CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ कोणतेही बटण दाबा मत मोदींनाच जाणार हे नक्की

CM Eknath Shinde  – (The karbhari News Service) – फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. (Mahayuti melava pune)

पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या पदाधिकारी मेळाव्यास पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, महेश शिंदे, दीपक मानकर, धीरज घाटे, प्रमोद भानगिरे, अजय भोसले, परशुराम वाडेकर, श्री. लतीफ शेख, संजय माशिलकर, संजय सोनवणे, प्रकाश भालेराव, श्रीनाथ भीमाले, बालाजी पवार, राजेश पांडे, भारत नागद, संजय आल्हाट यांच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

The karbhari - mahayuti melava pune

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुरलीधर मोहोळ यांना गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावासारखे होते. पुण्याचे प्रश्न ते मांडायचे. आता आपला खासदार पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. इथे भाऊॅ तात्या कोणी नाही, मुरलीधर अण्णाच निवडून येणार आहेत. आयोध्येतील रामलल्लासाठी पुण्यातून दोन धागे रामासाठी विणले, त्याची वस्त्र श्रीरामल्लांना परिधान केली गेली. आता मतांचे धागे आपल्याला विणायचे असून जिल्ह्यातील चारही उमेदवारांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे आहे.

कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी चांगले पुण्यात काम केले, आम्ही राज्यात काम करत होतो, पंतप्रधान मोदी देशात काम करत होते.पण काही जण फक्त फेसबुक लाइव्ह करत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आता हेच फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चारही मतदारसंघात काम केले पाहिजे. विधानसभेची ही रंगीत तालीम असल्याने कुणीही गहाळ राहू नका. समोरचा उमेदवार कमकुवत समजायचा नाही. सर्वांची एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना जास्त काम करावे लागणार आहे. विकासावर मत मागायची. केलेल्या कामाच्या जोरावर मत मागायची आहेत. काही लाख कोटींची काम सुरू आहेत. पुण्यातील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी मेट्रो कात्रज, हडपसर, वाघोलीला नेतोय,त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे टाळा, वादविवाद टाळा. गंमततीचा भाग नाही खरोखर नम्रतेने वागा. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. सामाजिक कार्यकर्ते, संघटना जोडून घ्या.त्यांना सोबत घ्या. मतदारांना श्री मोदीजींना मतदान करायचे आहे. जिल्ह्यात घड्याळदोन ठिकाणी, धनुष्यबाण आणि कमळ ही तीन चिन्हं आहेत. त्या समोरचं बटण दाबलं तरी मत श्री मोदीजींना जाणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जर महायुतीला महाराष्ट्रात हरवू शकेल, तर तो कार्यकर्ताच हरवू शकेल. माझा फोटोच नाही, नावच नाही, असं नाही. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात काम केले. त्यांचे सर्व कुटुंब ऍडमिट असताना ते तेथून काम करत होते. एकेका जागेचा विचार करा. उध्दवजी गेले मत कमी होतील पण दादा आले. त्यापेक्षा जास्त मत आपल्यात अधिक होतील. त्यामुळे महायुतीचे उमेदवार जिंकणार हे लहान मुलही सांगेल.

उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर झाल्यावर कोरोनाचे संकट आले आणि जगच थांबले पण त्या काळात काम करायची खरी संधी मला मिळाली. लोकांसाठी काय आणि कसे काम करायचे असते? ते मला या काळात काम करताना शिकायला मिळाले. पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील रस्ते-उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार ही सर्व कामे केवळ राज्यात आणि देशात असलेल्या विकासाच्या विचारांच्या सरकारमुळे शक्य होत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी काही दिवस मेहनत करायची आहे. कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळसाठी नाही तर श्मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Mahayuti Melava Pune | माझ्या नावातच राम;  इतके वर्ष वनवासात होतो; आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो | रामराजे नाईक निंबाळकर

Categories
Breaking News Political पुणे

Mahayuti Melava Pune | माझ्या नावातच राम;  इतके वर्ष वनवासात होतो; आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो | रामराजे नाईक निंबाळकर

 

Mahayuti Melava Pune | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Upcoming Loksabha Election) पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा आज डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन येथे आयोजित करण्यात आला होता.

यात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर (Ram Raje Naik Nimbalkar)  म्हणाले किअजित पवार येणार होते. पण व्यग्र कार्यक्रमामुळे मला सांगण्यात आले. माझे कार्यस्थळ सातारा असले तरी जन्मस्थळ व शिक्षण स्थळ पुणे आहे. मोदीच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 72 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे, हे दुसऱ्या पक्षातून आलेल्याना हे आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे.  महायुतीत येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले. उगाच काही न करणारे नेतृत्व आता नाही. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याचे संधी या मेळाव्यात आली आहे. पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदिशिवाय पर्याय नाही. माझ्या नावातच राम आहे, परंतु इतके वर्ष वनवासात होतो. आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो आहे. महायुती हाच आपला पक्ष झाला आहे ही भावना असली पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास आपला विजय नक्की आहे

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शंकर जगताप, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले व प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर,शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आय चे ऍड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.

The karbhari - Ramraje naik nimbalkar Mahayuti Melava Pune News
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा आज डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन येथे आयोजित करण्यात आला होता.

दीपक मानकर यांनी प्रास्ताविक केले. हा मेळावा लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या विजयाची नांदी आहे. एका विचाराने सर्व नेते एकत्र आले आहे. त्यातून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. राम नामाच्या ताकदीमुळे काँग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे. महायुतीचा उमेदवार दहा लाख मते घेतल्याशिवाय आणि विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या ४८ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जो उद्योग केला, त्यामुळे त्यांना सोसावा लागला. आमच्या निर्णयाची आम्ही वाट बघतो आहोत. तो निर्णयही अजित पवारांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. पुण्याचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणायचा संकल्प करूयात.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी मेळाव्याची भूमिका मांडली.

तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे परशुराम वाडेकर म्हणाले.

त्यावर काही करून पदे द्या असे म्हणू नका, सबका साथ सबका विकास हे आपण ठरवले आहे, असे खासदार जावडेकर यांनी सांगितले. जावडेकर म्हणाले, तिसरी बार मोदी सरकार आणि इस बार चार सो पार हा संकल्प साकार करण्यासाठी राज्यात ४८ च्या ४८ जागा निवडून आणणार. बारामती २०१४ लाच पडत होते. थोडक्यात घोटाळा झाला. या वेळी लक्षात येईल. दोन वर्षे बसे मुख्यमंत्री पाहिले आहेत. तेलंगणात असेच मुख्यमंत्री होते. लोकांनी त्यांना घरी बसविले. काम करणारी सेना हवी आहे. राम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकत आहे. चांगल्या गोष्टीला काँग्रेसला या देशाचे सत्व कळले नाही. या देशातील जनता तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस राहिले असून, सर्व पक्षांनी एकजीवाने काम केले पाहिजे. प्रत्येक घरी जाऊन आपले मत पोहोचवा. कामाचे वाटप नीट करून वेळापत्रक तयार करा. त्यासाठी पुण्यात पन्नास टक्के मतदान झाले होते. पुण्यात ७५ टक्के मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून दहा लाखाच्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही.

……