Dr Mohan Agashe | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dr Mohan Agashe  | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात  | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Dr Mohan Agashe |  आभासी जग गतीने वाढत असून माणूसकी लोप पावत चालली आहे. सध्या माणसे दिसतात पण ती माणसे नसतात, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Agashe) यांनी व्यक्त केली.  लेखक, कवी गेल्यानंतर खरा जन्म त्यांचा होतो. त्यांचे साहित्य नंतर जीवंत होते. माणसाला विचार करण्याचे काम खर्‍या अर्थाने सात्यिक, कवी करतात असेही यावेळी त्यांनी सांगितले.
शब्दशिवार प्रकाशनतर्फे (Shabdshivar Publication) प्रकाशित व ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे (Ramdas Futane) लिखित ‘वर्षा, ईर्ष्या आणि गोहत्ती’ (Varsha, Irshalwadi ani Gohatti) या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते रविवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे (Dr Randhir Shinde), प्रकाश इंद्रजित घुले, प्रभाकर वाईकर  यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपहास, व्यंग आणि विडंबानातून वर्तमान राजकारण  आणि समाजकारणावर स्तंभलेखनातून भाष्य करणारे प्रवीण टोकेकर (Pravin Tikekar) (ब्रिटिश नंदी), श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) (तंबी दुराई) आणि भाष्यकवी  रामदास फुटाणे यांच्याशी  मुक्त संवाद करण्यात आला.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी त्यांचीशी संवाद साधला.
प्रसंगी प्रवणी टोकेकर आणि श्रीकांत बोजेवार यांचा यावेळी ‘संत नामदेव’ सन्मान पुरस्कार डॉ. आगाशे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले, लेखक कवी कमीत कमी शब्दात मांडणी करतो.  फुटाणे हे कमी शब्दात माणसाला, राजकारण्यांना जागे करतात. त्यांच्या शब्दाशब्दात ताकत भरलेली आहे. त्यांचे साहित्य हे विचार करायला भाग पाडतात. रामदास फुटाणे म्हणाले,  लहाणपणापासूनच साहित्य वाचणाची आवड होतीत्र. दत्तु बांधेकर यांचे साहित्य वाचले आणि माझे पाहिले साहित्य मी त्यांना अर्पण केले. सध्या राजकारणात संताजी-धनाजी सापडत नाही. सगळे घाशीराम कोतवाल सापडतात, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मुक्त संवादात फुटाणे म्हणाले, अवती भोवती घडणारे ‘जत्रा’ वर लिहिण्यास सुरुवात केली. अनेक वृत्तपत्रातून लिहिण्याची संधी मिळाली. सुरुवातीला वात्रटिका लिहित गेलो.  सध्या शिंदे, पवार, ठाकारे यांचे मुलं काय म्हणाली, यावरच आपले लक्ष आहे. आपली मुले काय करतात यात जास्त कोणी रस घेत नाही. राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे.  अतिशयोक्ती वास्तवाचे अंतर कमी झाले आहे. सध्या फार कमी साहित्यिक झाले असून लेखनिक जास्त झाले आहेत. तुमच्या मृत्यूनंतर जास्त वाचले गेले, तर  तुम्ही खरे साहित्यिक आहे, असेही यावेळी ते म्हणाले. मराठी साहित्यात विविधता आली पाहिजे. आजही ग्रामीण भागात चांगले लिहिणारे लेखक आहेत. जगण्याची अनुभुती ज्वलंत असली पाहिजे. सध्या जगण्यात नाटकीपणा आला आहे. पोलिस विभागात काल्पनिक नावे देऊन लिहिण्यासारखे भरपूर काही साहित्य आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्याबद्दल भरपूर लिहिले. मात्र यांच्याकडून कोणताही विरोध मला झाला नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.
  प्रविण टोकेकर म्हणाले, वर्तमानातील भाष्य करणारे लिखान हवे. मी लिहित असताना कोणत्याही राजकारण्यांनी विरोध दर्शविला नाही. असे विविध उदाहरणे देत त्यांनी सांगितले. राजकारण्यांवर व्यंगात्मक लिखाण केल्यावर त्यांना राग येत नाही. आणि ते दाखवतदेखील नाही. मात्र कायकर्त्यांना राग अनावर होतो. ते फोन करुन शाब्दिक सत्कारदेखील करतात, असा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला. राजकारण्यांची खिलाडू वृत्तीने ते घेतात. मात्र साहित्यकावर लिहिल्यावर त्यांना राग अनावर होऊन लगेच व्यक्त होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अपमान करणे म्हणजे विनोद करणे ही पद्धत सध्या सुरु आहे.
बोजेवार म्हणाले, सध्या विनोद समजून घेण्याची पातळी खालवली आहे. आपण व्यक्त होण्याची गरज आहे.  वाचकांना प्रतिसाद चांगला मिळतो. आम्हाल डेडलाइनची सवय लागली आहे. लिहिण्यासाठी भरपूर विषय आहे. विषयाला तुटवडा नाही. लेखकासाठी वाचन हा रियाज आहे. या रियाजामुळेच आज लिखान सुरु आहे. रामदास  फुटाणे यांनी  काटेरी चेंडू ही कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. रणधीर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंद्रजीत घुले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार संजय ढेरे व गौरव फुटाणे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

