Gormale Shri Siddheshwar Yatra | भाजून काढणारी सूर्याची प्रखर उष्णता आणि आचारसंहितेचे  सावट असताना देखील गोरमाळेच्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद!

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

Gormale Shri Siddheshwar Yatra | भाजून काढणारी सूर्याची प्रखर उष्णता आणि आचारसंहितेचे  सावट असताना देखील गोरमाळेच्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद!

 
 
 
Gormale Shri Siddheshwar Yatra – (The Karbhari News Service) – जगाचा कल्याणकारी राजा म्हणून ओळखला जाणारा सूर्य (Sun) उन्हाळ्याच्या (Summer) दिवसांत तर मानवाला आपलं अस्तित्व दाखवण्याची कसलीही संधी सोडत नाही. मानवासमोर न झुकता तो तळपत राहतो. मे महिन्याच्या (May) अशा प्रखर उन्हात यंदा अधिक मासामुळे (Adhikmass) गोरमाळेची (Gormale) यात्रा आली. एकीकडे पाय भाजून काढणारी उष्णता तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे (Loksabha Election Code of Conduct) सावट. असे असताना देखील गोरमाळ्याच्या यात्रेत ‘चांगभलं’ चे सूर तेवढ्याच उत्कटतेने आळवले गेले. उस्फुर्त प्रतिसादात, सामाजिक एकोपा टिकवत भक्तिमय आणि मंगलदायी वातावरणात यात्रा पार पडली. (Gormale Village Yatra)
The karbhari - Gormale yatra song
 

अधिक मासामुळे यात्रा लांबणीवर 

 
चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची (Shri Siddheshwar Temple Gormale) तीन दिवसीय यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला ‘आंबील’ चा नैवेद्य असतो. यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली आहे. आधुनिक  जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते. यंदा अधिक मासामुळे यात्रा जवळपास 1 महिना पुढे गेली. सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दरवर्षी यात्रा सुरु होते. यंदा मात्र मे उजाडला. पारा 40 अंशाच्या पुढे गेलेला. असे असले तरी गावातील लोकांचा उत्साह आणि यात्रा साजरी करण्याची जिद्द तेवढीच दांडगी!
The karbhari - shri siddheshwar yatra gormale

सोंग सादर करण्याची अखंडित परंपरा 

यात्रेचा दुसरादिवस म्हणजे म्हणजे छबिना. छबिना ची पालखी निघताना सोंगे सादर केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक नाट्यविष्कार सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. बैलगाडया उपलब्ध नसल्या तर ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचा उपयोग केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. कित्येक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली आहे. अजूनही ही परंपरा जपली जातेय. ज्याचं नेहमीच कौतुक केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून तर तरुण मुलं उत्साहानं यात भाग घेऊ लागली आहेत. आयटी मेडिकल, इंजिनियरिंग, अध्ययन अशा सर्वच क्षेत्रातील युवक यात हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत.
The karbhari - Gormale yatra song

प्रोत्साहन मिळेल देखील मात्र उमेदीचं काय? 

 
यात्रेत सोंग सादर करण्याच्या कलेचं कौतुक होत असलं तरीही ही परंपरा अखंडित ठेवणं आणि त्यात नावीन्य आणणं ही दोन आव्हानं समोर असणार आहेत. सोंग सादर करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ही मंडळी कसलेली कलाकार नसतात. यात्रेच्या ऐन वेळी सगळी जमवाजमव सुरु असते. कधी गाडी मिळत नाही. कधी योग्य पात्र मिळत नाहीत. तर कधी पात्र मिळतात मात्र ऐन वेळेला तो कच खातो. यामुळे मग सोंग सादर करण्याचा उत्साह मावळून जातो. यामुळे नवीन गाड्या तयार होत नाहीत. गावातील लोकांकडून सोंग सादर करायला प्रोत्साहन दिलं जातं मात्र ती सादर करण्याची उमेदच आणि प्रेरणा नसेल तर मग नवीन लोकं कशी तयार होणार. यासाठी सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. गावात आता शिक्षक क्षेत्रापासून ते आयटी, मेडिकल, वकील, उद्योग, खेळ, पत्रकारिता, महसूल अशा सर्व क्षेत्रात इथल्या युवकांनी बाजी मारलीय. मात्र कला, अभिनय हे क्षेत्र मात्र या गावापासून बरंच दूर आहे. छोटेसे प्रयत्न झाले असतील देखील मात्र ते नावारूपाला आलं नाही. पुण्यासारख्या आणि इतर शहरात आणि गावांत गणेश उत्सव काळात आपली कला सादर करून काही कलाकारानी अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. सोंग हे देखील एक माध्यम ठरू शकतं. मात्र त्यासाठी ऐन वेळी प्रयत्न न करता कसदार कलेसाठी मनापासून प्रयत्न व्हायला हवेत. अगदी तसंच कुस्तीच्या बाबतीत देखील घडतं. कुस्तीला देखील गावातील काही युवक ऐन वेळी आखाड्यात उतरतात. तेच जर वर्षभर व्यायाम करणारे पहिलवान असतील तर त्यांचा आदर्श घेऊन इतर युवक पुढे येऊ शकतात. यात्रेत जसं आर्थिक नियोजन आणि अन्नदान यासारखे उपक्रम छान पद्धतीने राबवले जातात अगदी तशाच पद्धतीने यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न करायला काय हरकत आहे!! कोण जाणे .. सिद्धेश्वर यश देईल ही ..! 

