Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आप पक्षांच्या कार्यकर्त्यांवर महापालिकेकडून गुन्हा दाखल 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आप पक्षांच्या कार्यकर्त्यांवर महापालिकेकडून गुन्हा दाखल

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका शाळेतील (PMC Pune Schools) विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन (Sanitory Napkins) मिळावेत, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या (AAP Pune) वतीने महापालिकेत आंदोलन (Agitation in PMC) करण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीबाबत महापालिका प्रशासनाने आक्षेप घेत त्यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलिसात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना मागच्या एक वर्षा सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीत म्हणून आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सॅनिटरी नॅपकिनच्या वाटपाची मागणी केली. मात्र हे आंदोलन करताना पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी कुठलीही परवानगी घेतली नाही. असा आक्षेप महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (PMC Security officer Rakesh Vitkar) यांनी घेतला आहे. (Pune PMC News)
याबाबत विटकर यांनी सांगितले कि, सर्वांनाच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आप पक्षाने अशी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पुणे शहरात 144 कलम लागू आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ठराविक अंतरावर आंदोलन करण्यास मनाई आहे. तसेच पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  महापालिका आयुक्त यांच्या गाडीवर सॅनिटरी नॅपकिन चिटकवले. हे सरकारी मालमत्तेचे  विद्रुपीकरण आहे. तसेच महापालिकेच्या आवारात  घोषणा, आंदोलन, सभा घेण्यास परवानगी नाही. असे असतानाही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि आंदोलन करताना महापालिका आयुक्त यांच्या विरोधात अर्वाच्च भाषा वापरली. त्यामुळे आगामी काळात असे प्रकार घडू नयेत म्हणून आम्ही आप पार्टीच्या 15-20 कार्यकर्त्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. असे विटकर यांनी सांगितले.

AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News Political social पुणे

AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

AAP Pune | गुजरात आणि गोवा यासारख्या राज्यात काही प्रमाणात विधानसभेच्या निवडणुका जिंकतानाच, अनेक राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party pune) नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच काही ग्रामपंचायती देखील आम आदमी पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. आणि भविष्यात यात आणखी जोमाने वाढ होईल असे सध्या चित्र आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्याकडून नियमितपणे मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातही लवकरच आम आदमी पक्षाचा झाडू इतर पक्षांची राजकारणाच्या मैदानातून सफाई करताना दिसेल. असे आम आदमी पक्षाच्या ११ वा वर्धापन दिन प्रसंगी बोलताना आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale) यांनी सांगितले. (AAP Pune)

अकरा वर्षाच्या अल्पशा कालखंडात दिल्ली आणि पंजाब सारख्या दोन राज्यात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने आज आपला वर्धापन दिन आणि संविधान दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि महाराष्ट्र सचिव प्राजक्ता देशमुख या उपस्थित होत्या. तसेच संपूर्ण पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षातील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. इंडिया अगेंस्ट करप्शन सारख्या चळवळी च्या प्रेरणेतून निर्माण झालेला हा पक्ष हा संपूर्ण देशभरात वेगाने आपली घोडदौड करत आहे. अकरा वर्षाच्या अल्पशा काळात पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यापर्यंतची मजल मारली आहे. ही मजल मारताना पक्षाने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आणि पक्षाची विचारसरणी जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी मोफत बस सेवा, मोफत वीज, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक, अनेक सरकारी दाखले तसेच कागदपत्रे यांची घरपोच सुविधा देणे यासारख्या जनहिताच्या अनेक योजना या अकरा वर्षाच्या कालावधीत पक्षाने राबवल्या ज्या अत्यंत लोकप्रिय झाल्या असून नागरिकांना या सर्व भ्रष्टाचार विरहित योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा झालेला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येण्यापूर्वी २०१४-१५ चे बजेट हे ३५,००० करोडचे होते जे आज वाढून २०२२-२३ मध्ये ७९,००० करोडचे झाले आहे यावरून दिल्ली सरकारच्या गुड गव्हर्नन्स चा प्रत्यय येतो.

भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करता दिल्ली सरकारने राज्यात अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स बनवण्यास सुरुवात केली आहे, दिल्ली मधील अनेक तलावांचे सुशोभीकरण करत दिल्ली सरकारने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. उदयन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारतर्फे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ची सुरुवात देखील करण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यात सरकारी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला जात आहेत. शिक्षक भरती सारखा विषय उत्कृष्टपणे हाताळून दोन्ही राज्यांना अधिकाधिक सुशिक्षित बनवण्याचा आटोकाट प्रयत्न आम आदमी पक्षाच्या सरकारतर्फे केला जात आहे. जुनी पेन्शन योजना देखील दिल्ली सरकारने पुन्ह:च्या लागू करताना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

 

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात स्वतः लक्ष घातले असल्याने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत याची सुरुवात लवकरच येऊ घातलेल्या निवडणुकांपासून सुरू होईल. तसेच आम आदमी पक्ष हा लवकरच पुणे महानगरपालिकेत देखील आपले खाते उघडेल अशी आशा यावेळी बोलताना पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शाहीन पठाण, ॲड.अमोल काळे आणि किरण कद्रे यांनी केले.

 

AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी पद्धतीने भरती च्या आदेशाविरोधात आपचे आंदोलन

AAP | बाह्ययंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचे पॅनल नियुक्त करण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.. त्यानुसार विविध पदांवरती शासकीय विभाग, निमशासकीय विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था ,महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींना कंत्राटांवर भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा बाह्य एजन्सीमार्फत कंत्राटी नोकरभरतीचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी तर्फे शास्त्री रोड, नवी पेठ भागात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यास भरती परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात विविध शासकीय विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या भरती साठी गेली काही वर्षे एमपीएससी व इतर भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. सरळ सेवा भरतीची हे लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. असे असताना या नवीन कंत्राटी धोरणामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत. अंदाजे ७५००० सरकारी जागा या एजन्सी/ कंत्रादारांकडून भरल्या जातील असा अंदाज आहे.

या आदेशानुसार भरती केलेल्या पदासाठी निर्धारित पगाराच्या केवळ ६० टक्के रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला हातात दिली जाणार आहे आणि दरमहा १५ टक्के रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदाराला मिळणार आहे. हे कंत्राटदार आणि मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचे आणि वशिल्याच्या भरती चे कुरण ठरणार आहे. स्पर्धा नसल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे तर वंचित घटकातील मुलांना संधीच मिळणार नाही. तसेच या पद्धतीमुळे संबंधित व्यक्तीचे जनतेप्रती उत्तरदायित्व व जबाबदारी राहणार नाही, जनतेस सेवाहमी मिळणार नाही. असे आक्षेप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले व दिल्ली पंजाब आदी ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. तसेच कंत्राटावर असणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याचे धोरण आम आदमी पार्टीची सरकारे राबवत आहेत असे असताना महाराष्ट्रात मात्र याच्याबरोबर उलटे धोरण भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांचे शिंदे फडणवीस पवार सरकार राबवत आहे असे सांगितले.

आजच्या आंदोलनात मुकुंद किर्दत यांच्या सह अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड अमोल काळे, किरण कद्रे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, शाशिभूषण होले, अभिजीत गायकवाड,साजिद कुरेशी, इरफान रोड्डे, मनोज थोरात, सय्यद अली, संजय रणधीर, शंकर थोरात,तानाजी शेरखाने, किरण कांबळे, अविनाश भाकरे, असगर बेग, जिबरील शेख, असिफ मोमीन, उमेश बागडे, शेखर ढगे, माधुरी गायकवाड, फाबियन समसन, अजय पैठणकर, प्रभाकर कोंढाळकर, शिवाजी डोलारे, उत्तम वडावराव , सुनील भोसले, किर्तीसिंग चौधरी, बाबा शिरसाट, बापू रणसिंग, सखाराम भोकर,निखिल खंदारे इत्यादीनी सहभाग घेतला.