Mahatma Gandhi Pune Connection | महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली होती त्या खोलीची अजित पवार यांच्याकडून पाहणी!

Categories
Breaking News cultural Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Mahatma Gandhi Pune Connection | महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली  होती त्या खोलीची अजित पवार यांच्याकडून पाहणी!

| डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे |  उपमुख्यमंत्री अजित पवार

Mahatma Gandhi Pune Connection | शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून (David Sasoon) आणि जेकब ससून (Jacob Sasoon) या त्याच प्रकारच्या इमारती असून त्यांचे नूतनीकरण वारसा असलेल्या इमारतीला साजेसे व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिले. तसेच महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली  होती त्या खोलीची पाहणी यावेळी श्री. पवार यांनी केली. (Mahatma Gandhi Pune Connection)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज डेव्हिड आणि जेकब ससून रुग्णालय वारसा इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाची आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, महामेट्राचे संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी आदी उपस्थित होते.
डेव्हिड ससून आणि जेकब ससून इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नुतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. नूतनीकरणासाठी साहित्य चांगल्या प्रतीचे वापरावे,  सिलींग व्यवस्थित असावे, रंगरंगोटी आकर्षक असावी, विद्युतीकरणाची कामे, जिन्याची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तत्व आहे. त्याचे नूतनीकरणही त्याच पद्धतीने होणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी करताना श्री. पवार म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक अधिक ठिकाणी लावण्यात यावेत. मेट्रो भवनाचे काम, दिवाणी न्यायालय ते स्वारगेट भूमीगत मेट्रोचे काम आणि रामवाडी ते रूबी हॉल मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.  दीक्षित यांनी मेट्रोस्टेशनच्या कामाबाबत माहिती दिली.
000

Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

Categories
Breaking News cultural Education social देश/विदेश पुणे

Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

Aga Khan Palace | G20 in Pune  | जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी (G 20 Summit In Pune) आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला (Aga Khan Palace) भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे  पारंपरिक पद्धतीने औक्षण करून  स्वागत करण्यात आले. (Aga Khan Palace | G20 in Pune)
आगाखान पॅलेसमधील (Aga Khan Palace) अनेक दालनांना परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi), कस्तुरबा गांधी (Kasturba Gandhi) आणि खासगी सचिव महादेव भाई देसाई  (Mahadev Bhai Desai) यांच्याशी निगडित घटना आणि इतिहास जाणून घेतला.  प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधी हे सर्व पाहून भारावून गेले होते. अन्य परदेशी प्रतिनिधींनीदेखील येथे  छायाचित्रे काढून घेऊन  आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला.  बहुतेक प्रतिनिधींनी आपल्या जवळील मोबाईलमध्ये  छायाचित्रण कैद करुन घेतले. (Aga khan palace pune)
महात्मा गांधी यांच्या वापरातील अनेक वस्तू आणि अनेक प्रसंगाशी निगडित छायाचित्रे  येथे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्याचाही आनंद परदेशी पाहुण्यांनी घेतला. या स्मारकाशी संबंधित असलेल्या नीलम महाजन यांनी परदेशी प्रतिनिधींना या ऐतिहासिक वास्तूविषयी संपूर्ण माहिती दिली.  (Mahatma Gandhi pune residence)
यावेळी कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन परदेशी पाहुण्यांनी अभिवादन केले.
000
News Title | Aga Khan Palace |  G20 in Pune |  G-20 Conference delegates visit the historic Aga Khan Palace in Pune

Mahatma Gandhi | गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

| महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दल आयोजित एकदिवसीय कार्यशाळा

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी विचार दर्शन ‘ या एकदिवसीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे झाली.

या कार्यशाळेत संजय आवटे (संपादक, लोकमत पुणे),डॉ.उल्हास बापट,(कायदे तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक),डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) यांनी मार्गदर्शन केले.

माजी उपमहापौर श्रीकृष्ण बराटे,मच्छिंद्र बोरडे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे,असलम बागवान, उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.सुदर्शन चखाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला राज्यभरातून मोठी उपस्थिती होती.

