Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!

Categories
Breaking News Education PMC पुणे

Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!

 Rajeev Gandhi E Learning School | गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या  राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने   (Rajeev Gandhi E learning school) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात (12th Results)!यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. (PMC Pune Rajeev Gandhi e learning school)
 महाराष्ट्रातील महानगरपालिकेत पहिल्यांदाच 93 टक्के गुण संपादन करणारे विद्यार्थी राजीव गांधी इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यलयात घडत आहेत याचा अभिमान असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल (Former Deputy mayor Aaba Bagul) यांनी अभिनंदन केले आहे.
 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  बारावी परीक्षेला २८३  विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी  चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.  अनुष्का टेमगिरे  [ ९३  टक्के ] सानिका देवकुळे [ ९१ टक्के ] विराज चिंटा  [ ९० टक्के ]  या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच महानगरपालिकेच्या विद्यालयात  वर्षिका मुथ्था हिने गणितात शंभर पैकी शंभर तर मल्टिस्किल या विषयात अनस बैग याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे.    शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून  सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत.  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी   शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही  आबा बागुल यांनी नमूद केले. (12th results)
—-
News title | Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!

1971 War : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील चित्रफिती

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील चित्रफिती

पुणे : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या युद्धावर आधारित 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशा पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफितीचे लोकार्पण दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन पुणे येथे
संपन्न होत आहे.

 

Aaba Bagul: PMC: लोकप्रतिनिधींच्या हट्टाला बळी पडून कर बुडव्यांना सवलत देणारी अभय योजना आणू नका : आबा बागुल यांची मागणी

Categories
PMC Political पुणे

 

लोकप्रतिनिधींच्या हट्टाला बळी पडून कर बुडव्यांना सवलत देणारी अभय योजना आणू नका

: काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची भूमिका

पुणे : महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वारंवार मिळकत कराची अभय योजना आणण्याचा घाट घातला जात असून प्रशासन यास मूक पाठींबा देत आहे. परिणामी पुणे महानगरपालिकेचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्नस्त्रोत असल्याने हा कर वेळेत भरावा व वेळेत कर न भरल्यास प्रति महिना २ टकके दंड घेणेबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये तरतूद केलेली आहे. हा कायदा राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे. यामध्ये एखाद्या मिळकतीबाबत निर्णय घेण्याची असलेल्या तरतुदीचा चुकीचा अर्थ काढत वारंवार अभय योजना आणणे, म्हणजे करबुडव्यांना सवलत व प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होतो. अशी भूमिका काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी घेतली आहे.

बागुल म्हणाले, लोकप्रतिनिधींनी कितीही आग्रह केला तरी आपणा महापालिकेच्या हिताचा निर्णय घेऊन कायद्यात तरतूद नसलेली अभय योजना आणू नये. पूर्वी सर्वसामान्यांसाठी मिळकत कराची अभय योजना आणली होती, हि बाब आपण समजू शकतो, परंतु करोडोची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही.

मिळकत कर वेळेत वसुल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून वेळेत कर वसूल न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या C.R. मध्ये नोंद करणेबाबत तरतूद आहे. मिळकत कर वेळेत वसूल न झाल्याने उत्पन्न कमी झाल्याने पुणेकरांना अनेक विकासकामे व प्रकल्पांपासून वंचित रहावे लागले आहे. एच.सी.एम.टी.आर. सारखा शहरातील वाहतूक समस्या सोडविणारा प्रकल्प व अशी अनेक उदाहरणे आहेत.
मिळकत कर अभय योजना आणण्याची हालचाल चालू झाल्याने माहिती घेतली असता २१७५ कोटींची थकबाकी असून १ ते २ कोटी थकबाकी पर्यंत असलेल्या मिळकतींना सवलत देणेबाबत विचार विनिमय चालू असून हे महापालिकेच्या हिताचे नाही.

तरी आपण १ ते २ कोटी थकबाकी असलेल्या मिळकतींना मिळकत कराची अभय योजना आनेस कॉंग्रेस पक्षाचा विरोध असून आपण यावर लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडू नये. असे बागुल म्हणाले.