Tag: MNVS
पदवी परीक्षांचा निकालांच्या छापील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात दिरंगाई
| मनविसे चा आंदोलनाचा इशारा
प्रथम ते तृतीय वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर तातडीने छापील गुणपत्रिका सुद्धा वितरित करण्यात येतात; परंतु पुणे विद्यापीठाकडून आजपर्यंत ह्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेन. असा इशारा देण्यात आला आहे.
मनविसेच्या पत्रानुसार भविष्यातील प्रवेश, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण प्रवेश, शैक्षणिक कर्ज अश्या अनेक कारणांसाठी गुणपत्रिकेच्या प्रती अत्यावश्यक असतात. असे असूनही आपल्या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . याहीपेक्षा गंभीर म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे या गुणपत्रिका अजुन छापलेल्या च नसलेबाबत माहिती मिळाली आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी आपण त्वरित लक्ष घालून छापील गुणपत्रिका वितरणाबाबत , सद्यस्थिती आणि निश्चित तारीखे बाबत ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेन. असे ही पत्रात म्हटले आहे.
शाळांमधील बाऊंसर संस्कृती वर बंदी घाला
: मनविसेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण याच पुण्यनगरीत अनेक शाळा शैक्षणिक आवारात बाऊंसर ठेवुन शाळे मधे दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. शाळा परीसरातुन ही संस्कृती हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी मनविसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. बाऊंसर बंदी आदेश लवकरात लवकर काढुन विद्यार्थी पालकांना न्याय मिळाला नाहीतर मनविसे विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वश्री जबाबदारी आपली राहील, असा इशारा देखील कनोजिया यांनी दिला आहे.
कनोजिया यांनी पत्रात म्हटले आहे कि शाळा ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी असते. अश्या ठिकाणी बाऊंसर ची नेमणुका करुन दहशत पसरवणे गैर आहे. पुण्यात वारंवार पालक व विद्यार्थी यांना मारहाण करणे
शुल्क भरले नाही म्हणून शाळेच्या आवारात प्रवेश नाकारणे अश्या घटना घडत आहेत, हे दहशतमय वातावरण शाळेतुन हद्दपार करणे फार गरजेचे आहे. काल बिबवेवाडी येथील क्नाईल मेमोरियल स्कुल मधील बाऊंसर कढुन झालेली मुख्याध्यापकांना निवेदन देण्यासाठी आलेल्या पालकांना मारहाण व शिवीगाळ पुण्यातील संस्कृती ला काळीमा फासणारी आहे मनविसे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहे या शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे. पुणे जिल्ह्यातील सर्व शाळे मधे बाऊंसर नेमणुकीसाठी बंदी घालण्यात यावी. हि शाळा आहे. पब किंवा बार नव्हे. अश्या दहशतीचे वातावरण शाळा परीसरातुन हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर बाऊंसर बंदी आदेश लवकरात लवकर काढुन विद्यार्थी पालकांना न्याय मिळाला नाहीतर मनविसे विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वश्री जबाबदारी आपली राहील. असे कनोजिया यांनी म्हटले आहे.