Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की!

| श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

 

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil |पुणे : काँग्रेस आणि महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11)  येथील आशा नगर (PMC Ashanagar Water Tank) येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ranindra Dhangekar), मोहन जोशी  (Mohan Joshi Pune congress) तसेच काही पत्रकारांना धक्का बुक्की झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान या प्रकारामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनास येण्यास टाळल्याचे दिसून आले. (PMC Water Tank  | Datta Bahirat Patil)

See Video Here|https://www.instagram.com/reel/C2kAhQwNxoO/?utm_source=ig_web_copy_link

याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे. जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर, कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर, विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

| श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – बहिरट

 

Datta Bahirat Patil | पुणे | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11) येथील आशा नगर पाण्याच्या टाकीची (PMC Aasha Nagar Water Tank) उभारणी काँग्रेसच्या आणि माझ्या प्रयत्नातून झाली असून प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) उदघाटन कॉंग्रेस कार्यकर्ते करतील, असे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat Ex Corporator) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (Datta Bahirat Patil Pune Shivajinagar)

या पत्रकार परिषदेला माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) उपस्थित होते.

The karbhari - Datta Bahirat pune shivajinagar
पत्रकार परिषदेला दत्ता बहिरट यांच्यासोबत माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते.

नगरसेवक या नात्याने  २० एप्रिल २०१२ रोजी आशानगर टाकीचे काम सुचविले. टाकीसाठी आशा नगर हौसिंग सोसायटी यांच्याशी संवाद साधून विनामोबदला जागा मिळवून दिली. नंतर सातत्याने पाठपुरावा केला, सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नाव निश्चित केले,अशी माहिती बहिरट यांनी दिली. भाजपचे स्थानिक आमदार केवळ श्रेय उपटू पहात आहेत, असा आरोप बहिरट यांनी केला.

आशानगर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता दत्ता बहिरट यांनी सन २०१रपासून अथक प्रयत्न केले. वीस लाख लिटर्स क्षमतेची टाकी झाली आणि आता भाजपचे स्थानिक आमदार आयत्या बिळावर रेघोट्या मारत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ तारखेला उदघाटन करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकी उभारणी कामाचे श्रेय बहिरट यांचे मान्य करावे, त्यांना डावलू नये अशी विनंती पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. या उपरही टाकी उदघाटन कार्यक्रम होणार असेल तर कॉंग्रेस कार्यकर्ते दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता करतील, असे आमदार रवि धंगेकर यांनी सांगितले.