Sarasbagh Chaowptty | सारसबाग चौपाटी कारवाई थांबवण्यात यावी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

सारसबाग चौपाटी कारवाई थांबवण्यात यावी

: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : गेल्या ६० वर्षांपासून असणाऱ्या सारसबाग चौपाटीवर अचानकपणे झालेली कारवाई चुकीची आहे. येथे व्यवसाय करणारे व्यवसायिक गेल्या ६० वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. त्यांची दुकाने अशी अचानक पणे सिल करणे देखील चुकीचे आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित करावी व सर्व व्यावसायिकांना जागा ठरवून देत त्याप्रमाणे कर लावण्यात यावा व पुन्हा ही चौपाटी सुरू करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनानुसार शहरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सारस बागेत असणारी चौपाटी हे कधी ना कधी भेट दिलेले हे कधी ना कधी भेट दिलेले ठिकाण आहे. पुणे महानगरपालिकेच्या कॉफीटेबल बुकमध्ये अभिमानाने सारसबाग चौपाटी चे नाव “प्राईड ऑफ पुणे” म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेत ने अतिक्रमण विरोधी कारवाई करत संपूर्ण चौपाटी सिल केली आहे. मुळात सारसबाग चौपाटी ही ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावर कुठलीही रहदारी नाही, इतर कुठल्याही मोठ्या वाहनांची ये-जा होत नाही. त्या रस्त्याला जर गेल्या ६० वर्षांपासून असणाऱ्या चौपाटीवर अचानकपणे झालेली कारवाई चुकीची आहे. येथे व्यवसाय करणारे व्यवसायिक गेल्या ६० वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. त्यांची दुकाने अशी अचानक पणे सिल करणे देखील चुकीचे आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित करावी व सर्व व्यावसायिकांना जागा ठरवून देत त्याप्रमाणे कर लावण्यात यावा व पुन्हा ही चौपाटी सुरू करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.विक्रम कुमार यांना करण्यात आली. याबाबत येत्या गुरुवारी २६ मे रोजी आयुक्तांच्या दालनात याबाबत बैठक आयोजित करत या प्रश्न सोडविणार असल्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
“निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्व स्टॉलधारकांच्या पाठीशी आहे, कारण या स्टॉलवर येणारा ग्राहक हा सर्वसामान्य पुणेकर असतो.त्या सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणारी ही चौपाटी वाचली पाहिजे , हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे.
पुणे शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेली अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे बऱ्याच ठिकाणी व्यवसायिक अडचणीत आले आहेत, अगोदरच कोविडच्या काळात २ वर्ष सर्वांचे व्यवसाय बंद होते.ते पुन्हा सुरू झाले असतानाच आता पुन्हा अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी सामंजस्याने मार्ग काढला गेला पाहिजे. शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यवसायिक अडचणीत येऊ नयेत ही आमची प्रामाणिक मागणी आहे”,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी
समवेत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम व सारसबाग चौपाटीतील व्यवसायिक देखील उपस्थित होते.