गांधी भवनच्या पुढाकाराने गांधी विचार दर्शन शिबीर दरमहा होणार असल्याची घोषणा डॉ.कुमार सप्तर्षी यांनी उद्घाटन सत्रात केली.

ते म्हणाले, ‘ गांधी विचार दर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे.गांधी हे स्वतःवर प्रयोग करणारे व्यक्ती होते. प्रत्येक गोष्ट त्यांनी घडवत घडवत आणली. त्यामुळे त्यांच्यात आश्वासकता आहे. त्याची मुळे भारतीय संस्कृतीत आहेत. सर्वसमावेशक राष्ट्रवाद त्यांनी आणला. आधुनिक भारत हे गांधीजींचे स्वप्न होते.गांधीजीची ११ व्रते अनुकरणीय आहेत. गांधी हे भारतीयत्वाचा अर्क आहे.विषमता, शोषणामुळे, सामाजिक उतरंडीमुळे भारतात गरीबी आली, हे गांधींजींच्या ध्यानी आले.

गांधीजींची थोरवी जगाने मान्य केली. पण, पुण्याने आणि पुण्यातील एका समुदायाने मान्य केली नाही, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगीतले.

पाहिजे तसा इतिहास पुस्तकात बदलून प्रत्यक्ष इतिहास बदलत नाही. हे खोट्या जमातीला सांगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

| गांधीजींचे संवादाचे मॉडेल विसरू नका : संजय आवटे

संजय आवटे म्हणाले, ‘ पुण्यात पेशवाई संपल्यावर इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांचे राज्य घालवून पुन्हा पेशवाई येईल असे वाटणारे लोकही होते. येणारा कालखंड त्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. खरा इतिहास पुसला जात असेल, आणि सोयीचा इतिहास सांगीतला जाणार असेल तर गांधी भवन ने खरा पर्यायी अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. आजचा कालखंड गांधी विचारांसाठी चांगला आहे. गांधींसमोरचा कालखंड आणखी भयंकर होता.

हिटलर, मुसोलिनी, गांधी एकाच काळात उदयास आले. पण महात्मा होण्याचे सामर्थ्य गांधीनी मिळवले. गांधींचे संवादाचे मॉडेल त्यांच्या विरोधकाने हायजॅक केले. गांधी समर्थकांना गांधींचे संवादाचे मॉडेलच कळले नाही. गांधीजींच्या लढयातून ६० देशांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य मिळवले.

१९१६ पासून गांधीजींनी शेतमजूर, हरिजन यांचा पक्ष घेणे सुरू केले. आंबेडकरांइतकाच गांधींजींचा विद्रोह महत्वाचा आहे. मी सनातन हिंदू आहे, असे सांगत त्यांनी परिवर्तन घडवून आणले.

| गांधींजीनी भारताला ‘ भारतपण’ मिळवून दिले

संजय आवटे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसवर ताबा घ्यायचा डॉ.मुंजे, हेडगेवार यांचा प्रयत्न १९२o च्या नागपूर अधिवेशनात फसला. म्हणून हिंदुत्ववाद्यांनी १९२५ साली स्वतंत्र संघटना काढली. टिळक युग जाऊन गांधी युग आलेले प्रस्थापितांना रुचले नाही. म्हणून गांधी मार्ग समजून घेता आला पाहिजे. गांधीजींच्या सोबत हमाल होतेच, पण टाटा, बिर्ला देखील होते.

गांधीजींनी परंपरेचा अवकाश पकडला होता.तुकाराम, ज्ञानेश्वर,परंपरांचा अवकाश पुरोगाम्यानी सोडल्याने तो इतरांनी व्यापला. गांधी, नेहरू, आंबेडकर म्हणूनच समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. ‘ आयडिया ऑफ इंडिया ‘ समजून घ्यायला हवी. काहींना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा होता, पण गांधीनी भारताला भारतपण मिळवून दिले. भारताच्या वैविध्यालाच गांधीजींनी बलस्थान केले. नेहरूंनी या भारताला आधुनिक रूप दिले. आंबेडकरांनी त्याला घटनेची शिस्त दिली.