Tag: Rashtriy Majdur Sangh
राष्ट्रीय मजदूर संघाची आता महिला आघाडी | महिला कर्मचाऱ्यांना दिलासा
राष्ट्रीय मजदुर संघ कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लढत असतो पण लढाई लढत असताना महिलांना कामगार म्हणून काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सोडवायलाही विचार पीठ असल पाहिजे अस परखड मत कामगार नेते सुनील शिंदे यांनी मांडले.
निमित्त होते राष्ट्रीय मजदूर संघ व अभिव्यक्ती आयोजित राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडीचं उद्घाटन समारंभ व महिला मेळाव्याचे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम काँग्रेस भवन इथे झाला.
आज महिला व पुरुष म्हणून आपण प्रश्नाकडे पाहत राहिलो तर प्रश्न सोडवण अवघड होत पण आपण जर माणूस म्हणून जर लढलो तर प्रश्न सुटणं शक्य होईल या उद्देशाने आपणं महिला आघाडी सुरू करत आहोत असं मत अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी मांडले. या आघाडी उद्घाटन दरम्यान साफसफाई, घरकाम, दवाखाना, सुरक्षारक्षक अशा विविध क्षेत्रातील महिलांनी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या व या आघाडीची गरज अधोरेखित केली. या अडचणी सोडविण्याचा निर्धार या मेळावा निमित्त करण्यात आला. बाई माझ्या काचच्या बरणीत, मैं अच्ची हू घबराऊ नको ही गाणी तसेच महिला कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणाही घेण्यात आल्या. मुलगी झाली हो हे ज्योती मापसकर यांचं नाटक अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी सादर केलं.
संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सचिव एस.के. पळसे यावेळी उपस्थित होते. मेळाव्याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्र संचालन शंकुतला भालेराव व मेघा काकडे यांनी केले.
पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन
: कामगार नेते सुनिल शिंदे यांची माहिती
पुणे : महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या(Contract labours) विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ(RMS) या संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरआज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कंत्राटी सुरक्षा रक्षक, स्मशान भूमी कर्मचारी, पाणी पुरवठा, कीटक नाशक, झाडणकाम अशा विविध विभागातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना(PMC Commissioner) देण्यात आले.
ठेकेदार बदलला तरी कामगारांना कामावरून कमी करु नये, कंत्राटी सेवकांना दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान,कोविड भत्ता, मिळावा, पगार वेळेवर मिळावा, सुधारित वेतन फरक आणि इ. एस. आय. सी. आणि पी. एफ. विवरण पत्र मिळाले,, राष्ट्रीय सणांच्या सुट्टी मिळावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. जागरण गोंधळ आंदोलनाच्या वेळी कामगारांना संबोधित करताना राष्ट्रीय मजदूर संघ या संघटनेचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी कामगारांना आश्वासन दिले की एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही. याची संघटनेकडून खात्री आहे. मात्र कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता संघटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
या आंदोलनाची फलश्रुती म्हणजे आत्ताचे ठेकेदाराने पी.एफ. व ई. एस आय. सी आय. .कपातीचे चलन कॉपी (प्रत) संघटनेकडे सुपुर्द केली. तसेच सर्व सुरक्षा रक्षकांना गणवेश व ई. आय. एस. सी . कार्ड ताबडतोब देण्याचे मान्य केले.त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लवकरच मनपा आयुक्तांच्या दालनात संबंधित अधिकारी, ठेकेदार, व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. ठेकेदारांकडून बऱ्याच गोष्टींची पूर्तता होत आहे.आता मनपा प्रशासनाने ठेकेदारांची बिले अदा केल्यास पुढील पगार वेळेवर केलें जातील असे ठेकेदारांनी मान्य केले आहे.
या आंदोलनाचे प्रास्ताविक संघटना उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले तर समारोप संघटनेचे सरचिटणीस एस. के. पळसे यांनी केले. संघटना पदाधिकारी, सुरक्षा रक्षक, पदाधिकारी, विजय पांडव, स्वप्निल कामठे,सौ. जान्हवी दिघे,बाळू दांडेकर, उज्वल माने, अरविंद आगम, सचिन घोरपडे, रमेश भोसले, विनायक देगावकर, उमेश कोडीतकर, स्मशान भूमी प्रमुख संघटना गोरख कांबळे, पाणी पुरवठा शंकर वाडे , सोमनाथ चव्हाण, योगेश मोरे, किटकनाशक विभाग श्री. पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.