Tag: Pune Water Crisis
Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण
जलसंपदा विभागाने म्हटले आहे कि, सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते
३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. याबाबत जगताप यांनी सांगितले कि पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.
| महापालिका 200 एमएलडी पाणी वाचवणार
Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना
ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे शहरास माहे जून- जुलै २०२४ मध्ये पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरात उन्हाळा अखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये प्राधान्याने ग्रामीण व शहरी भागास पिण्याचे पाणी देण्याची सुचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. तथापि जुलै २०२४ अखेरपर्यंत पुणे शहराचे पाणीवापराचे करून साधारणत: ग्रामीण भागासाठी २.५ टीएमसी चे पाणी बचतीचा आराखडा पुणे महानगपालिकेने तयार करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याबाबत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी बैठकीत निर्देश दिलेले आहेत. तथापि पाणीबचतीची अंमलबजावणी दि. ५.१२.२०२३ पासून करणे उचित राहील. असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. (Pune Water News)