Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा  | ८० जणांचे रक्तदान

| महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Narendra Dabholkar | खून करणे ही हिंसा आहे, तर खून देऊन इतरांचे प्राण वाचवणे ही अहिंसा आहे, असा संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांना 80 जणांनी रक्तदान करून अभिवादन केले.

 स्वातंत्र्यदिनी एस एम जोशी सभागृह येथे महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यंदा या शिबीराचे हे तिसरे वर्ष होते. शिबिरासाठी 203 जणांची नोंदणी होऊन त्यातून 80 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती या शिबीराचे समन्वयक विशाल विमल यांनी दिली. डॉक्टर दाभोलकर यांना रक्तबंबाळ करून त्यांचा प्राण घेणाऱ्या हिंसक प्रवृत्तीला, दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवण्याची थेट कृती हे अहिंसात्मक, मानवतावादी उत्तर आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

शिबिरामध्ये विविध क्ष्रेत्रातील मान्यवर व नागरिक सहभागी झाले होते. संशोधक लेखक साहित्यिक अच्युत गोडबोले, राज्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, मानव कांबळे, साहित्यिक आसावरी निफाडकर, प्रकाशक शरद अष्टेकर, राज्य अधिकारी मनीषा गंपले, प्राध्यापक प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला जागा आणि व्यवस्था एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने उपलब्ध करून दिली. रमेश धर्मावत, प्रांजल पाठक यांचे सहकार्य लाभले. ससून रक्त पेढीने रक्तसंकलनास सहकार्य केले. शिवाजीनगर शाखेच्या कार्यकर्त्यानी अत्यन्त चिकाटी, निष्ठेने उपक्रम पार पाडला. संयोजनामध्ये माधुरी गायकवाड, स्वप्नील भोसले, आकाश छाया, रविराज थोरात, प्रतीक कालेकर, श्याम येणगे, विनोद लातूरकर, एकनाथ पाठक, सतीश जाधव, मयूर पटारे, कपिल क्षीरसागर, अविनाश इंगळे, अक्षय दावडीकर, प्रवीण खुंटे, लालचंद कुंवर, निशांत धाइंजे, रविकिरण काटकर, रवी आमले, प्रिया आमले, निखिल सुक्रे, मनोहर पाटील आदी कार्यकर्ते सक्रिय होते.

—–

दहा वर्षे खूनाची, कार्यरत विवेकी असंतोषची…!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी सायं. ५-३० वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर, २० ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर आणि तेथून एस एम जोशी सभागृहापर्यन्त मूकमोर्चा आणि त्यानंतर सकाळी 9-30 वाजता एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे उपस्थित असणार आहेत.
——–

Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

छद्मविज्ञानाच्या पराभवासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक

– मच्छिन्द्रनाथ मुंडे यांचे प्रतिपादन

– महाराष्ट्र अंनिसचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

पुणे : विज्ञानाचा आधार असल्याचे सांगून अनेक गोष्टी लोकांवर बिंबविल्या जातात. मात्र त्याला विज्ञानाचा आधार नसून ते छद्मविज्ञान असते. छद्मविज्ञानाचा पराभव करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी मच्छिन्द्रनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘चमत्कार प्रशिक्षण’ आयोजित केले होते. प्रशिक्षणप्रसंगी मुंडे बोलत होते. कागदात असलेले तथाकथित भूत जाळून चमत्कार प्रशिक्षणाचे उदघाटन महाराष्ट्र अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांनी केले. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदाकळे यांनी चमत्कारांचे सादरीकरण अत्यंत रंजकपद्धतीने करून दाखविले. चमत्कारामागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखी, रासायनिक घटकांचा वापर, सादरीकरणातील सफाईदारपणा मुंडे यांनी सांगितला.

डोळ्यांवर कापड बांधूनही वाचता येणे अर्थात ‘मिडब्रेन’, ‘ग्रहणात शिजवलेल्या अन्नावर अनिष्ट परिणाम होतो’, ‘चुंबकांच्या वापराने कर्करोग, मधुमेह कसा समूळ बरा होतो’ असे चमत्काराचे दावे करून छद्मविज्ञान बिबवले जात आहे. मात्र विज्ञानाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास छद्मविज्ञान खोटे पडते, असे मुंडे यांनी सांगितले.

आजूबाजूला लहान घडलेली घटना ही दुसऱ्यापर्यंत पोहोचताना मोठ्या स्वरूपात सांगितली जाते. त्यामुळे चुकीची माहिती व गैरसमज पसरतात. लहान बुवाबाजी करणारा ढोंगीबाबा असेल तर त्याला मोठे करण्याचे काम काही जण करत असतात. चमत्काराला नमस्कार करून लोक फसतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे चमत्कारी गोष्टीना विरोध करून वास्तविक गोष्टीची कास धरण्याची गरज आहे, असे मत भास्कर सदाकळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंनिसच्या थॉट विथ ऍक्शन जर्नलचे संपादक हर्षदकुमार मुंगे यांनी प्रास्ताविक केले. शाखा सचिव घनश्याम येणगे, शाखा सहसचिव अरिहंत अनामिका यांनी सुत्रसंचलन केले. माधुरी गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूर पटारे, वनिता फाळके, विनोद खरटमोल यांनी गाणी सादर केली. ओंकार बोनाईत आणि सागर तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल मीडिया विभागाचे राज्य सहकार्यवाह रविराज थोरात यांनी आभार व्यक्त केले.