेरचा विषय आला नव्हता. त्यामुळे अशा मानवाचं जगणं समजून घेण्यासाठी कसू भविष्यात उपयोगी ठरेल.”

यावेळी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी पुरस्कार मिळाल्या नंतर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कूस ही फक्त एकट्या सुरेखा कुटेंची गोष्ट नाही तर ती एक प्रातिनिधीक पात्र आहे. आपल्या समाजातील तळातील स्त्रियांचं जगणं कसं रक्तानं माखलेलं आहे, त्याचा कथात्मक शोध कूस मध्ये घेतलेला आहे. कुटूंब सांभाळणारी स्त्री हीच आजच्या समाजाचा आधार आहे पण आज तिलाच संपवण्याच्या गोष्टी विकृतीपणे समाजात घडत आहेत. याची मांडणी कूस मध्ये केली आहे.”

यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी वि. दा पिंगळे, प्रा .सपकाळे , प्राचार्य डॉ. ए. आर पाटील, शोभा पाटील, प्रतिमा पाटील, ममता पाटील, डॉ. स्वाती विसपुते , डॉ. संगीता गावंडे, डॉ. आशिष महाजन , स्नेहल पाटील, गणेश राऊत, प्रा. पुरुषोत्तम महाजन , नामदेव पाटोळे , प्रा. विजयेंद्र पाटील आणि विलास मोरे उपस्थित होते.


News Title | Principal Dr. Kisanrao Patil State Level Literary Award to Dnyaneshwar  Jadhawar’s ‘Koos’ novel. 

Koos | सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

| ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘कूस’ कादंबरीवरील परिसंवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

पुणे : “स्त्रीचे गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित विविध प्रकारचे शोषण ही वस्तुस्थिती आहे. शासनाची धोरणे चांगली असली तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लागतात. शासनाचे विविध विभाग आणि समाज यांच्यामधील मोठ्या अंतराचीही यात भर पडते. आयुक्तांपासून मंत्र्यापर्यंत सगळे बदलत असताना सरकारची संस्थात्मक स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी कूस ही कादंबरी उपयुक्त आहे. या संदर्भात सकारात्मक काम उभे करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सर्वोतोपरी मदत करू,” असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.
उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्ट्याच्या वतीने ‘कूस’ (Koos) या कादंबरीवर (Novel) आयोजित ‘कूस : स्त्रीच्या जगण्याचा व आरोग्याचा कथात्मक शोध’ या परिसंवादात (Seminar) डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे (Asaram Lomate) , ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. रणधीर शिंदे (Dr. Randhir Shinde) नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवती राणे, वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, केशायुर्वेदचे डॉ. हरीश पाटणकर, डॉ. रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर (Pradeep Champanerkar), कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Dnyaneshwar Jadhwar) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ही कादंबरी समाजाच्या तळागाळातील समूहाच्या दुःखमय अनुभवांची ज्वलंत कहाणी आहे. लेखकाने त्याच्या अनुभवांचे अत्यंत ताकदीनं केलेले चित्रण हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. यातील प्रमुख पात्र सुरेखा ही निघून जाते, असा कादंबरीचा शेवट आहे. ती सुरेखा कुठेही निघून गेली नाही तर ती स्त्रियांच्या चळवळीतच येईल यात शंका नाही. पण ही सुरेखा समाजात कुठेकुठे आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आहे.”
आसाराम लोमटे म्हणाले, “साखर कारखानदारीच्या क्षेत्रात तळाशी असलेल्या समाजसमूहांच्या वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आतापर्यंत विविध लेखकांनी लिहिलेल्या आहेत. कूस ही मानवी संवेदनेच्या पातळीवर नेणाऱ्या आश्वासक वर्तमान उभे करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ प्रश्न उभे करत नाही तर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा मार्गही दाखवते.” ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस या कादंबरीतूनही एक सकारात्मक वर्तमान हाती लागेल, अशी अपेक्षाही लोमटे यांनी व्यक्त केली.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, “फड, पिशवी आणि काजळी या त्रिदलाशी संबंधित ही कादंबरी आहे. बहूपीडित्वाचा परखड शोध या कादंबरीत घेतला गेला आहे. परिघावरच्या स्त्रियांच्या जगण्याचे अत्यंत रखरखीत यातनादायी वास्तव यात मांडले आहे. कादंबरीतील तपशीलांची शैली, लेखकाची आंतरिक गोवणूक, जगण्याचे आवाज, जिवंत माहोल या कलाकृतीच्या आशयात भर घालतात. भाषा, रितीरिवाजांचे एक सिंफनी यात असून शोधपत्रकारीतेच्या नजरेतून  समाज या समस्येकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, याचे चित्रण ही कादंबरी करते.”
डॉ. रेवती राणे म्हणाल्या, “विशेष करून चाळीशीच्या आतल्या स्त्रियांच्या गर्भपिशव्या काढण्याची कारणे आता द्यावी लागतील, असा निकाल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचाच अर्थ गर्भाशयात थोडी कुठे गाठ दिसली की पिशवी काढून टाकली जाते, असे आकडेवारी सांगते. याकडे गांभीर्याने पाहायला हवे. या विषयाकडे पाहण्याचे गांभीर्य कूस ही कादंबरी देते.” डॉ. राणे यांनी गर्भाशयाशी संबंधित विविध आजारांबद्दल विस्ताराने माहिती दिली. एकीकडे  गर्भपिशवी प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी होत आहेत त्यासोबतच आपण गर्भपिशवी वाचवण्यालाही महत्व दिले पाहिजे. आपण ‘बेटी बचाव’ ही घोषणा दिली तशी आता ‘थैली बचाव’ ही घोषणा द्यायची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “ही एका स्त्रीची प्रातिनिधिक कहाणी आहे. यात निरक्षरता, अनारोग्य, कुपोषण, लैंगिक शिक्षणाचा अभाव, स्त्री-पुरूष असमानता, व्यसनाधीनता, हुंडा, अज्ञान, अंधश्रद्धा याविषयी लेखकाने अत्यंत धाडसाने आणि निर्भीडपणे लेखकाने लिहिले आहे. आजच्या काळात मासिक पाळी विषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. पाळीकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्याची मानसिकता स्त्रीच्या मनावर तिच्या शालेय वयापासूनच बिंबवली जाते. हे बदलण्यासाठी स्त्री प्रश्नावर काम करणे गरजेचं आहे. स्त्रियांना माणूसपणाची जाणीव करून देण्यासाठी वंचित विकास संस्था खारीचा वाटा उचलेल.”
कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरीच्या निर्मितीविषयीचा प्रवास विस्ताराने मांडला. प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. उचित माध्यम समूहाचे संचालक जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.