Sharad Pawar | PM Modi | शरद पवारांबद्दलचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुदैवी | काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | PM Modi | शरद पवारांबद्दलचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुदैवी

| काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत 

 

Ulhas Pawar Pune Congress- (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जो उल्लेख केला तो दुदैवी असून निषेधार्य आहे. शरद पवारांना त्यांनी यापूर्वी गुरू आहेत, असे संबोधिले होते. ते जर खरेच गुरू असतील तर गुरू बद्दल असे शब्द वापरणे योग्य नाही, अशी खंत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार  यांनी व्यक्त केली. पवारांबद्दल मोदींनी वापरलेले शब्द पाहता राजकारणाचा स्थर किती घसरला आहे, हे कळते. मोदींची ही भाषा राजकी़य संस्कृतीसाठी दुदैवी असून गेल्या दहा वर्षात‌केवळ जुमलेबाजी केल्याने मोदींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, खुर्च्या मोकळ्या असतात, त्यामुळे मोदी आत्मविश्वास गमावत आहेत, अशी टिकाही पवार यांनी केली.

 

पुण्यातील रेसकोर्स मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता, भटकती आत्मा असा उल्लेख करत हा आत्मा राज्य, घर आणि देश अस्थिर करत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उल्हास पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत खंत व्यक्त केली. तसेच मोदी व भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली. ते म्हणाले, जुमलेबाजीमुळे त्यांच्या‌सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या‌ सभांना निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या मोकळ्या रहात आहेत. पंतप्रधान लोकसभा किंवा विधानसभेला एखाद्या राज्यात पाच सात‌ सभा घेतात, मात्र मोदी एका राज्यात  महापालिकेच्या निवडणुकीसारखे एका जिल्ह्यात दोन दोन सभा घेत आहेत. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. स्वत:च्या राज्यात सभा घ्यावी लागते. सत्तर वर्षात काँग्रेसने काय‌ केले यापेक्षा गेल्या दहा वर्षात‌ त्यांनी काय केले, हे आता सांगावे. सातशे वीस शेकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव नाकारला, हा असंवेदनशिलतेचा कळस आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

 

मोदींचे‌ तीन तीन मंत्री आम्ही राज्य घटना बदलणार असल्याचे सांगतात, आणि मोदी म्हणतात, मी घटना बदलणार नाही. कालच्या सभेतील त्यांचे भाषण पायाखालची वाळू घरली आहे हे सिद्ध करणारे होते. त्यांचा अभ्यास नाही, त्यांना देशाच्या इतिहासाचे ज्ञान नाही, चुकीचा इतिहास‌ सांगतात, हा माणूस दहा वर्षात कधी‌ चीन शब्द उच्चारत नाहीत, ते‌ चिनला एवढे का भितात, कळत नाही.

 

मोदींनी प्रत्येकाच्या‌ डोक्यावर सव्वा लाखाचे कर्ज करून ठेवले आहे.

 

सत्तार हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर मोदींनी पुण्यातील सभेत बोलायला हवे होते, ज्यांच्याबद्दल मोदी बोलले होते, ते काल त्यांच्या शेजारी बसले होते. देशात दुही माजवण्याचे‌ काम कोण करतंय ते जनतेला माहिती आहे. महिलांच्या अत्याचारावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे आमदार, नेते अडकले आहेत.

 

हिंदू धर्माचा उदो उदो करणाऱ्या मोदींनी श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी रामाचा व तिर्थाचा आपमान केला,असेही उल्हास पवार म्हणाले.

 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेडराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके इत्यादी उपस्थित होते.

Vasant More Resigns from Maharashtra Navnirman Sena..!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Vasant More Resigns from Maharashtra Navnirman Sena..!

Vasant More Katraj Pune – (The Karbhari News Service) – Vasant More, who is the center of discussion in the politics of Pune, has today declared Maharashtra Navnirman Sena Jai ​​Maharashtra. More has resigned his membership and all posts to founder president Raj Thackeray. In it, he has expressed regret about the internal politics in the party. (Pune Politics News)

| What did More say in the letter?

I have been trying my best to fulfill the responsibilities and mandates given to me by the party since its inception (indeed even earlier) as a member of the party and in other positions. While working continuously for the last 18 years for the growth of the party organization, I remained working in Pune city and Maharashtra as general secretary.

But in the recent past, the dirty politics within the party and the question mark on my loyalty towards the party against me by the senior officials of Pune city are very painful for me.

In order to get the party’s representatives elected in the future, I am giving help and activities to the local office bearers, empowering them. So today I am resigning from all posts including primary membership of Maharashtra Navnirman Sena.

Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की!

| श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

 

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil |पुणे : काँग्रेस आणि महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11)  येथील आशा नगर (PMC Ashanagar Water Tank) येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ranindra Dhangekar), मोहन जोशी  (Mohan Joshi Pune congress) तसेच काही पत्रकारांना धक्का बुक्की झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान या प्रकारामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनास येण्यास टाळल्याचे दिसून आले. (PMC Water Tank  | Datta Bahirat Patil)

See Video Here|https://www.instagram.com/reel/C2kAhQwNxoO/?utm_source=ig_web_copy_link

याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे. जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर, कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर, विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.