100 percent syllabus | चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

मुंबई | शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.

Student Accident Sanugrah Grant | पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

 

मुंबई:- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.

सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे. या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा समावेश राहणार नाही.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली जाईल.

या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. तर, बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Varsha Gaikwad : Sports Marks : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

मुंबई :- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री  वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींची प्रलंबित रजा मंजुर : शिक्षणमंत्र्यांनी सीईओंना दिले निर्देश

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

डिसले गुरुजींची प्रलंबित रजा मंजुर

: शिक्षणमंत्र्यांनी सीईओंना दिले निर्देश

मुंबई : जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक ग्लोबल टीचर पुरस्कार सन्मानित रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे सतत चर्चेत असतात. त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते त्याकरीता त्यांनी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात मागील महिन्यात २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला होता मात्र अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली होती, यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. अध्ययनासाठी मागितलेली त्यांची रजा प्रलंबित ठेवल्याने सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीचे सूर उमटलेले दिसून आले. आता मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयात पुढाकार घेत डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा केलाय. शिक्षणमंत्र्यांनी सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिलेत. खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हि माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली.

सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी अमेरिकेत जाऊन PH.D करण्याकरीता जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात ध्ययन रजेचा अर्ज दिला होता. यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची डिसले यांनी भेट घेतली होती मात्र यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डिसलेंना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना भेटण्यास सांगितले. जेव्हा डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा अध्ययन रजेची परवानगी नाकारत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक असल्याचे सांगत तुम्ही जर अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेलात तर शाळेचे काय होणार; असा प्रश्न उपस्थित केला होता सोबत एवढी प्रदीर्घ रजा देणे शक्य नाही असे स्पष्ट सांगत तुम्हीच यावर उपाय शोधा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते.

प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी रणजितसिंह डीसले जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे नियुक्तीच्या ठिकाणी ३ वर्ष गैरहजर होते असा आरोप करीत त्यांनी त्या कालावधीतील पगार सुद्धा घेतला.सोबत एखादा कर्मचारी जेव्हा देश सोडून जातो, तेव्हा त्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते मात्र कुणालाही कल्पना न देता डिसले गैरहजर राहिलेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.