Education department | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा | माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा

| माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी

पुणे | नुकत्याच पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. लवकरच इतर कर्मचाऱ्यांच्या पण बदल्या करण्यात येणार आहेत  महानगरपालिकेत वर्ग एक ते तीन मधील अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या कराव्या असा नियम आहे. तोच नियम शिक्षण  विभागात पण लावण्यात यावा आणि बदल्या करण्यात याव्यात. अशी मागणी माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
खर्डेकर यांच्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या शिक्षण विभाग कार्यालयात वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. अनेक वर्षापासून एकाच विभागात काम करत असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्यात सुद्धा उद्दामपणा आला आहे. तेथे छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा नागरिकांना खूप खेटे घालावे लागतात. कर्मचारी जागेवर नसतात. शिक्षकांची कामे, तसेच रिटायर झालेल्या शिक्षकांची पेन्शनची कामे , नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही त्यांना कार्यालयात खूप चकरा माराव्या लागतात.  पूर्वी शिक्षण मंडळ स्वतंत्र होते; परंतु दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत शिक्षण मंडळ विलीन होऊन इतर समित्यांप्रमाणे  शिक्षण समिती झाली आहे. मात्र अद्यापही तेथील कर्मचाऱ्यांच्या  बदल्या केलेल्या नाहीयेत.
खर्डेकर यांनी पुढे म्हटले आहे कि मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना अनेक नगरसेवक,   नागरिक, रिटायर शिक्षक माझ्याकडे कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी घेऊन येत असत.  येथील कर्मचाऱ्यांचे बदल्या करा म्हणून मागणी करत असत. त्यानुसार आम्ही शिक्षण समितीने ठराव करून येथील कर्मचाऱ्यांच्या इतर मनपा च्या विभागाप्रमाणे वेगवेगळ्या खात्यात बदल्या करण्यात याव्या. असा ठराव देखील केला होता; मात्र अद्याप बदल्या झालेल्या नाहीत.
 महापालिका आयुक्त यांच्याकडे  मागणी आहे की शिक्षण विभागातील किमान ८०% कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर खात्यात बदल्या करण्यात याव्यात. जेणेकरून तेथील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपून नागरिकांची कामे वेळेवर होतील.
मंजुश्री संदीप खर्डेकर, माजी शिक्षण समिती अध्यक्ष

Chandrakant Patil | गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पूर्वीच्या काळी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आजीच्या गोष्टी हे अतिशय महत्त्वाचं माध्यम होतं. पण कालांतराने त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये आईची गोष्ट ऐकायला आणि संस्काराचे मोती या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी स्पर्धेच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अयक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, मिताली सावळेकर,माजी नगरसेविका डॉ.‌श्रद्धा प्रभुणे पाठक, सौ.वासंती जाधव,सौ. हर्षाली माथवड, पर्यवेक्षिका मोनिका जोशी , डॉ.केशव क्षीरसागर, मनिष तथा बंटीशेट निकुडे, गणेश भोसले, राज तांबोळी, नवनाथ जाधव, योगेश राजापूरकर, शंतनू खिलारे, रामदास गावडे, आकाश कातुरे,सौ.कल्याणी खर्डेकर, सौ.प्रणेती लवंगे,प्रतीक खर्डेकर, सतीश कोंडाळकर, दत्तात्रय देशपांडे,यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांवर उत्तम संस्कार होत होते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजी किंवा आजोबा लहान मुलांवर गोष्टींच्या माध्यमातून चांगले संस्कार करायचे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे प्रमाण घटले आहे. आता ही जबाबदारी आईंवर आली आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करणे आणि समाजातील वाईट प्रवृत्ती मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,‌ लहान मुलांसाठी उन्हाळ्यात मामाच्या गावाला जाणं हा वेगळाच आनंदाचा विषय असतो. याकाळात मुलांना आपले छंद मनसोक्तपणे पूर्ण करता येतात. सहलींसोबत भारतीय मैदानी खेळ कमी झाल्यामुळे, मामाच्या गावाला जाऊया उपक्रम कोल्हापूरला सुरू केला. तसाच उपक्रम पुण्यातही सुरू करणार आहे. या माध्यमातून मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, माननीय चंद्रकांतदादांचे कार्य म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असते. त्यामुळे माननीय दादा असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात. नवीन पिढी संस्कारक्षम होण्यासाठी लहान मुलांना गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे सांगतानाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व ही अभिनव स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी ह्या उपक्रमाची मोठीच मदत झाल्याची भावना ही अनेक मातांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्याचे अनुभव ही मंजुश्री खर्डेकर यांनी कथन केले.कानडी महिलेने मोडक्या तोडक्या मराठीत कथा सांगण्याचे धाडस असेल किंवा हिंदीत गोष्ट सांगणारी आई, मावळ्याच्या वेशात जीवा महाले यांची कथा सांगणारी आई असेल किंवा दर आठवड्याला मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात यावा असे सांगणाऱ्या माता सर्वांचे अनुभव समृद्ध करणारे होते असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. स्पर्धेचे परीक्षण मोनिका जोशी आणि स्वप्ना शिर्के यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले.

प्रथम पुरस्कार 25000 रोख व मानपत्र सौ. मनीषा गढरी यांना , द्वितीय पुरस्कार 15000 रुपये व मानपत्र प्रीती लांडे यांना संस्कारांचे मोती ह्या गोष्टी साठी तर तृतीय पुरस्कार नम्रता पाटील यांना शूर शिवराय या कथेसाठी रुपये 10000 रोख व मानपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रथम प्रिया लांजेवार , द्वितीय पुरस्कार अनघा दीक्षित यांना रुपये 2000/ देण्यात आले.तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धक भगिनींना 1000 रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले.