Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण |शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication |प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण

|शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

 

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | पुणे : देशातील लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेली प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट आज गंजलेली आहे. तिच्यातील दोष दूर करून काही आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले.  (Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication)

सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे ‘प्रशासकीय योगायोग’ आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी लिहिलेल्या ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ या पुस्तकांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. याप्रसंगी जीएसटी पुणेच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे, सेवानिवृत्त अधिकारी सत्यजित गुजर, निवृत्त अधिकारी चिंतामणी जोशी, सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नाईकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, प्रशासकीय व्यवस्था पुन्हा बळकट कशी होईल आणि देशातील लोकशाहीचे खांब असणाऱ्या तिन्ही व्यवस्था मध्ये संतुलन कसे निर्माण होईल हे पाहणे गरजेचे आहे. कठोर प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडणे ही काळाची गरज आहे.

तसेच यशदा सारख्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला जावा आणि तिथून उत्तमोत्तम संशोधन होऊन चांगले अधिकारी बाहेर पडावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उल्हास पवार यांनी अनेकानेक किस्से सांगून धमाल उडवून दिली. ते म्हणाले, विसंगतीतून विनोद निर्माण होतो. प्रशासनात अनावधानाने बऱ्याच गडबडी होतात. त्यातूनच लेखनासाठी उत्तम संधी तयार होते.

ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर म्हणाले, प्रशासकीय व्यवस्थेत कागद नीट वाचले जात नाहीत. ते झाले तर अनेक प्रश्न सुटतील आणि सुप्रशासनाकडे वाटचाल होईल.

जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे म्हणाल्या, या दोन्ही पुस्तकातून प्रशासनाची बाजू समोर यायला नक्कीच मदत होईल. मराठी साहित्यात लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांची मांदियाळी मोठी आहे. डोळसपण लाभलेल्या अधिकाऱ्यांचे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

रत्नाकर गायकवाड म्हणाले, “आजच्या खालावत चाललेल्या प्रशासनाला विनोदाची झालर मिळावी म्हणून या पुस्तकाचे लेखन मी केले आहे. प्रशासनातील अनेकानेक गंमतीशीर किस्से उलगडताना निखळ करमणूक करण्याच्या हेतूने लेखन केले आहे. सनदी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव लिहिते केले तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल.

लेखक राजीव नंदकर म्हणाले, गेली 20 वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना आलेले विविध अनुभव आणि काम करताना बाळगलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रशासन ते सुप्रशासन हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.

मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक आशिष पाटकर आणि अनुराध्या प्रकाशनाच्या प्रकाशक चेतना नंदकर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक आणि आभार प्रल्हाद कचरे यांनी मानले. उपस्थित आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक किस्से सांगून धमाल उडवून दिली.

पक्षांतरबंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत फेकावा

पक्षांतरबंदी कायदा हा निरर्थक ठरलेला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावा आणि त्या जागी नवे काही आणावे अशी गरज निर्माण झालेली आहे. आज एकूणच लोकशाही धोक्यात आलेली असून तीच टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

Categories
Breaking News Political पुणे

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

 

Jansanvad Yatra | Pune Congress | पुणे – भारताची लोकशाही आणि डॉ.आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा (Modi Government) मनमानी कारभार, सरकारी यंत्रणांमधील वाढता हस्तक्षेप, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा (Congress Jansanvad Yatra) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Constituency)  माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी काढण्यात आली.

यात्रेला सर्व थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचा प्रारंभ कॅम्प मधील इंदिरा गांधी चौकातून करण्यात आला. ही यात्रा बाटा चौक मार्गे सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी, कोळसा गल्ली, भोपळे चौक, कुरेशी मस्जिद, गुडलक हॉटेल, वखार चौक, चुडामण तालीम, जुना मोटर स्टॅण्ड, भवानी माता मंदिर, बनकर तालीम, दादापीर दर्गा, छाया टॉकिज, ए.डी.कॅम्प चौक, राजेवाडी, कॉर्टर गेट, संत कबीर चौक, मनुषा मस्जिद, रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक अशा मार्गाने काढण्यात येऊन यात्रेचा समारोप नरपतगीर चौक येथे करण्यात आला.

या जनसंवाद यात्रेत ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या समवेत कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, लता राजगुरू, पूजा आनंद, शानी नौशाद, रफिक शेख, मंजूर शेख, करण मकवाणी, जया किराड, नुरूद्दीन सोमजी, संगीता पवार, प्रविण करपे, सुरेश कांबळे, विठ्ठल थोरात, अमीर शेख, सुजित यादव,असिफ शेख, विजय जाधव, चेतन अगरवाल, कान्होजी जेधे, सुरेखा खंडागळे, प्रशांत सुरसे, अरूण गायकवाड आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात्रा मार्गावर जनतेने यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले, स्वागत फलकही लावण्यात आले होते. छोटे व्यापारी, पथारीवाले, युवक, महिला यांनी यात्रेतील नेत्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला, गाऱ्हाणी मांडली आणि सर्व जाती-धर्मात प्रेम निर्माण व्हावे या काँग्रेसच्या उद्देशाचे स्वागत केले.

भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्याच प्रेरणेतून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही यात्रा यशस्वी होत आहे, असे मनोगत मान्यवर वक्त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन

 

Prithviraj Chavan | पुणे शहर जिल्हा काँग्रेस पार्टी, व्यापारी सेलच्या (Pune Congress Vyapari cell) वतीने ” फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती ” चे वितरण सुमारे ५५५ स्थानिक नारिकांना देण्याचे उदघाटन  पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) ( माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात प्रभाग क्रमांक २८ मधील काही रहिवासीयांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी अरविंद शिंदे ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ), मोहन जोशी, अभय छाजेड, विजयकांत कोठारी, पन्नालालजी लुनावात, स्नेहल पाडाळे, नीता राजपूत,अरूण कटारीया, मनीषा फाटे, सोनकांबळे, सुरेश चौधरी, सुरेश चौधरी, उमेश मांडोत, मनीष जैन, सीमा महाडिक, अनुसया गायकवाड ,रझीया बल्लारी, व अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. भरत सुराणा ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँगेस व्यापारी सेल ) व योगिता सुराणा यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. (Pune Congress)

या प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे, आणि जवळजवळ मोफत दरामध्ये म्हणजे ५ रुपयात भरत सुराणा व योगिता सुराणा गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. गणेश मूर्ती गोळा करतात व अतिशय मोफत दरानी म्हणजे ५ रुपयात गोरगरिब समाजा मध्ये भरत सुराणा व त्यांच्या पत्नी योगिता सुराणा वितरण करण्याचे सुंदर उपक्रम राबवतात, लॉटरी द्वारे नागरिकांना बापाचे वितरण केले जाते, त्यामुळे गणपती बाप्पाच ठरवतो कोणाच्या घरी जायचे, घरगुती आनंदामध्ये हा सण साजरा करता यावा या मागचा उद्धेश चांगला आहे. या ठिकाणी आपल्याला खूप धन्यवाद देतो, आणि अभिनंदन करतो तुम्ही पुणे शहरात एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पाडाळे यांनी केले तर योगिता सुराणा यांनी सर्वांचे आभार मानले.

Maratha Samaj Andolan | Prithviraj Chavan | गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maratha Samaj Andolan | Prithviraj Chavan | गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण

Maratha Samaj Andolan | Prithviraj Chavan  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Jalana Antarwali Sarati) येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan) सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज (Lathichrge) केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा  निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी (Home Minister Devendra Fadnavis) या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा. अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. (Maratha Samaj Andolan | Prithviraj Chavan)
यापुढे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.
मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे.
मराठा बांधवांच्यावर आज झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत आहोत.

Kasba by-election | विजयाबद्दल काँग्रेस नेत्यांचे काय आहे विश्लेषण!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला नेमकी दिशा देणारा विजय –    मोहन जोशी

पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलाला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा.गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला धिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो.


कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीचा विजय – पृथ्वीराज चव्हाण
कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. गेली 32 वर्षे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक या भाजप कडून निवडून आल्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
यापुढे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाविकास आघाडीने एका विचाराने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली व त्यांना महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी मदत केल्यामुळे हा विजय झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
विरोधकांच्या मतांची विभागणी टाळली तर आमचा विजय होऊ शकतो. चिंचवड ला हेच आम्हाला बघायला मिळेल की, विरोधकांच्या मतांची विभागणी करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा केला गेला. आणि त्यामुळे बरीच मत हि तिसऱ्या उमेदवाराने खाल्ल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण भाजपविरोधी जनमत मोठे असल्याचे या दोन्ही निवडणुकीच्या निकालातून समजून आले आहे.
वंचित आघाडीने त्यांची ताकद नसताना फक्त महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्याकरिता तिसरा उमेदवार उभा केला.

Gujarat elections | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे.

यानुसार पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग घेऊन संवाद साधणार आहेत तसेच या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. आज अहमदाबाद काँग्रेस कमिटी मध्ये पोहचल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आदरांजली अर्पण केली.

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजप ला काँग्रेस ने चांगलीच टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस ने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे त्यानुसार महाराष्ट्रातून काँग्रेस ने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि खा. मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरित्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने 2004 साली गुजरात मध्ये 12 खासदार निवडून आणले आहेत. त्याच वर्षी या निर्णायक गुजरात च्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत 1 नं चा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता. हि महत्वाची घटना काँग्रेस मुख्यालयात नोंद असल्याने यावर्षीच्या गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख विभागांची जबाबदारी दिलेली आहे.

1971 War : Aba Bagul : आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आबा बागुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आबा बागुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

पुणे : नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आबा बागुल नेहमीच पुढाकार घेतात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांनी आम्हाला देशप्रेमाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अगोदर देखील आबांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस गटनेता आबा बागुल यांचे कौतुक केले.

:थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचा लोकार्पण कार्यक्रम

पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व पुणे मनपातर्फे सादर केलेल्या थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचा लोकार्पण कार्यक्रम झाला. याप्रसंगी कोनशिलाचे अनावरण करताना पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आबा बागुल, उल्हास पवार, रमेश बागवे, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), उपमहापौर सुनीता वाडेकर, मोहन जोशी, सौ. जयश्री बागुल इत्यादी उपस्थित होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आबा बागुल यांची पाठ थोपटली. चव्हाण पुढे म्हणाले, १९७१ चे युद्ध म्हणजे पहिले निर्णायक युद्ध होते. जे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकले होते. शिवाय याच युद्धात भारताला रॉ सारखी गुप्तचर संघटना देखील मिळाली. या युद्धाची आठवण आबांनी आपल्या सर्वाना करून दिली.