Labour Meeting | कामगार कायदे टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार | आमदार भाई जगताप

Categories
Breaking News Political social पुणे

Labour Meeting | कामगार कायदे टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार | आमदार भाई जगताप

Labour Meeting | कामगार कायदे (Labour Law) आपला श्वास आहे तो टिकवायचं असेल तर त्यासाठी संविधान टिकल पाहिजे पण हे बदलायच काम सध्याचं केंद्र सरकार (Central Government) करत आहे. असं प्रतिपादन कामगार नेते व आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap) यांनी केले. राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यामध्ये (Labour Meeting) ते बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोघेही मालक धार्जीने निर्णय घेत आहेत या निर्णयामध्ये कामगारांना विश्वासात घेतले जात नाही ही बाब अत्यंत गंभीर असून यापुढे कामगारांनी रस्त्यावर उतरूनच लढलं पाहिजे. (Labour Meeting)
       यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले कष्टकऱ्यांच आयुष्य घडवण्याचं काम जर पाहायचं  असेल व शून्यातून जग कसं निर्माण होत हे शिकायचं असेल तर राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या लढा समजून घेतल पाहिजे असे गौरवोद्गार काढले.
संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की कायम कामगार असो की  कंत्राटी की बदली कामगार की गिग वर्कर यांच्या मनातील भिती घालवायचं, कामगारांना लढायची हिम्मत देण्याचं काम राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या स्थापनेपासून  राहिल आहे. याप्रसंगी समान कामाला समान वेतन मिळालच पाहिजे, कामगार विरोधी धोरण व कायदे रद्द करा या घोषणा व आभाळाची आम्ही लेकरे, मेरा रंग दे बसंती चोला ही गाणीही घेण्यात आली. असंघटीत कामगारांची ओळख असलेल्या इ-श्रम कार्ड घरेलु कामगार महिलांना प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते व आमदार भाई जगताप हे उपस्थित होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी अध्यक्ष अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे व  विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये घरेलू कामगार, बांधकाम मजूर,
पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार, कंपन्यांमधील कामगार, हॉस्पिटल संघटित व असंघटित क्षेत्रातील सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, ऑटो रिक्षा चालक, स्विगी, झोमॅटो, ओला उबेर, अर्बन कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले.

Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- कामगार कायद्यातील बदलांमुळे रोजगारामध्ये वाढ होईल, असे केंद्रीय कामगार मंत्री यांनी पुणे येथे जाहीर केले. हा त्यांचा दावा पूर्णपणे हास्यास्पद आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले वास्तविक पाहता नवीन रोजगार निर्मिती होईल व त्यांना कायम काम मिळेल. असे कोणतेही धोरण व तरतूद कामगार कायद्यामध्ये नाही. याउलट कामगारांना कायम न करता, कोणतेही लाभ न देता, कसे काम करून घेता येईल असे “फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट” सारखा काळा कायदा करण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. यामुळे यापुढे कायम कामगार ही संज्ञा संपुष्टात येईल. अशी भीती कामगार वर्गात निर्माण झाली आहे. आठ वर्षांमध्ये किती कामगारांना कायम रोजगार मिळाला. ते कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. जर आकडेवारी आपण पाहिली तर असे निदर्शनास येते की, कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असून, त्याठिकाणी कंत्राटी कामगार व तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार, रोजंदार कामगार, असंघटित कामगार ही संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या देशात काम करत असणाऱ्या कामगारांपैकी 95 ते 97 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रांमध्ये आलेले असून 3 ते 5 टक्के कामगार हे फक्त संघटित क्षेत्रामध्ये राहिले आहेत. परंतु कामगार कायद्यातील नवीन होऊ घातलेल्या धोरणामुळे कायम कामगार संख्या संपुष्टात येऊन, फक्त रोजंदारी, कंत्राटी आणि असंघटित कामगार हेच त्या ठिकाणी राहतील. त्यामुळे कामगारांना कोणताही फायदा मिळणार नाही.

दुसऱ्या बाजूला असंघटित कामगारांची नोंदणी केली. अशा बढाया कामगार मंत्री मारत आहेत. कोरोना महामारी च्या, लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशांमध्ये असंघटित कामगारांची अवस्था काय आहे. हे जगाने पाहिले आहे. त्या वेळेला सामाजिक संस्था, कामगार संघटना, न्यायालय यांनी सरकारला जाब विचारल्यावर, मग या कामगारांची नोंदणी करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलं. आणि म्हणून ईश्रम पोर्टल या नावाखाली अनेक कामगारांची नोंदणी केली, परंतु या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना सरकारने काय दिले? तेही कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. या सर्व कामगारांना कोणताही फायदा आतापर्यंत देण्यात आलेले नाही. किंबहुना आहे ते कामगार कायदे शिथिल करायचे, कामगार संघटना कमजोर करायच्या आणि उद्योग धारजिने धोरण स्वीकारायचे. असे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.

असंघटित कामगारांमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर सामील झाला आहे. त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्या कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा करायचं काम कोठेही कामगारमंत्री करीत नाहीत. आणि म्हणून नवीन कामगार धोरणामुळे व कामगार कायद्यामध्ये होऊ घातलेल्या सुधारणांमुळे देशांमध्ये रोजगार निर्मिती होईल, हे केंद्रीय कामगार मंत्री यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आता तरी त्यांनी जागे होऊन या सर्व कामगारांना, कामगार संघटना ना भेट देऊन, चर्चा करून, त्यावर अपेक्षित बदल ते सर्वसमावेशक करावेत. असे कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.