सामाजिक वेदना मांडणारी व मानवी जीवनमूल्य असणारी कादंबरी “कूस” | प्रा. मिलिंद जोशी

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | साहित्यात वाङमय मुल्यासोबत जीवनमूल्यनाचाही सहभाग असायला हवा. समाजाची वेदना मांडणारे साहित्याचं श्रेष्ठ असून सामाजिक अस्वस्थता मांडणारे साहित्य निर्माण होत आहे. आजचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Author Dnyaneshwar Jadhwar) हे समाजभिमुख आहेत. तर समाजाने देखील साहित्याभिमुख झाले पाहिजे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Working President of Maharashtra Sahitya Parishad Prof. Milind Joshi) यांनी रविवारी पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. (Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel)

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस कादंबरीला प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. कूस कादंबरी ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा सोबत, एकूणच कामगारांच्या जगण्याचा मागोवा घेणारी आहे. (Koos Novel)

यावेळी बोलताना समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे कूस बद्दल म्हणाले, “कूस मध्ये वाङ्मयीन मूल्य , तंत्रमूल्य आणि जीवन मूल्य या तीनही मूल्यांचा समावेश आहे म्हणूनच आम्ही कूस कादंबरीची निवड केली आहे. कूस या कादंबरीत अलीकडंच शोषण कोणत्या पातळीवर होत आहे. मानवाच्या भाव भावनाच शोषण कसं होत आणि त्याच विकृतीकरण सध्या समाजात कसं पसरत आहे. निर्मित केंद्र , ऊर्जा केंद्र आहेत जी नष्ट करण्याच्या पाठीमागे हा समाज लागला आहे. म्हणजे स्त्रीच गर्भाशय काडून टाकण्यास इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, त्यात त्या बाईचा बळी जातोय, म्हणजे तिथं एक शोषण करणारी व्यवस्था आहे. तीच व्यवस्थाच जबादार आहे. हा शाश्वत व चिरंतन असणारा विषय लेखकाने बारकाईने मांडला आहे. कूस हि कादंबरी जिथे संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरु होते. दीर्घ काळ वाचकांच्या मनात रेंगाळणे हेच कूस या कादंबरीचं यश आहे.” (Author Dnyaneshwar Jadhwar)

डॉ. वासुदेव वले म्हणले की, “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील सरांनी ज्या पद्धतीने ज्ञानपरंपरा उभी केली आहे, त्या पद्धतीने ज्ञानाची चिकित्सा करणारे साहित्य समाजाला उपयुक्त ठरू शकते. तशा पद्धतीचा आशय आणि गाभा असणारी कूस कादंबरी आहे. म्हणून आम्हाला या कादंबरीचा गौरव यथोचित वाटतोय. लेखनाच्या पातळीवर सकासपणा असणारी आणि मानवी जगण्याचे अनेक कंगोरे मांडणारी ही कादंबरी आहे.”