Yatra in Gormale | गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र शेती

गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!  

 

| सामाजिक सलोखा जपणारी आणि नात्यांना एकत्र आणणारी यात्रा 

 
 सामाजिक एकोपा राहावा आणि लोकांमध्ये एकीची भावना वाढीस लागण्यासाठी ग्रामीण भागात यात्रा भरवण्याची प्रथा सुरु झाली. सामाजिक सलोख्याचे हेच दर्शन गोरमाळे (ता.बार्शी) गावातही दिसून येते. चैत्र महिन्यात अष्टमीला सुरु होणारी तीन दिवसीय यात्रा पंचक्रोशीत चांगलीच प्रसिद्ध आहे. यात्रेचे विशेष म्हणजे छबिना आणि सोंगे. सोंगे सादर करण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरु झाली, हे कुणी सांगू शकणार नाही. मात्र त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. त्यामुळे या सर्वांचे आणि गावाचेही सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.
 
 
चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला ‘आंबील’ चा नैवेद्य असतो. यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली जातेय. आधुनिक  जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
 सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्याविष्कार अर्थात सोंग यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. हातात कुठलाही माईक नसताना आपल्या भारदार आवाजाच्या जोरावर ‘प्रधानजी..! आपल्या कचेरीचा बंदोबस्त कैशा प्रकारे ठेविला आहे?’ ही ललकारी ऐकू येते तेंव्हा उपस्थित लोकांच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.

 बैलांची संख्या कमी झाली म्हणून काय झाले?
ग्रामीण भागात आता चांगली आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक अवजारांवर भर न देता नवीन सामग्रीचा वापर केला जातो. यामुळे साहजिकच शेतीसाठी बैलांचा वापर कमी प्रमाणात होताना दिसतो. याचे पडसाद यात्रेत उमटताना दिसतात. कारण सोंगे सादर करताना राक्षस पार्टी आणि देव पार्टी हे एकमेकासमोर शत्रू म्हणून उभे राहून भाषणाच्या माध्यमातून आव्हान देत असतात. ही गोष्ट बैलगाडीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सादर करता येते. मात्र बैलांची संख्या कमी झाल्याने या कलाकारांची ऐन वेळेला पंचाईत होते. यावर देखील याच कलाकारांनी उपाय शोधून काढला आहे. छोटे पिकअप किंवा ट्रॅक्टर च्या माध्यमातून देखील आता आपली कला सादर करण्यास सुरुवात झाली आहे. आणि यात आघाडीवर लहानगे असतात. या ‘मार्ग’ शोधण्याचे प्रयत्नाचे देखील विशेष कौतुक होत राहते. पूर्वी सोंगे सादर करणारी ठराविकच मंडळी होती. मात्र आता त्याचे सर्वांना आकर्षण वाढू लागले आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. या सहभागामुळे मात्र यात्रेतील हा पारंपारिकपणा जपण्यास मदत होणार हे नक्की आहे.
 गावात पैलवान घडणे गरजेचे!
तीन दिवसीय यात्रेत शेवटच्या दिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते. यासाठी आसपासच्या गावातून बरेच पैलवान आपली ताकद आजमावायला येतात. त्यासाठी यात्रा कमिटीच्या माध्यमातून तात्काळ रोख बक्षिसे देखील दिली जातात. पूर्वी गावातील पैलवान बरीच बक्षिसे पटकावत असत. पण आता मात्र गावात तुरळकच पैलवान दिसून येतात. त्यामुळे बाहेरच जास्त बक्षिसे जातात. यावर उपाय म्हणजे गावातच जास्तीत जास्त पैलवान घडणे आवश्यक आहे. तसे बळ युवकांना द्यायला हवंय. त्यांनीही तशी तयारी दाखवायला हवीय. जेणेकरून कुस्ती स्पर्धेत अजून व्यावसायिकता आणता येईल आणि गावाची यात्रा अजून प्रसिद्ध होईल.

