Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

| साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

Pune Book Festival | पुणे – जागतिक स्तरावरील पुस्तक महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळाली आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी नटलेला हा पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav) आजपासून सुरू होत आहे. या महोत्सव पुणेकरांनी एकत्र येत यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. (Pune Book Festival)

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापलिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक विशाल चोरडिया, जय काकडे, सुशील जाधव, कृष्णकुमार गोयल, शहीद भगतसिंग यांचे पणतू यागवेंद्र सिंग संधू, प्रकाशक राजीव बर्वे, डीईएसचे डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते. मोहन शेटे लिखित हिंदवी स्वराज्य स्थापना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स पुस्तक एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापना हे पुस्तक सुद्धा एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या पुस्तक महोत्सवात कोथरूड मतदार संघातील पुस्तक घेणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी कोथरूड आणि बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहरात सांस्कृतिक दृष्ट्या मोलाची भर पडली आहे. असेच महोत्सव राज्यातील इतर शहरांमध्ये सुरू व्हावेत. दिल्ली, जयपूर येथील विविध फेस्टीव्हल पाहिले आहेत. हे फेस्टीव्हल ठराविक लोकांपुरता मर्यादित असतो. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला जनतेचा सोहळा करून, सामान्य जनतेला, माध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांना वाचन संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. अशा पद्धतीने सामान्य लोकांसाठी परिश्रम केले आहे. त्याबाबत अभिनंदन केले पाहिजे. मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी सर्वांना ज्ञानासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीचा फटका बसला आहे. पायरसीमुळे पुस्तकांना फटका बसला आहे. पुस्तक विक्री कमी होते, अशी खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद पुढील आठ दिवस देत, महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी पुस्तक महोत्सव पाहिले मात्र, विश्वविक्रमानी सजलेला पुस्तक महोत्सव पहिल्यांदाच पाहतोय. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आता, यापुढे आपल्या पुण्याला देशातील पुस्तकांची राजधानी करायचे आहे. त्यासाठी पुणेकरांनी पुढे येऊन, महोत्सवाला पाठिंबा द्यायचा आहे. या पुस्तक महोत्सवाला देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध करायचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात पुढील आठ दिवस सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शहीद भगतसिंगांनी जेलमध्ये लिहिलेली डायरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली संविधानाची मूळ प्रत, छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित एतिहासिक कागदपत्रे पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत एकूण १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यातील ३२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी होईल. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.

….
भगतसिंगांनी रचलेल्या मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यापासून म्हणजे १९३१ पासून महाराष्ट्र आणि भगतसिंग यांचे ऋणानुबंध आहे. भगत सिंग यांनी जेलमध्ये १०० पेक्षा अधिक पुस्तके वाचली. आपण सुद्धा अशाच प्रकारे पुस्तके वाचायची आहे. आगामी काळात आपल्याला देशात अधिकाधिक भगत सिंग घडवायचे आहेत, असे यागवेंद्र सिंग यांनी आवाहन केले.

—-

सलग तिसरा विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या उपक्रमांत सलग तिसऱ्या दिवशी गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येत १८ हजार ७६० पुस्तकांच्या माध्यमातून जयतु भारत हे वाक्य तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून, बनविण्याचा हा रेकॉर्ड आहे. यापूर्वीचा, रेकॉर्ड हा सौदी अरेबियाच्या नावावर होता. तेथे ११ हजार १११ पुस्तकांच्या माध्यमातून वाक्य तयार करण्यात आले होते. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली. विश्वविक्रम झाल्यानंतर मैदानावर देशभक्तीपर गाण्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला; तसेच मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Ferguson College | फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

Categories
Education social पुणे

फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

| विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुकीचे धडे आणि शिकाऊ परवाना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.’’

वाडकर म्हणाले, ‘‘छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, नेहा जाधव, शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

swatantryaveer savarkar : ferguson College : सावरकर पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम

Categories
cultural social पुणे महाराष्ट्र

सावरकर पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson college) वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या स्वाती जोगळेकर, प्राजक्ता प्रधान, आनंद काटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते. महाविद्यालयाने याखोलीचे एका स्मारकामध्ये रुपांतर केले आहे. सावरकरांचा अर्धपुतळा, पदवी स्वीकारतानाचा अंगरखा, त्यांची काही प्रचित्रे, पुस्तके आदी स्वरुपात त्यांच्या स्ती जतन केल्या आहेत. सावरकरांचे वास्तव्याने पावन झालेली ही ऐतिहासिक खोली विद्यार्थ्यांचे प्रेरणा स्थान बनली आहे.