Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण |शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication |प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण

|शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

 

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | पुणे : देशातील लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेली प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट आज गंजलेली आहे. तिच्यातील दोष दूर करून काही आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले.  (Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication)

सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे ‘प्रशासकीय योगायोग’ आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी लिहिलेल्या ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ या पुस्तकांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. याप्रसंगी जीएसटी पुणेच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे, सेवानिवृत्त अधिकारी सत्यजित गुजर, निवृत्त अधिकारी चिंतामणी जोशी, सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नाईकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, प्रशासकीय व्यवस्था पुन्हा बळकट कशी होईल आणि देशातील लोकशाहीचे खांब असणाऱ्या तिन्ही व्यवस्था मध्ये संतुलन कसे निर्माण होईल हे पाहणे गरजेचे आहे. कठोर प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडणे ही काळाची गरज आहे.

तसेच यशदा सारख्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला जावा आणि तिथून उत्तमोत्तम संशोधन होऊन चांगले अधिकारी बाहेर पडावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उल्हास पवार यांनी अनेकानेक किस्से सांगून धमाल उडवून दिली. ते म्हणाले, विसंगतीतून विनोद निर्माण होतो. प्रशासनात अनावधानाने बऱ्याच गडबडी होतात. त्यातूनच लेखनासाठी उत्तम संधी तयार होते.

ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर म्हणाले, प्रशासकीय व्यवस्थेत कागद नीट वाचले जात नाहीत. ते झाले तर अनेक प्रश्न सुटतील आणि सुप्रशासनाकडे वाटचाल होईल.

जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे म्हणाल्या, या दोन्ही पुस्तकातून प्रशासनाची बाजू समोर यायला नक्कीच मदत होईल. मराठी साहित्यात लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांची मांदियाळी मोठी आहे. डोळसपण लाभलेल्या अधिकाऱ्यांचे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

रत्नाकर गायकवाड म्हणाले, “आजच्या खालावत चाललेल्या प्रशासनाला विनोदाची झालर मिळावी म्हणून या पुस्तकाचे लेखन मी केले आहे. प्रशासनातील अनेकानेक गंमतीशीर किस्से उलगडताना निखळ करमणूक करण्याच्या हेतूने लेखन केले आहे. सनदी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव लिहिते केले तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल.

लेखक राजीव नंदकर म्हणाले, गेली 20 वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना आलेले विविध अनुभव आणि काम करताना बाळगलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रशासन ते सुप्रशासन हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.

मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक आशिष पाटकर आणि अनुराध्या प्रकाशनाच्या प्रकाशक चेतना नंदकर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक आणि आभार प्रल्हाद कचरे यांनी मानले. उपस्थित आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक किस्से सांगून धमाल उडवून दिली.

पक्षांतरबंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत फेकावा

पक्षांतरबंदी कायदा हा निरर्थक ठरलेला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावा आणि त्या जागी नवे काही आणावे अशी गरज निर्माण झालेली आहे. आज एकूणच लोकशाही धोक्यात आलेली असून तीच टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Rajiv Nandkar Book | स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे – अविनाश धर्माधिकारी

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Rajiv Nandkar Book | स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे – अविनाश धर्माधिकारी