Shri Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

Categories
cultural महाराष्ट्र

आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

 

:श्री सिद्धेश्वराच्या तीन दिवसीय यात्रेतून मिळवला जातो वर्षभराचा उत्साह 

 
 
संस्कृती, परंपरा टिकवून ठेवतात ती खेडीच. ही उक्ती सार्थ करण्याचे काम सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील गोरमाळे गाव करताना दिसून येते. चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. या यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली जातेय. आधुनिक आणि डीजे च्या जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
सोंग या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे नाटकांत घेतलेली भूमिका, वेष, पार्ट. तसेच ढोंग, मिष, बनावट वेष, नक्कल, आवि- र्भाव असा ही अर्थ घेतला जातो. सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्यविषकर अर्थात सोंग हे गोरमाळ्याच्या यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.
https://youtu.be/t-ICTseTPVc
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील यात्रेत छबिना असतोच. मात्र सगळीकडे सोंगे असत नाहीत. मात्र गोरमाळे गावाने ही पद्धत टिकवून ठेवलीय. डीजे च्या तालावर नाचणाऱ्या युवकांना देखील याच सोंगाचे अप्रूप आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे गावाच्या या उपक्रमाबाबत गावाचे कौतुक होते. 
 
 
गावाची यात्रा आणि उत्सवाबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी हनुमंत माळी यांनी सांगितले कि, चैत्र कृष्ण प्रतिपदेपासून पासून उत्सवाची सुरुवात होते. पहिल्या सप्ताहात नवनाथ कथा ठेवली जाते. ज्या माध्यमातून दर दिवशी कीर्तन ठेवले जाते. मुख्य उत्सव अष्टमीला सुरु होतो. 
अष्टमी ला रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत दंडवत असतात. वेशी पासून ते सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत दंडवत घेतला जातो. या काळात साधारणतः 1500-2000 लोक दंडवत घेतात. गावचे शिवाय बाहेर गावचे लोक देखील यात सहभाग घेतात. माळी पुढे म्हणाले, याच दिवशी देवाला आंबील चा नैवेद्य दिला जातो. तर दुसरा दिवस हा छबिन्याचा असतो. रात्री पालखीची मिरवणूक निघते. त्याआधी महाप्रसाद दिला जातो. देवाचे वाहन हत्ती म्हणून त्याला सजवले जाते. त्यावर राजा आणि दोन राण्यांना अंबारीत बसवून मंदिरापासून गावात मिरवणूक आणली जाते. त्याच्या मागोमाग सोंगाच्या गाड्या लावल्या जातात. पहाटे पर्यंत हा कार्यक्रम चालतो. तिसरा दिवस हा कुस्त्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असतो. माळी पुढे म्हणाले, 500 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून या परंपरा चालत आल्या आहेत. ज्या आधुनिक युगातही टिकून आहेत. शिवाय गाव आणि मंदिराबाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाताना गोरमाळे गावाहून जात असत. याबाबत वेगवेगळे प्रवाद असू शकतात. मात्र अशी आख्यायिका सांगितली जाते.
 

: एकीचे दर्शन आणि व्यवस्थापनाचे धडे 

 
सर्वसामान्यपणे शहर, राज्य आणि देशात आज काल राजकारणाचा मोठा बोलबाला आहे. सर्व थरात ते पसरले आहे. गोरमाळे गाव तरी त्यापासून दूर कसे असू शकेल. मात्र या  दिवसांत राजकारण बाजूला ठेवून सर्व एक झालेले दिसून येतात. शिवाय कुणाला हे काम कर म्हणून सांगण्याची गरज पडत नाही. कसलाही भांडण तंटा होत नाही. हे एकीचे दर्शन म्हणजे एक आदर्शच झाला आहे. 
 
शिवाय प्रत्येक कामासाठी कमिट्या देखील बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सप्ताह कमिटी, यात्रा कमिटी, अन्नदान कमिटी चा समावेश आहे. यातला प्रत्येकजण आपले काम चोखपणे बजावत असतो. ज्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडते. आधुनिक व्यवस्थापन सुद्धा जिथे थिटे पडेल, असे काम ग्रामस्थ करताना दिसतात. 
 

: गुणवंतांचा सत्कार आणि होतकरूंना प्रेरणा 

 
गावात आता युवक वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करताना दिसून येत आहेत. स्पर्धा परीक्षा मध्ये देखील तरुणांनी आघाडी घेतली आहे. यावर्षी नुकतीच दयानंद शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदी निवड झाली. तसेच राजकुमार दळवी यांची पोलीस या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे यात्रेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे होतकरू तरुणांना प्रेरणा मिळवी, या हेतूने हे सन्मान करण्यात आले. या अगोदर देखील बऱ्याच युवकांनी स्पर्धा परीक्षांत बाजी मारली आहे. 
 
कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात्रा होऊ शकली नव्हती. यंदाची यात्रा मात्र ग्रामस्थांना निखळ आनंद देऊन गेली.