PM Modi Attack on congress : काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

: पंतप्रधान मोदींचा काँग्रेस वर प्रहार

पुणे : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रो चे  आणि इ बस सेवेचे उदघाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मोदी म्हणाले, या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी मला बोलविले होते. आता तिचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. काँग्रेस सरकारच्या काळात भूमीपूजन होत होते. पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, हे मेट्रोने दाखवून दिले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे.

”आज बारापेक्षा जास्त शहरात मेट्रो काम चालू आहे. त्यात महाराष्ट्र जास्त आहेत. मुबंई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इकडे मेट्रो सुरू होतेय. लोकांना आग्रह जे मोठे लोक समाजात आपण मानतो त्यांना आग्रह की मेट्रो प्रवास सवय लावा जेवढा जास्त मेट्रो प्रवास तेवढी शहराला मदत होईल. तसेच जास्तीत जास्त ई वाहतूक सुरू झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.”

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी यांना मोदींकडून श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वी अनेकांच्या कामाने पावन झालेल्या पुणेकरांना नमस्कार करत आहे. देश स्वतंत्र अमृतमहोत्सव साजरा करतोय. पुण्याच विशेष महत्व आहे. यामध्ये लोकमान्य ,टिळक चाफेकर बंधू असे स्वातंत्र्य सेनानी यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Metro Station : Garware college : Swatantryaveer Savarkar : मोदी मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यामुळे गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे

Categories
Breaking News Political पुणे

मोदी मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यामुळे गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे

: भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

पुणे : गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी आग्रही मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र ही दिले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस आ. पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस तथा मनपा निवडणूक प्रचार प्रमुख राजेश पांडे, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, भाजपा शिवाजी नगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, अल्पनाताई वर्पे,श्रद्धाताई प्रभुणे,वासंतीताई जाधव, नगरसेवक जयंत भावे, राजाभाऊ बराटे, सुशिल मेंगडे पदाधिकारी अनिता तलाठी, हर्षदाताई फरांदे,पल्लवीताई गाडगीळ, विद्या टेमकर, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, स्वप्निल राजीवडे, रणजित हगवणे, प्रकाश तात्या बालवडकर, सतिश मोहोळ, अमोल डांगे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, महेश पवळे, दीपक पवार, अतुल चाकणकर, वैभव मुरकुटे, श्रद्धा मराठे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.‌पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात याच ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करुन, ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. त्यामुळे या परिसराचे आम्हा सर्वांसाठी वेगळे महत्त्व आहे.”

ते पुढे म्हणाले की, “येत्या ६ मार्च रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत.‌ यावेळी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानक येथे मेट्रोने प्रवासही करणार आहेत.‌ त्यामुळे या मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर करावे, यासाठी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे.”

Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र संपादकीय

पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’!

: येनकेन प्रकारेण कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप अर्थात विरोधी पक्ष ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीतील महत्वाचे मोहरे या त्रासाला कंटाळले आहेत. नुकतीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत भेट दिली. त्यांच्या भेटीवरून देखील ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे, हे आता उघड होत आहे.

: महाराष्ट्र बाबत आकस वाढला

किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटर ची तक्रार करण्यासाठी महापालिकेत आले होते. ते ही सुट्टीच्या दिवशी. गम्मत म्हणजे हे सेंटर चालवले जाते PMRDA कडून. महापालिकेचा त्याचा फक्त डॅशबोर्ड शी संबंध आहे. सगळी प्रक्रिया PMRDA कडून राबवली जाते. तरीही सोमय्या महापालिकेत तक्रार देण्यासाठी आले. शिवसैनिकांशी धक्काबुक्की झाल्यानंतर सोमय्या हॉस्पिटल मध्ये गेले. हॉस्पिटल मधून नंतर महापालिकेत व्हीलचेअर वर आले. सुरक्षा रक्षकांना निवेदन देताना मात्र उभा राहून फोटो काढला. संजय राऊत यांना टार्गेट करण्यासाठी सोमय्या या प्रकरणाच्या मागे लागले आहेत. त्यात कहर म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक पथक देखील पुण्यात पाठवले आहे.  यातून सिद्ध एकच होते कि यामागे जनतेची काळजी नसून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आहे.
आतापर्यंत फक्त राज्यातील विरोधी नेतेच महाविकास आघाडी सरकारविषयी आकस दाखवण्याचे काम करत होते. मात्र परवाच्या संसदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून देखील हेच दिसून आले. शिवाय केंद्र सरकारने राज्यातील मंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय एजेंसीचा ससेमिरा मागे लावून ठेवला आहेच.
महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री याचा सामना कसा करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune Congress : पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे  

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे

 

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असे सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला. पंतप्रधानांच्या या वक्तव्‍याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यव्‍यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका जवळील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शने -आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, ‘माफी मागों माफी मागों, मोदीजी माफी मागों’ अशा प्रकारचे फलक घेवून कार्यकर्ते निदर्शनाच्या ठिकाणी जमले होते.

      यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘१२ फेब्रुवारी २०२० साली राहुल गांधी यांनी मोदी सरकारला कोरोना संसर्गाबाबत, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितली होते. परंतु तात्कालीन केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी त्या विषयाचे गांभीर्य समजून न घेता राहुल गांधीची खिल्ली उडविली होती. पतंप्रधान मोदी यांनी चीनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घातली नाही. ते नमस्ते ट्रम म्हणत अमेरीकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचार मग्न होते. परिणामी देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला. २४ मार्च २०२० रोजी कोठलेही पूर्वनियोजन न करता पंतप्रधांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी, मजूर व छोट्या व्‍यावसियिकांचे हाल झाले.‌ भितीपोटी गोरगरीब कष्टकरी मजूर आपल्या गावाकडे हजारो किलोमीटर चालत गेले. यात त्यांना वाटेत अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडले. मोदी सरकारने कोरोना संसर्ग हाताळण्यात हलगर्जीपणा दाखविला. कोरोनावर मात करण्यासाठी उपयोजना न ठरवता मोदींनी देशातल्या जनतेला थाळी वाजवा, टाळी वाजवा, घराची लाईट बंद करून आपल्या घराबाहेर दिवे पेटवण्यास भाग पाडले. आपले अपयश झाकण्यासाठी ते महाराष्ट्र काँग्रेसवर आपले खापर फोडत आहे. पंतप्रधान संसदेत खोट बोलले आणि त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेची माफी मागावी अन्याता जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.’’

      माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. संसदेत कोरोना विषयी ते खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.   महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते. अनेकांचे संसार उध्वस्त होऊन मुले अनाथ झाले. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सरकार अनेक धोरणावर कसे अपयशी ठरले याचा पर्दाफाश केला. परंतु पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर न बोलता निवडणुकीचे भाषण करत होते. भारताच्या संसदेत आजपर्यंत अशा पध्दतीने कोणतेही पंतप्रधान बोलले नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यु.पी. आणि बिहारच्या लोकांना रेल्वेने आपल्या गावाला पाठविले त्यामुळे कोरोना पसरला असे खोटे आरोप पंतप्रधानांनी केले. रेल्वे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग महाराष्ट्र काँग्रेसने कसा काय कोरोना पसरविला याचे उत्तर द्यावे.’’

      यानंतर नगरसेवक अरविंद शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुड, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, गटनेते, आबा बागुल, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, शानी नौशाद, अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, अरूण वाघमारे, कैलास गायकवाड, शखेर कपोते, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, सुरेखा खंडागळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनय ढेरे, नुरूद्दीन सोमजी, विजय वारभुवन, दिपक ओव्‍हाळ, राहुल वंजारी, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी, सादिक कुरेशी, नितीन परतानी, राजू नाणेकर, गणेश शेडगे, भगवान कडू, राजेंद्र पेशने, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, सुजित यादव, यासीन शेख, दयानंद अडागळे, रोहित अवचिते, दत्ता जाधव, हेमंत राजभोज, शाबिर खान, चेतन अगरवाल, रवि पाटोळे, भारत पवार, कान्होजी जेधे, अभिजीत रोकडे, डॉ. अनुप बेगी, रवि आरडे, बबलू कोळी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vaccination : WHO : 100 करोड़ वैक्सीनेशन  का आंकड़ा पार : WHO ने भी भारत को बधाई दी

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश हिंदी खबरे

100 करोड़ वैक्सीनेशन  का आंकड़ा पार

WHO ने भी भारत को बधाई दी

नई दिल्ली : देश  में कोरोना (Coronavirus Pandemic) का खतरा अभी टला नहीं है। कोविड से संक्रमित मामले रोजाना सामने आ रहे हैं। हालांकि कोरोना की रफ्तार देश में धीमी जरूर पड़ गई है। इसी बीच देश ने आज 100 करोड़ वैक्सीनेशन (1 Billion Covid Vaccination Mark) का आंकड़ा पार कर लिया है। इसके बाद से ही इसे जश्न की तरह सेलिब्रेट किया जा रहा है। इस खास मौके पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ट्वीट कर देशवासियों को बधाई दी है। दूसरी तरह WHO ने भी भारत को बधाई दी है।

बता दें कि पीएम मोदी ने ट्वीट करते हुए लिखा कि भारत ने इतिहास रचा। हम भारतीय विज्ञान, उद्यम और 130 करोड़ भारतीयों की सामूहिक भावना की जीत देख रहे हैं। उन्होंने लिखा कि 100 करोड़ टीकाकरण पार करने पर भारत को शुभकामनाएं। हमारे डॉक्टरों, नर्सों सहित इस उपलब्धि को हासिल करने के लिए काम करने वाले सभी लोगों का आभार।

पीएम मोदी का ट्वीट-

India scripts history.

We are witnessing the triumph of Indian science, enterprise and collective spirit of 130 crore Indians.

Congrats India on crossing 100 crore vaccinations. Gratitude to our doctors, nurses and all those who worked to achieve this feat. #VaccineCentury

— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2021

वहीं दूसरी तरफ विश्व स्वास्थ्य संगठन में दक्षिण-पूर्व एशिया क्षेत्र की क्षेत्रीय निदेशक डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंह ने कहा कि भारत का ये माइलस्टोन बहुत खास है क्योंकि उसने  अपने देश की जनता के साथ दुनिया के और देशों को भी वैक्सीन की करोड़ों डोज दी हैं। WHO भारत को इस कामयाबी के लिए बहुत बधाई देता है।

केंद्रीय स्वास्थ्य मंत्री मनसुख मांडविया ने एक ट्वीट करके देश को यह उपलब्धि हासिल करने पर बधाई दी और कहा कि यह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सक्षम नेतृत्व का परिणाम है। उन्होंने लिखा, ‘‘बधाई हो भारत! यह दूरदर्शी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के समर्थ नेतृत्व का प्रतिफल है।”जबकि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि दुनिया के बड़े-बड़े देशों जिनका हेल्थकेयर सिस्टम बहुत अच्छा है, उनसे भी बेहतर तरीके से प्रधानमंत्री के नेतृत्व में भारत ने देशभर में व्यापक रूप से वैक्सीनेशन किया। आज 100 करोड़ वैक्सीनेशन का बहुत महत्वपूर्ण पड़ाव पार हुआ है।