Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

| राज्य सरकार कडून आदेश जारी

Dress Code for Teachers – (The Karbhari News Service) – राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक संवर्गाच्या पेहरावाबाबत राज्य सरकार कडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

सरकारच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. असे सरकारने म्हटले आहे.

सरकारने पुढे म्हटले आहे कि शिक्षकांच्या  वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो.
ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत :-
१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
४) उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज ) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत “Tr. ” तर मराठी भाषेत “टि” असे संबोधन लावण्यात यावे. तसेच,
यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल. असे ही सरकारने आदेशात म्हटले आहे.

Schools upto 4th in the Maharashtra state will open after nine in the morning

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

Schools upto 4th in the Maharashtra state will open after nine in the morning

 

Maharashtra School Timings | The School Education Department has issued orders to schools of all mediums and all managements in the state to hold classes from pre-primary (nursery) to class IV at 9 am or after 9 am. A government decision has been issued in this regard. Compliance with the order is explained. The decision will be implemented from the coming academic year. (Maharashtra School Timing)

Children sleep late at night for a variety of reasons. Since school is early in the morning, they do not get enough sleep. As it has a negative effect on the physical and mental health of the students, the school education department has given instructions to change the timings of the schools.

Governor Ramesh Bais had expressed his concern about the children in the school while inaugurating the campaign ‘Chief Minister Majhi Shoola Sundar Shoola’. The governor also recently suggested that if the current morning session school time is postponed to 9 instead of 7, as the children do not get enough sleep at night, then the children will get enough sleep and they will focus on their education and the morning rush of the parents will also be reduced. After this, the School Education Department through the State Educational Research and Training Council conducted a study on changing the school timings by considering the timings of various schools in the state. The decision of the education department said that after discussing the feedback, various education experts and education lovers and parents, it was decided to open the school after 9.

Suggestion for Management…

All medium and all management schools in the state which open before 9 a.m. are required to change their pre-primary to class IV timings and those schools whose pre-primary to class IV timings are earlier than 9 a.m. Instructions have also been given that while changing the school timings, the concerned school management should ensure that there is no disruption in the study and teaching period fixed for school education as per the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009. The managements of the schools where it is not at all possible to change the timings of their schools, should be advised to solve their problems with the guidance of the concerned District Education Officer / Education Inspector (Primary) on a case-by-case basis. For this, the management of the concerned school should contact the Education Officer / Inspector of Education (Primary) in their district and take action regarding the matter. Also, instructions have been given in this government decision that the Director of Education (Primary) should take vigilance in this regard.

Things revealed in the study

– It was observed that most of the schools in the state, especially the private schools, have their closing times at 7 am or later.
– Students sleep late at night due to the changed lifestyle in the modern age.
Since school is early in the morning, they do not get enough sleep. The negative effect of this was seen on the physical and mental health of the students.
– According to the parents, the child is not ready to wake up early for school due to lack of sleep.
– Students appear sluggish due to insufficient sleep. It reduces the enthusiasm required for studying.
– During winter and monsoon seasons, waking up early in the morning to go to school is troublesome for students. Many students get sick.
– Preparing the children early in the morning, preparing the lunch box and dropping the child to school on time causes stress on the parents.
– Fog and rain on the road also cause problems when transporting students from schools that fill up early in the morning by buses and vans.

Maharashtra School Timing | राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरणार | राज्य सरकारचे आदेश जारी

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Maharashtra School Timing | राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरणार | राज्य सरकारचे आदेश जारी

Maharashtra School Timings | पूर्व प्राथमिक (नर्सरी) ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना दिल्या आहेत. यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. आदेशाचे पालन करण्याबाबत स्पष्ट केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Maharashtra School Timing)

अनेकविध कारणांमुळे मुले रात्री उशिराने झोपतात. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याने शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेतील लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सध्याची सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सात ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल तसेच सकाळची पालकांची धावपळही कमी होईल, असे राज्यपाल यांनीही अलीकडेच सूचना दिल्या होत्या. यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात केला. अभिप्राय, विविध शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर शाळा 9 नंतर भरवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाच्या निर्णयात म्हटले आहे.

व्यवस्थापनांसाठी सूचना…

राज्यातील सकाळी 9 पूर्वी भरणार्‍या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक असून ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 च्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी तसेच शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, अशाही सूचना दिल्या आहेत. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल, त्यांच्या अडचणी प्रकरणपरत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी / शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरणपरत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी. तसेच याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी घ्यावी, अशा सूचनाही या शासन निर्णयात दिल्या आहेत.

 अभ्यासात समोर आलेल्या गोष्टी

– राज्यातील बहुतांश शाळा, विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा सकाळी 7 किंवा त्यानंतर असल्याचे दिसून आले.
– आधुनिक युगातील बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात.
सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसून आला.
– पालकांच्या मते पाल्याची झोप पूर्ण न झाल्याने ते शाळेसाठी लवकर उठण्यासाठी तयार नसतात.
– अपुर्‍या झोपेमुळे विद्यार्थी आळसावलेले दिसून येतात. अभ्यासासाठी आवश्यक असणारा उत्साह त्यामुळे कमी होतो.
– हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते. अनेक विद्यार्थी आजारी पडतात.
– सकाळी मुलांना लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे पालकांची ओढाताण होते.
– सकाळी लवकर भरणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

School Education Minister Deepak Kesarkar | विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार | शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे उपाययोजना करण्याचे आदेश 

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

School Education Minister Deepak Kesarkar | विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार | शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे उपाययोजना करण्याचे आदेश

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतला विभागाच्या कामांचा आढावा

 

School Education Minister Deepak Kesarkar  | विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे (Burden of students) कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये (All Schools In Maharashtra) इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात ४ भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट करावीत, अशा सूचना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. (School Education Minister Deepak Kesarkar)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व विभागांचा आढावा बैठकीत शिक्षणमंत्री श्री. केसरकर बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.

शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वह्या शाळेत आणण्याची आवश्यकता असू नये. पाठ्यपुस्तकात देण्यात आलेल्या पानांचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे शिक्षकांकडून अवलोकन होणे आवश्यक आहे. आधार नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले, अंतिम संच मान्यतेसाठी मुदतवाढ देण्यात यावी. आवश्यकता तपासूनच नवीन शाळांना मंजुरीचे प्रस्ताव सादर करावे. शिपाई पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी. अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत पात्र शिक्षकांचे समायोजन करावे. केंद्रप्रमुखांची पदेही तातडीने भरावीत, असे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.

क्रीडा आयुक्त दिवसे यांनी राज्यातील स्काऊट, गाईड तसेच क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत माहिती दिली. तसेच ९ ते १४ वयोगटापासून विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक शिक्षण दिल्यास ऑलिम्पिक अथवा अशियाई स्पर्धेपर्यंत राज्यातील मुले पोहोचतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषि विषयाचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाने कृषि विभागाच्या समन्वयाने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक शाळेत परसबाग करण्यात यावी. यासाठी आमदार निधी किंवा डीपीसी मधून पाण्याच्या सुविधेसाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

बैठकीत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी समूह शाळा योजना, शिक्षण सारथी, १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळेत शिक्षक पदे मंजुरीचे निकष, इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी राज्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


News Title | School Education Minister Deepak Kesarkar The burden of students will be reduced Education Minister Deepak Kesarkar’s order to take measures