Tag: Shivsena UBT
Shivsena UBT | PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करा | शिवसेना (UBT) ची मागणी
Indrayani River Pollution | इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
Indrayani River Pollution | आळंदी (Alandi) परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी (Indrayani River) हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून, नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील दैनंदिन वापराचे ६० ते ६५ एमएलडी पाणी कुठलीही प्रक्रिया न करता दूषित पाणी (Polluted water) थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या (Shivsena UBT) वतीने करण्यात आली आहे. (Indrayani River Pollution)
या परिसरातील औद्योगिक वसाहती आणि काही लघु, माध्यम कारखाने नदीत थेट सांडपाणी सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऐन वारीच्या तोंडावर आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या, भाविकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरात लवकर यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या पुणे विभाग प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेनेचे युवराज पारीख, विभागप्रमुख राजेश मोरे, शिवाजीनगर विभाग संघटक अतुल दिघे, शाखाप्रमुख राजेश शेलार, राजा गांजेकर, अभिषेक जगताप उपस्थित होते.
अनंत घरत (Anant Gharat) म्हणाले की, इंद्रायणीतील केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागत आहे हे आमच्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या इतकेच धक्कादायक आहे. आषाढी वारीच्यावेळी राज्यभरातील चार ते पाच दिवस लाखो भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अलंकापुरी जणू इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे “नाठाळाच्या माथी हाणू काठी” चा वापर करावा लागेल असे घरत म्हणाले.
——————
News Title |Indrayani River Pollution | Shiv Sena’s demand to file criminal charges against those responsible for discharging polluted sewage into Indrayani river
Sushma Andhare news | व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात | शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
Sushma Andhare News | व्यंगचित्र (Cartoon) हे समाजप्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे. एका व्यंगचित्रामध्ये खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून दुखऱ्या, बोचऱ्या गोष्टी हसतखेळत मार्मिक पद्धतीने अगदी सहजतेने समाजापर्यंत पोहोचवता येतात, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Shivsena UBT Deputy leader Sushma Andhare) यांनी व्यक्त केले. (Sushma Andhare News)
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, अमित पापळ यांनी केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे सचिव मकरंद पेटकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसाद चावरे, गणेश वायाळ, नंदू येवले, नितीन रावळ, संजय साळवी, मनीष घरत,राजेश शेलार, दिनेश पोटे, गणपत साळुंखे, दिलीप पोमन, प्रकाश चव्हाण, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, धनराज गरड, अमित पापळ आदी यावेळी उपस्थित होते. (Shivsena UBT)
अंधारे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्रांतून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्रांतून ठाम पद्धतीने मांडणी करण्यासाठीदेखील धाडस लागते. ते धाडस शिवसेनाप्रमुखांमध्ये होते. कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. (Shivsena UBT deputy leader Sushma andhare)
यावेळी संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, मुकीम तांबोळी, धनराज गरड यांनी मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत युवा गटामध्ये (१८ वर्षांखालील गट) प्रथम क्रमांक यश गायकवाड, द्वितीय क्रमांक निमिश सामंत, तृतीय क्रमांक मनोमय नार्वेकर यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक आभास शिळीमकर, शेराता क्षत्रिय, जीजा पापळ यांना प्रदान करण्यात आली. खुल्या गटामध्ये विजय नांगरे यांनी प्रथम, सुनील नेटके यांनी द्वितीय, श्रीपाद पालकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर वासुदेव बोंदरे, तोफिक बागवान, मुकीम तांबोळी, गौतम धिवार, शरद महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.
आयोजकांनी बाळकडू व्यंगचित्र स्पर्धा ही स्पर्धा म्हणजे एक मशाल असून ती सतत पेटत ठेवण्याचा निर्धार केला असे मत व्यक्त केले.
News Title |Sad things can be conveyed to the society in a poignant manner through cartoons Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare