Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु

| महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र

पुणे | कसबा पोटनिवडणुकीमुळे (kasba by-ections) शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसू लागले आहे. भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक (Aspirants)असलेले उमेदवार जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. त्यातील काहींनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची (No Objection Certificate) देखील मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता यावर भाजप कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. कालच टिळक यांनी आमच्या कुटुंबाचा विचार व्हावा, असे म्हटले आहे. (Tilak Family)

तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुक जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. टिळक कुटुंबात उमेदवारी गेली नाही तर ती आपल्यालाच मिळेल, असा कयास बांधून हे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून यातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या विभागाकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढताना दिसते आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. अशी भूमिका मी मांडली आहे. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. बाकीचे इच्छुक देखील आपल्या परीने प्रयत्न करू शकतात. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी पक्षातील वरिष्ठांचा आहे.

शैलेश टिळक

PMC election 2022 | इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे? : निवडणूक कधी होईल याचा काहीच अंदाज लागेना

Categories
Breaking News PMC Political पुणे

इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?

: निवडणूक कधी होईल याचा काहीच अंदाज लागेना

पुणे : महापालिका निवडणूक कधी होणार, हे वरचेवर गुलदस्त्यातच राहत चालले आहे. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेची अधिसूचना आणि प्रभागाचा नकाशा जाहीर केला खरा, मात्र त्यामुळे स्पष्टता येण्यापेक्षा गोंधळच वाढताना दिसतो आहे. यामुळे इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?
पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बरेच इच्छुक आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून नाही तर महिन्यापासून हे लोक निवडणूक होण्याची वाट पाहत आहेत. मात्र वाट पाहणे एवढा एकच पर्याय त्यांना वापरावा लागत आहे. कारण कितीतरी दिवस फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार अशी भाकिते वर्तवली जात होती. मात्र obc आरक्षणाच्या मुद्द्याने यावर पाणी फेरले. मग महापालिकेत प्रशासक आले. पुन्हा असे वाटले कि मे महिन्यात निवडणूक होऊ शकेल. मात्र त्यावेळी ही निराशाच पदरी आली. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टानेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे कशीतरी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. मग मरगळ झटकत महापालिका प्रशासनाने अर्धवट प्रभाग रचना जाहीर केली. यामुळे देखील स्पष्टता येत नाही.
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी 17 मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र त्याआधीच प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांना खरेच वाटेना. मग महापालिकेच्या वेबसाईट वरील नकाशे बघून सत्यता पटू लागली. मात्र अजूनही चित्र स्पष्ट व्हायला तयार नाही. कारण आता आरक्षण कधी जाहीर होणार? याबाबत उत्सुकता आहे. बरं आरक्षण जाहीर झाले तरी निवडणूक जून महिन्यात होणार कि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याबाबत ही कुठली निश्चितता आलेली नाही. कारण जून च्या शेवटी निवडणूक घ्यायची म्हटले तर ते शक्य होताना दिसत नाही. कारण त्याच कालखंडात पालखीचे आगमन होणार आहे. यावेळी तर मुक्काम देखील वाढला आहे.  पालखीच्या आधी घ्यायचे म्हटले तर प्रशासनाची तेवढी तयारी अजून नक्कीच झालेली नाही. अशातच निवडणूक आयोगाचे नवीन आदेश आले तर काय सांगावे? दुसरा पर्याय मग सप्टेंबर ऑक्टोबर चा. कारण त्यावेळी प्रशासकाचा सहा महिन्याचा कालावधी देखील पूर्ण होईल. शिवाय पावसाळा ही संपला असेल.  मग राज्य सरकार याआधी जेव्हा निवडणूक घ्यायची म्हणत होते, तेव्हाच होणार असे दिसते. कोर्टाच्या याचिकेचातसा फार फायदा झाला, असे म्हणता येत नाही.
पण या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण निवडणूक कधी लागणार, याबाबतची संदिग्धता मात्र तशीच आहे!

Aspirants : PMC election : मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न  : यात्रा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रमावर भर 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न

: यात्रा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रमावर भर

पुणे : महापालिका निवडणूक (PMC election) जवळ आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी (All political parties) जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे सगळ्या पक्षामधील इच्छुक (Aspirants) देखील कंबर कसून कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये खासकरून काशी यात्रा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा, यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने नागरिक देखील याला प्रतिसाद देत आहेत.

पुणे महापालिकेसह राज्यातील मोठ्या महापालिकांची मुदत मार्च 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. पण, करोना आणि आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणूक झाल्यास आतापर्यंत आचारसंहिता लागू होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यातच आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा राजकीय मंडळींनी सूर आवळला होता. मुदत संपणाऱ्या महापालिकांवर प्रशासक नियुक्‍त करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. त्यावर सुनावणीही पार पडली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यावरून निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांकडूनदेखील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. इच्छुक उमेदवाराची प्रतिमा, त्यांचा संपर्क, आर्थिक क्षमता, मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड आदी बाबींचा त्यासाठी आढावा घेतला जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

 

गेले दोन वर्षे करोनामूळे भीती आणि चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता करोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याने संसर्गाचा धोका बराच कमी झाला आहे. त्यामुळे करोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध आता शिथिल होत आहेत. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-वारांच्या दिवशी गाठीभेटींचा कार्यक्रम आयोजनावर जोर दिला आहे.