Tag: Pakistan
बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत (India) सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी कारवाया (Terror) करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP President Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी पुणे येथे केली.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मा. मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. (Bhartiya Janata Party)
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मा. मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,आमदार माधुरीताई मिसाळ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेविक आदी उपस्थित होते
मध्यरात्री पाकिस्तानमधील सरकार पडलं
: इम्रान खान यांना पदावरून हटवले
इस्लामाबाद: सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. (Imran Khan)शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला. (Imran Khan)
‘नॅशनल असेंब्ली’च्या सभापती असद कैसर यांनी देखील इम्रान यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली व सभापतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी इम्रान यांच्याबरोबरील ३० वर्षांच्या मैत्रीचा हवालाही दिला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान घेणे बंधनकारक होते. न्यायालयाचा निकाल न मानल्यास सभापतींवरही टांगती तलवार होती. त्यापासून कैसर यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ उपसभापतींनीही राजीनामा दिला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी नॅशनल असेंब्लीतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.
दिवसभरात
शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान शक्य
लुधियाना न्यायालय स्फोट : पाकिस्तानचा हात असल्याचा संशय
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या आयएसआयचा पाठींबा असलेला खलिस्तान समर्थित गट लुधियाना न्यायालयात स्फोट या हल्ल्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमागे असू शकतो.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लाल किल्ल्यातील घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा पंजाबमध्ये खलिस्तानी सैन्याच्या हालचालींना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांवर बारीक नजर ठेवत होती. पाकिस्तानातील हँडलर त्यांच्या जमिनीवर काम करणाऱ्यांना पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या सूचना देत होते. राज्य पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत असे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असेही ते म्हणाले.
“आम्हाला पाकिस्तानच्या ISI द्वारे समर्थित असलेल्या खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी स्थानिक टोळ्यांना भाड्याने आणि कट्टरपंथी बनवण्याबाबत विशिष्ट माहिती मिळाली. आम्ही हे इनपुट स्थानिक पोलिसांसोबत सामायिक केले आणि जामिनावर सुटलेल्या किंवा फरार झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी राज्यभर चालवलेले ऑपरेशन. गेल्या काही महिन्यांत केलेली वसुली ही हिमनगाच्या अगदी टोकाची होती,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नोव्हेंबरमध्ये पठाणकोटमधील लष्करी छावणीच्या गेटजवळ ग्रेनेड स्फोटाची घटना देखील स्थानिक गुन्हेगारांनी राबवलेली एक दहशतवादी कृती होती, असेही त्यांनी नमूद केले.
“या वर्षी पंजाबजवळ मानवरहित हवाई वाहनांच्या सुमारे 42 ड्रोन दृश्यांची नोंद झाली आहे आणि अनेकांची नोंद झाली नाही. पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनचा वापर करून स्फोटके आणि लहान शस्त्रे टाकण्यात आली आहेत, याचा उपयोग राज्यातील शांतता अस्थिर करण्यासाठी केला जाईल,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या पाच महिन्यांत पंजाब पोलिसांनी सीमावर्ती शहरांमधून सात टिफिन बॉम्ब आणि 10 हून अधिक हातबॉम्ब जप्त केले आहेत.
या वर्षी ऑगस्टमध्ये पंजाब पोलिसांनी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या पुतण्याचा मुलगा गुरुमुख सिंग याला अटक केली होती आणि त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. तपासात, असे आढळून आले की त्याला पाकिस्तानच्या ISI आणि इतर पाकिस्तान-आधारित खलिस्तान समर्थक दहशतवादी गटांकडून पंजाबमध्ये अनेक दहशतवादी हल्ले करण्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट मिळत होता, ज्यामध्ये राज्य निवडणुकांपूर्वी दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात होते.