Rajiv Nandkar Book | प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावले पाहिजे, सर्व सुख आपल्यात दडलेले असते. आपले कर्तव्ये उत्तमपणे करणे त्यात आनंद बाळगणे हेच खरे सुख आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhikari) यांनी व्यक्त केले. तरुण पिढी सध्या व्यसनाकडे वळली आहे. हे सुख नसून दुःखदायक सुख आहे. आपल्याला ज्ञान आणि साधनेचे व्यसन लागले पाहिजे, ज्ञान, साधना केल्यास आयुष्यभर ज्ञानाची शिदोरी आपल्या जवळ असते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. (Sukhacha Shodhat Book)
       आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूट वतीने आयोजित आणि अनुराध्या प्रकाशनातर्फे प्रकाशित पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित  ‘सुखाच्या शोधात’  आणि इयत्ता पाचवीतील १० वर्षीय त्यांची मुलगी कु. आराध्या नंदकर हिने लिहलेले ‘सारा पारकर अँड द मॅजिकल ओरब्ब’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे, माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
 माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड  आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त व अर्थतज्ञ अभय टिळक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूटच्या संचालिका व प्रकाशिका चेतना राजीव नंदकर यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. श्रावणी कुलकर्णी हिने सरस्वती प्रार्थना सादर केली.
       ‘सुखाचा शोध’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले.
धर्माधिकारी म्हणाले, तरुणांना ज्ञान आणि साधना करण्याचे व्यसन लागले पाहिजे, त्यामुळे त्याला आयुष्य सुखाचे जगता येईल. आपल्या कर्तव्यात आनंद असतो. आपण हाती घेतलेले काम उत्तम रीतीने पार पाडले पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आपण डोकावण्याची गरज नाही, खरे सुख आपल्यात असून ते ओळखण्याची ताकद आपल्यात निर्माण करा.
सात्विक सुख सुरवातीला विषासारखे असते, मात्र नंतर हेच विष अमृतात रूपांतर होते.  सर्व सुखाचे निदान आपल्यात आहे. चांगल्या गोष्टींची सवय लावून असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. लेखक नंदनकर यांनी सुखाचा शोध या पुस्तकातून तुम्हाला अनुभूती घेता येईल. त्यांनी सुखाचा खरा मार्ग त्यांनी दाखवला आहे. सुख मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे.
    माणसाला कितीही मिळाले तरी, त्याला कमीच वाटते. माणसाला भौतिक साधने जमा करण्याची हाव लागली असल्याने सुखाचा मार्ग सापडत नाही. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होऊन मी काम केले. ते स्वप्न मी आधी पाहिले होते. दुखीतांचे अश्रू पुसता आले तरच आपले जीवन सार्थकी लागेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. संत ज्ञानेश्वर यांनी सुखाचा मार्ग पसायदानात सांगितला आहे. संतांनी सुखाचा मार्ग सांगितला आहे, हेच त्यांचे काम नंदनकर करीत असल्याचे कौतुक धर्माधिकारी यांनी केले.
शेखर गायकवाड म्हणाले, आपली जगण्याची वाटचाल भौतिक साधनांकडे चाललेली आहे. साधे कसे राहायचे हे नंदकर यांनी आपल्या पुस्तकातून सोप्या भाषेत सांगितले आहे. आराध्या हिने देखील आपल्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.सध्या माणूस गोंधळलेल्या परिस्थितीत सारखा जगत असतो. सुखाचा सोपा मार्ग त्यांना सापडत नाही, ही मोठी खंत आहे. आध्यात्मिक आणि व्यवस्थापन नंदनकर यांनीपुस्तकात मांडले आहे. सुखाचा सोपा मार्ग त्यांनी दाखवला आहे.
डॉ. अभय टिळक म्हणाले, सुखाची अनुभूती येण्यासाठी आपल्यातील दुर्गुण काढणे गरजेचे आहे. आपले मन स्थिर असणे गरजेचे आहे. संत विचार जीवनात आणणे गरजेचे आहे.
      राजीव नंदकर म्हणाले, प्रत्येकजण सुखाच्या शोधत असतो. हे सुख शोधण्याचे काम मी केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विषयावर लिहिले. त्यात या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद होत आहे. कु. आराध्या हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, मी कोरोना काळात लिहिण्याची कल्पना सुचली, याचा मी पुरेपूर वापर केला. मी माझ्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतना नंदकर यांनी केले. त्या म्हणाल्या, ग्रंथ हेच जीवन आहे. ग्रंथ आपल्याला जीवन जगायला शिकवते. आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचावे आणि लिहावे हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मांडके  यांनी केले. राजीव नंदकर यांनी आभार मानले.
——–

Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन

 

Dr Neelam Gorhe | डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा निर्माण केला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि सदैव प्रेरणादायी राहील, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी काढले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल श्री. बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास आहे. या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्दबद्ध करण्यात आली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे समान योगदान असणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33 टक्के आरक्षण देण्यात आले. आज संसदेत, विधिमंडळ स्थानिक राजकारण यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला विविध क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेवर पुढे येऊन आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील महिलांसाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. त्यांचे कार्य, विचार या पुस्तकातून समाजापुढे आले असून नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नीलमताई गोऱ्हे या ध्येयवादी विचारसरणीच्या विचारवंत आहेत. समाजासाठी, महिलांसाठी काय करू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील असतात.नेहमी मदतीसाठी सहानुभूतीची भावना त्यांची असते.

या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव देखील आहे. जे मनात असते, ते स्पष्ट बोलतात. विधान परिषदेच्या उपसभापती या महत्त्वाच्या पदावर काम करत असतानाही विधान परिषदेत सर्वांना न्याय देण्याची व मदतीची त्यांची नेहमीच भूमिका असते. देशात महाराष्ट्र हे महिला धोरण आणणारे पहिले राज्य आहे. या धोरणात त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत व नवीन तयार होणाऱ्या धोरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतात. त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. महिला आरक्षण विषय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचा यावेळी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ ही खूप महत्त्वाची असते. वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते. परंतु, लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खूप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला.

कोणतेही कार्य आपण सांगितले नाही, तर ते कळणार नाही. सामाजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचा प्रवास आणि अनुभव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली.

———

News Title | Dr. Neelam Gorhe By the Governor and Chief Minister Dr. Publication of Neelam Gorhe’s book ‘Eispais Gappa Neelamtaishi’

Dr Mohan Agashe | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dr Mohan Agashe  | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात  | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Dr Mohan Agashe |  आभासी जग गतीने वाढत असून माणूसकी लोप पावत चालली आहे. सध्या माणसे दिसतात पण ती माणसे नसतात, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Agashe) यांनी व्यक्त केली.  लेखक, कवी गेल्यानंतर खरा जन्म त्यांचा होतो. त्यांचे साहित्य नंतर जीवंत होते. माणसाला विचार करण्याचे काम खर्‍या अर्थाने सात्यिक, कवी करतात असेही यावेळी त्यांनी सांगितले.
शब्दशिवार प्रकाशनतर्फे (Shabdshivar Publication) प्रकाशित व ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे (Ramdas Futane) लिखित ‘वर्षा, ईर्ष्या आणि गोहत्ती’ (Varsha, Irshalwadi ani Gohatti) या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते रविवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे (Dr Randhir Shinde), प्रकाश इंद्रजित घुले, प्रभाकर वाईकर  यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपहास, व्यंग आणि विडंबानातून वर्तमान राजकारण  आणि समाजकारणावर स्तंभलेखनातून भाष्य करणारे प्रवीण टोकेकर (Pravin Tikekar) (ब्रिटिश नंदी), श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) (तंबी दुराई) आणि भाष्यकवी  रामदास फुटाणे यांच्याशी  मुक्त संवाद करण्यात आला.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी त्यांचीशी संवाद साधला.
प्रसंगी प्रवणी टोकेकर आणि श्रीकांत बोजेवार यांचा यावेळी ‘संत नामदेव’ सन्मान पुरस्कार डॉ. आगाशे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले, लेखक कवी कमीत कमी शब्दात मांडणी करतो.  फुटाणे हे कमी शब्दात माणसाला, राजकारण्यांना जागे करतात. त्यांच्या शब्दाशब्दात ताकत भरलेली आहे. त्यांचे साहित्य हे विचार करायला भाग पाडतात. रामदास फुटाणे म्हणाले,  लहाणपणापासूनच साहित्य वाचणाची आवड होतीत्र. दत्तु बांधेकर यांचे साहित्य वाचले आणि माझे पाहिले साहित्य मी त्यांना अर्पण केले. सध्या राजकारणात संताजी-धनाजी सापडत नाही. सगळे घाशीराम कोतवाल सापडतात, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मुक्त संवादात फुटाणे म्हणाले, अवती भोवती घडणारे ‘जत्रा’ वर लिहिण्यास सुरुवात केली. अनेक वृत्तपत्रातून लिहिण्याची संधी मिळाली. सुरुवातीला वात्रटिका लिहित गेलो.  सध्या शिंदे, पवार, ठाकारे यांचे मुलं काय म्हणाली, यावरच आपले लक्ष आहे. आपली मुले काय करतात यात जास्त कोणी रस घेत नाही. राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे.  अतिशयोक्ती वास्तवाचे अंतर कमी झाले आहे. सध्या फार कमी साहित्यिक झाले असून लेखनिक जास्त झाले आहेत. तुमच्या मृत्यूनंतर जास्त वाचले गेले, तर  तुम्ही खरे साहित्यिक आहे, असेही यावेळी ते म्हणाले. मराठी साहित्यात विविधता आली पाहिजे. आजही ग्रामीण भागात चांगले लिहिणारे लेखक आहेत. जगण्याची अनुभुती ज्वलंत असली पाहिजे. सध्या जगण्यात नाटकीपणा आला आहे. पोलिस विभागात काल्पनिक नावे देऊन लिहिण्यासारखे भरपूर काही साहित्य आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्याबद्दल भरपूर लिहिले. मात्र यांच्याकडून कोणताही विरोध मला झाला नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.
  प्रविण टोकेकर म्हणाले, वर्तमानातील भाष्य करणारे लिखान हवे. मी लिहित असताना कोणत्याही राजकारण्यांनी विरोध दर्शविला नाही. असे विविध उदाहरणे देत त्यांनी सांगितले. राजकारण्यांवर व्यंगात्मक लिखाण केल्यावर त्यांना राग येत नाही. आणि ते दाखवतदेखील नाही. मात्र कायकर्त्यांना राग अनावर होतो. ते फोन करुन शाब्दिक सत्कारदेखील करतात, असा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला. राजकारण्यांची खिलाडू वृत्तीने ते घेतात. मात्र साहित्यकावर लिहिल्यावर त्यांना राग अनावर होऊन लगेच व्यक्त होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अपमान करणे म्हणजे विनोद करणे ही पद्धत सध्या सुरु आहे.
बोजेवार म्हणाले, सध्या विनोद समजून घेण्याची पातळी खालवली आहे. आपण व्यक्त होण्याची गरज आहे.  वाचकांना प्रतिसाद चांगला मिळतो. आम्हाल डेडलाइनची सवय लागली आहे. लिहिण्यासाठी भरपूर विषय आहे. विषयाला तुटवडा नाही. लेखकासाठी वाचन हा रियाज आहे. या रियाजामुळेच आज लिखान सुरु आहे. रामदास  फुटाणे यांनी  काटेरी चेंडू ही कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. रणधीर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंद्रजीत घुले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार संजय ढेरे व गौरव फुटाणे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.