Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Pune Water Crisis | पुणे | शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट येण्याची चिन्हे आहेत. कारण डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. दरम्यान महापालिका (PMC water supply department) देखील यावर गंभीरपणे विचार करत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत जलसंपदा विभागाने पालिकेला पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून  पाणीवापर सुरू केल्याने खडकवासला धरणातील  (Khadakwasla Dam)  दैनंदिन पाणीवापर तात्काळ नियंत्रित/कमी करण्याबाबत खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी हंगामाच्या कालवा सल्लागार समितीच्या  झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, पुणे जिल्हा तसेच अध्यक्ष कालवा सल्लागार समिती यांनी निर्देश दिलेले आहेत. पुणे महानगरपालिकेस खडकवासला धरणातून १२.६० टीएमसी वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. पुणे महानगरपालिका सध्या खडकवासला धरणातून सरासरी दैनंदिन १५१० एमएलडी पाणीवापर करीत आहे. उपरोक्तनुसार पुणे महानगरपालिकेचा नोव्हेंबर २०२३ सरासरी दैनंदिन एकूण पाणीवापर १५१० एमएलडी इतका असून असाच पाणीवापर सुरु राहिल्यास सन २०२३-२४ चा एकूण वार्षिक पाणीवापर १९.४६ टीएमसी इतका होईल. भामा आसखेड धरणातून पुणे म.न.पा.चा प्रत्यक्ष पाणीवापर सुरू केला असल्यामुळे त्याप्रमाणात खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर कमी होणे अपेक्षित आहे. तथापि सद्यस्थितीत तसे दिसून येत नाही. त्यामुळे १.१२.२०२३ पासून पुणे महानगरपालिकेने खडकवासला धरणातील पाणी वापर नियंत्रित/कमी न केल्यास पुणे शहरास उन्हाळा हंगाम २०२३-२४ मध्ये ग्रामीण भागास पिण्यासाठी व गुरांसाठी पाणी देण्यास पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. (Pune News)
जलसंपदा विभागाने पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने जरी पाणीवापर नियंत्रित/कमी केला नाही तरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे शहरास माहे जून- जुलै २०२४ मध्ये पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरात उन्हाळा अखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये प्राधान्याने ग्रामीण व शहरी भागास पिण्याचे पाणी देण्याची सुचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. तथापि जुलै २०२४ अखेरपर्यंत पुणे शहराचे पाणीवापराचे करून साधारणत: ग्रामीण भागासाठी २.५ टीएमसी चे पाणी बचतीचा आराखडा पुणे महानगपालिकेने तयार करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याबाबत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी बैठकीत निर्देश दिलेले आहेत. तथापि पाणीबचतीची अंमलबजावणी दि. ५.१२.२०२३ पासून करणे उचित राहील. असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. (Pune Water News)
सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते ३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. मात्र महापालिका यावर गंभीरपणे विचार करत आहे. त्यामुळे पाणीकपाती साठी पुणेकरांना तयार राहावे लागणार आहे.