Corona : positive news : कोरोनाबाबत चांगली बातमी : शहरात आज एक ही मृत्यू नाही 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

कोरोनाबाबत चांगली बातमी : शहरात आज एक ही मृत्यू नाही

 

पुणे : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळून आला होता. तेंव्हापासून पुणेकर कोरोनाचा धीराने सामना करत आहेत. महापालिका आणि इतर प्रशासन देखील याचा प्रकोप कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच लास आल्यामुळे हे काम अधिकच सोपे झाले होते. तरीही शहरात अजूनही कोरोना रुग्णाची संख्या आढळून येतेच आहे. मात्र आता ही संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. कारण गेल्या कित्येक दिवसानंतर शहरातील अक्टीव रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. तीआता ९८८ झाली आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

: अक्टीव रुग्णाच्या संख्येतही घट

शहरात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. मात्र आता त्याचा जोर कमी होताना दिसतो आहे. त्यासाठी महापालिकेच्या  उपाययोजना कामी आलेल्या दिसून येत आहेत. त्याला नागरिकांची देखिल चांगलीच साथ मिळाली आहे. कोरोनाचा  कहर सुरु झाल्यापासून महापालिकेच्या वतीने विभिन्न उपाय योजना राबवल्या आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारची साथ मिळाली. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या लास आल्यामुळे कोरोनाच कहर कमी होण्यात चांगलीच मदत मिळाली. लसीकरणात देखील राज्यात पुणेच पुढे आहे. एवढे करूनही शहरातील अक्टीव रुग्णांची सख्या कमी होत नव्हती. मात्र आता गेल्या दोन आठवड्यापासून याचा जोर पहिल्यापेक्षा कमी होताना दिसतो आहे. कारण आता अक्टीव रुग्णाची संख्या देखील कमी होताना दिसते आहे. गेल्या कित्येक दिवसानंतर अक्टीव रुग्ण संख्या हजाराच्या खाली आहे. अर्थातच रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शहरात दररोज मृत्यू होत होते. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात शून्य मृत्यू आढळले होते. त्यानंतर आताच ही संख्या शून्य वर आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

 

पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.

        मुरलीधर मोहोळ, महापौर

shops : hotel : शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार 

Categories
PMC पुणे

शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार

: महापलिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : शहरातील कोरोनाचा कहर कमी होताना दिसतो आहे. शहराप्रमाणे राज्यातही हे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून आता व्यापारी दुकाने आणि हॉटेल, फूड कोर्ट यांची वेळ वाढवण्यात आली आहे. पुणे शहरात आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

:  निर्बंध शिथिल

शहरात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महापलिका प्रशासनाने बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लादले होते. त्याचा सर्वात जास्त फटका व्यापारी दुकाने आणि हॉटेलला बसला होता. व्यापाऱ्या कडून हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र हे निर्बंध हटवण्यात आले नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निर्बंध हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता महापालिका आयुक्तांनी देखील याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. त्याचप्रमाणे अमुझमेंट पार्क, इंडस्ट्रीज देखील २२ पासून सुरु करण्यात येतील. यामुळे सर्वाना दिलासा मिळाला आहे.

 

 

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी!

: सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का?

: नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का?

: मनपा आयुक्त व आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे: महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी योगिता गोसावी यांना महापालिकेत मानसोपचारतज्ञ वर्ग 1 या पदावर नोकरी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टला त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारचे निर्देश आहेत कि अधिकाऱ्याची पत्नी अथवा पती किंवा जवळचे नातेवाईक त्यांच्या अधिपत्याखाली नियुक्त करू नयेत. सरकारच्या नियमांचे पालन करत आरोग्य प्रमुख त्यांच्या पत्नीची नियुक्ती रद्द करणार का किंवा आरोग्य प्रमुख आपला संपत आलेला कार्यकाळ वाढवून घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय प्रशासनाचे प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

: मानसोपचारतज्ञ म्हणून नियुक्ती पत्र

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मानसोपचारतज्ञ या पदासाठी 20 एप्रिल 2020 रोजी जाहिरात दिली होती. त्यानंतर 8 मार्च 2021 ला कर्मचारी निवड समितीची बैठक झाली.  ज्यावेळी आरोग्य प्रमुख महापालिकेत रुजू झाले होते. नंतर मुख्य सभेत 19 जुलै ला नियुक्ती चा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार 30 आगस्ट ला आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांची पत्नी योगिता गोसावी आणि निखिल मानकर यांना मानसोपचारतज्ञ या पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारचे निर्देश आहेत कि अधिकाऱ्याची पत्नी अथवा पती किंवा जवळचे नातेवाईक त्यांच्या विभागात नियुक्त करू नयेत. महापालिका सामान्य प्रशासनाचे म्हणणे आहे की अपरिहार्य कारण म्हणून नियुक्ती रद्द करता येत नाही. मात्र सरकारच्या नियमांचे पालन करायचे झाले तर आरोग्य प्रमुख त्यांच्या पत्नीची नियुक्ती रद्द करणार का किंवा आरोग्य प्रमुख आपला संपत आलेला कार्यकाळ वाढवून घेणार का? कारण आरोग्य प्रमुखांचा कार्यकाळ ऑक्टोबर मध्ये संपत आहे. कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. मात्र आयुक्तांनी यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारचा नियम पाळण्यासाठी आरोग्य प्रमुख दोन्ही पैकी कुठला निर्णय घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची ही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

: काय आहेत सरकार चे आदेश?
शासकीय अधिकाऱ्यांचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक हे थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या हाताखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने  काढले आहेत. बदल्या किंवा नवीन नियुक्ती करताना ही दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे  यापुढे एकाच शासकीय कार्यालयात पती, पत्नी वा त्यांचे जवळचे नातेवाईक यांचा भरणा असल्याचे चित्र दिसणार नाही. राज्य शासनाने पहिल्यांदाच असे परिपत्रक काढले आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने सर्व राज्य सरकारांना अलीकडेच एक पत्र पाठवून असे पती-पत्नी-नातेवाईक एकत्रीकरण रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत. कार्यालयात नातेवाइकांचा भरणा झाल्यानंतर भ्रष्टाचार, पक्षपात, वशिलेबाजीला आसरा  मिळतो असे लक्षात आल्यानंतर  हे पाऊल  उचलले आहे.
या विषया संदर्भात राज्य सरकारचे जे नियम आहेत त्याचे यथायोग्य पालन केले जाईल.

     डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका.