Navale Bridge Accident | नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा | खासदार सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा

| खासदार सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे|पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील (Pune Benglore highway) नवले पूल (Navale Bridge) परीसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी याठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी एनएचएआय(NHAI), पुणे महापालिका(PMC), एमएसईबी(MSEB), एमएनजीएल (MNGL) आणि पीएमआरडीए (PMRDAA) अशा एकापेक्षा जास्त संस्था सहभागी आहेत. या सर्व संस्थांची एकत्र बैठक घेऊन तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी तातडीने या संस्थांची तातडीने एकत्रितपणे बैठक बोलवावी, असे त्या म्हणाल्या.

गेल्या महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुळे यांनी लागलीच याठिकाणी भेट देऊन पाहणी करत जखमींची विचारपूस केली होती. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनातही याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दिल्लीहून पुण्यात येताच आज पुन्हा एकदा त्यांनी नवले पूल परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘या पुलासंदर्भात एनएचएआय, महापालिका आणि महावीतरणची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत याबाबतच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यावर आमचा भर आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सहकार्य करीत असून याबद्दल त्यांचे आपण आभार मानते’.

गेल्या महिन्यात या पुलावर मोठा अपघात झाला होता. त्यावेळी तातडीने घटनास्थळाला भेट देत खासदार सुळे यांनी ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आणून देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. इतकेच नाही, तर यापूर्वीही अनेक वेळा नवले पूल परिसरात अपघात झाले असून सातत्याने हा मुद्दा खासदार सुळे या उपस्थित करत आहेत. संसदेतही अनेक वेळा त्यांनी याबाबत विचारणा करून अपघात घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय रस्ते महामंडळाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Categories
Uncategorized

नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा

| खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुणे | मुंबई -बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Benglore Highway) नवले पूल (Navale bridge accident) परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या बैठका नियमित घेऊन रस्ता सुरेक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच त्या त्या वेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकांतील सूचनांनुसार या रस्त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, असे खा. सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. रविवारी (दि. २०) रात्री नवले पूल आणि स्वामीनारायण मंदिर परिसरात दोन मोठे अपघात झाले. त्यानंतर काल (दि. २१) खा. सुप्रिया सुळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. इतकेच नाही तर या अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली.  त्यानंतर आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई-बंगळूरू महामार्गावर सातत्याने अपघात होत असून या संदर्भात उपाय योजना करण्यासंदर्भात वेळोवेळी बैठकी द्वारे तसेच पत्रव्यवहार आपण पाठपुरावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरतआहे. या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन आपण पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपाययोजनाही सुचविल्या आहेत, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० किलोमीटर प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावावेत, स्टड लाईट, ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर ब्लिकर्स, कर्ब पेंटिंग, ‘ड्रिंक अँड ड्राईव्हला आळा घालणे, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक या सारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने पूर्ण करण्याबाबत आपण यापूर्वीही मागणी केली होती त्यावरही शीघ्रगतीने कार्यवाही व्हायला हवी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच रविवारी झालेल्या भिषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा आणि अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने या उपाययोजना करण्यात याव्यात,  असे त्यांनी म्हटले आहे.

Navale Bridge | Pune | पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पुणे येथे नवले ब्रिजवर (Navale Bridge Pune) रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) पोलिसांकडून माहिती घेतली आहे.

हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. (Navale bridge Accident)

Navale Bridge : NHAI : police : PMC : नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

Categories
Breaking News PMC Political पुणे

नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : महापौर मोहोळ

– NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

पुणे : वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दिशादर्शक फरक वाढवण्यापासून तर सर्व्हिस रोड बांधेपर्यंतची कामे या उपाययोजनांमध्ये करण्यात येणार असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी महापौर मोहोळ लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

नवले पूल आणि एकूणच शहरतून मुंबई-बंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजक केले होते. बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी रामचंद्र राव, प्रकल्प अधिकारी एस.एस कदम, सल्लागार भारत तोडकरी, राकेश कोरी, आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक अंकित यादव, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार आदी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महामार्ग प्राधिकरणच्या वतीने दिशादर्शक आणि माहितीफलक लावण्यास सुरुवात झाली असून यात ताशी ६० किमी, तीव्र उतार, हळू जा, अशा फलकांचा समावेश आहे. तुटलेल्या क्रॅश बॅरिअर्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत. धोकादायक ठिकाणे निश्चित करुन त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टेही बसविले जात आहेत. त्या सोबतच कॅट आय, रिफ्लेकटिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविण्यात आले असून पथदिवेही बसविण्यात येत आहेत’

संपूर्ण महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महिमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय नवले पुलाखाली असलेली अतिक्रमणे काढून त्यानंतर महामार्ग प्राधिकरण सर्व्हिस रोड दुरुस्ती करणार आहे. नव्या कात्रज बोगद्यानंतर आणि दरीपुलाजवळ गॅन्ट्री तयार करुन कायमस्वरूपी स्पीडगन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पोलीस आणि महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. नर्हे स्मशानभूमीसंदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. शिवाय सर्व्हिस रोड आणि महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही घेतलाअसल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाययोजना करत असून सदरील उपाययोजना वेगाने आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेच्या बाजूने पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. सर्व उपाययोजना संयुक्तिकरित्या होत असल्याने त्या नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक असतील, यात शंका नाही’.

◆कायमस्वरूपी उपाययोजना…

– भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
– विश्वास हॉटेल चौक ते पासलकर चौक आणि नवलेपुलाच्या वडगाव बाजूचा सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करणे
– सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरुन सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार