Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

| आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत  पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family |   “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

– बारामतीतून शुभेच्छा देण्याची पवार कुटुंबाची परंपरा

दिवाळी पाडवा म्हटलं कि पवार कुटुंब आणि बारामती हमखास आठवते. कारण पाडव्या दिवशी पवार कुटुंबीय  बारामतीतून नागरिकांना शुभेच्छा देत असतात. महाराष्ट्र भरातून लोक पवार कुटुंबाना भेटायला जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच पूर्ण परिवार एकत्र येऊन शुभेच्छा देत असतात. मात्र यंदाचा पाडवा वेगळा आहे. कारण अजित पवार हे परिवार आणि पक्ष सोडून भाजपच्या सत्तेत सामील झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी पक्ष कुणाच्या मालकीचा यावरून देखील पवार काका पुतण्यामध्ये वाद सुरु आहेत. त्यामुळे यंदा बारामतीतून शरद पवार यांनी पाडव्याला नागरिकांना शुभेच्छा दिल्या तरी अजित पवार हे त्यांच्यासोबत नसणार आहेत. यामुळे नागरिक आणि कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज आहेत.

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | अजित पवार (Ajit Pawar) आमच्याकडे आल्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांना संधी दिसू लागली असून शरद पवारांचा (Sharad Pawar) वारसदार आहे, असे वाटू लागले असावे. असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. अर्थहिन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही. असेही बावनकुळे म्हणाले.

 

ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आमदार गोपीनाथ पडळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे असे सांगून पडळकर यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले.

प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावी ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायलयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही. असे बावनकुळे म्हणाले.

संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीच्या लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.

• प्लॅन बी कशाला?

विरोधकांना काहीच सूचत नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपाकडे कोणताच प्लॅन बी नसून त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य ४५ हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. मोदीजींच्या कामांमुळे सर्व त्यांच्याकडे पाहूनच मते देणार आहे. असे हि बावनकुळे म्हणाले.

 

Ganesh Bidkar | पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही | गणेश बिडकर

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही | गणेश बिडकर

पुणे |पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, विरोधकांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले.

बिडकर म्हणाले, पुणे शहरात गेल्या काही वर्षात काही तासात अभूतपूर्व पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, ही वस्तुस्थिती हवामान विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर दिसून येते. हवामान बदल हा पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठीच मोठे आव्हान बनलेले आहे. होणारा पाउस हा या हवामानबदलाचाच फटका आहे आणि त्याच्याशी एकजुटीने संघर्ष करण्याची जशी आवश्यकता आहे, तसेच त्याच्यावर दीर्घकालिन उपाययोजना काय करता येतील यासाठी गंभीरपणे विचारविनिमय आणि कृतीकार्यक्रम आखला गेला पाहिजे. यासाठी जगभर तज्ज्ञ विचार करताहेत आणि त्या आघाडीवर जे जे निष्कर्ष काढले जाताहेत आणि काढले जातील, याचा विचार आपणही कृतीत आणायला हवा, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे, हे सर्वप्रथम समजावून घेतले पाहिजे. १७ ऑक्टोबरला पडलेल्या पावसाची सरासरी ८६.८५ होती. तर शिवाजीनगर आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनुक्रमे १०५ व १२४.१९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

बिडकर पुढे म्हणाले, पुण्यातील रस्त्यांची लांबी १४०० किलोमीटर आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे ६७२ किलोमीटरचे रस्ते ९ मीटर किंवा त्यापेक्षा कमी रूंदीचे आहेत. ९ ते १२ मीटर रूंदीचे २९८ किलोमीटर रस्ते आहेत. १२ ते २४ मीटर रूंदीचे ३१५ किलोमीटर रस्ते आहेत. पुण्यातील स्टार्म वॉटर वाहिन्यांची वहन क्षमता ५५ मिलीमीटर इतकी आहे. या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी तपशिल सादर केलेले आहेत. पुणे शहराच्या जुन्या हद्दीत एकूण २१४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची एकूण लांबी ३६२ किलोमीटर आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांत १६४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची लांबी १६५ किलोमीटर इतकी आहे. पुणे शहरात १२ मीटर व त्यापुढील रूंदीच्या रस्त्यांवर अंदाजे २२८ किलोमीटर लांबीची पावसाळी लाईन असून त्यावर ३० हजार ३९१ चेंबर्स आहेत. पाणी शिरण्याच्या ४२ घटना घडल्यात. या आपत्तीनंतर विविध विभागांच्या कामांवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून समन्वय ठेवण्यात येत होता. पावसामुळे समस्या उद्‌भवणारा २४५ ठिकाणांची यादी पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली होती आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कृतीही सुरू होती.

बिडकर यांनी सांगितले कि, १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसानंतर महापालिकेचे अधिकारी आणि अन्य कर्मचारी असे १२५ जण परिस्थितीवर देखरेख करीत होते. महापालिका आयुक्त स्वतः लक्ष ठेवून होते. पूरस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास त्या दृष्टीने ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती, तसेच २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. १७ आक्टोबरच्या स्थितीनंतर तातडीने पडझड आणि नुकसान झालेल्याचे पंचनामे करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आलेला आहे.

बिडकर म्हणाले, पुण्यातील मतदारांनी भारतीय जनता पक्षावर खूप मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे. पुणेकरांना होणारा त्रासाबद्दल आम्हाला वेदनाच होतात. या शहराला सुस्थितीत आणण्यासाठीच आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठीच राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे सातत्याने प्रयत्नशील आहोत. राजकीय सामना करण्याची ही वेळ नाही, परंतु चार वर्षांपूर्वी पुण्यात असाच अभूतपूर्व पाऊस झाल्यानंतर आंबिल ओढ्याला संरक्षक भिंत घालण्याचे तसेच नव्याने कल्व्हर्टचे काम आमच्याच पक्षाने केलेले आहे. पुण्याचा ३० वर्षे रखडलेला विकास आराखडा आम्ही संमत केला. तो आराखडा तीस वर्षांपूर्वीच प्रामाणिकपणे अंमलात आणला असता तर पुण्याची वाहतूक आणि अनेक विषय त्याचवेळी मार्गी लागले असते. पुण्यातील समाविष्ट गावातील सर्व हितसंबंध पूर्ण झाल्यानंतर बकाल करून ती पुण्याच्या हद्दीत आलीत. या उपनगरांतील व्यवस्थांची दाणादाण झाल्यानंतर ती महापालिकेत आली. त्यासाठी कोणतेही बजेट दिलेले नाही. याचेही उत्तर शोधले तर पुण्यातील अनेक समस्यांचे मूळ समजेल. पुण्याची मेट्रो यांनी १५ वर्षे अडकावून ठेवली आणि आज पुण्यातील वाहतूक कोंडींबद्दल खोटे अश्रू हे ढाळता आहेत. पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, त्यांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे ही बिडकर म्हणाले.