वाचक नाना लामखेडे म्हणाले, “कूस मधील सुरेखा चा प्रवास वाचून अस्वस्थ वाटत आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेचा तिटकारा वाटतोय कि आपण किती खालच्या पातळीवर येऊन जीवन जगत आहोत. लेखकाने अत्यन्त अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सोबतच अनेक तपशील दिले आहेत. कूस ही कादंबरी वाचनिय तर आहेच पण विचार करण्यास भाग पडतेय त्यामुळे ही कादंबरी चिरंतन टिकून राहील.”

डॉ अशोक कोळी म्हणाले , “ कूस ही कादंबरी मराठी साहित्यात महत्वाची आहे कारण आजपर्यंत साहित्यात असा परिघा बाहेरचा विषय आला नव्हता. त्यामुळे अशा मानवाचं जगणं समजून घेण्यासाठी कसू भविष्यात उपयोगी ठरेल.”

यावेळी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी पुरस्कार मिळाल्या नंतर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कूस ही फक्त एकट्या सुरेखा कुटेंची गोष्ट नाही तर ती एक प्रातिनिधीक पात्र आहे. आपल्या समाजातील तळातील स्त्रियांचं जगणं कसं रक्तानं माखलेलं आहे, त्याचा कथात्मक शोध कूस मध्ये घेतलेला आहे. कुटूंब सांभाळणारी स्त्री हीच आजच्या समाजाचा आधार आहे पण आज तिलाच संपवण्याच्या गोष्टी विकृतीपणे समाजात घडत आहेत. याची मांडणी कूस मध्ये केली आहे.”

यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी वि. दा पिंगळे, प्रा .सपकाळे , प्राचार्य डॉ. ए. आर पाटील, शोभा पाटील, प्रतिमा पाटील, ममता पाटील, डॉ. स्वाती विसपुते , डॉ. संगीता गावंडे, डॉ. आशिष महाजन , स्नेहल पाटील, गणेश राऊत, प्रा. पुरुषोत्तम महाजन , नामदेव पाटोळे , प्रा. विजयेंद्र पाटील आणि विलास मोरे उपस्थित होते.


News Title | Principal Dr. Kisanrao Patil State Level Literary Award to Dnyaneshwar  Jadhawar’s ‘Koos’ novel. 

NCP : Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण

Categories
Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण, तैलचित्राचे अनावरण आणि पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ बुधवारी पार पडला.

डेंगळे पूल, शिवाजी नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथील दुसऱ्या मजल्यावर कार्यकर्ता प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह असे नामकरण करण्यात आले. मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नामकरण समारंभ पार पडला. तसेच, या सभागृहातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचे अनावरण व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचे उद्घाटनही मिलिंद जोशी यांच्या हस्ते पार पडले.

मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्राचे अनेक पैलू उलगडून सांगितले तसेच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होईल. सध्याच्या या असहिष्णू काळात विचारांची लढाई विचारानेच लढण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असून येत्या काळातील ही लढाई जिंकताना पु. लं.च्या विचारांचा निश्चित उपयोग होईल, याची खात्री आहे असेही श्री.मिलिंद जोशी म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप, जेष्ठनेते श्री.अंकुश काकडे,विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपालीताई धुमाळ, शहर उपाध्यक्ष श्री.संदीप बालवडकर,राष्ट्रवादी युवकचे श्री.महेश हांडे,युवती शहराध्यक्षा सुषमा सातपुते, कार्याध्यक्षा अँड.श्रुती गायकवाड आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.