AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी पद्धतीने भरती च्या आदेशाविरोधात आपचे आंदोलन

AAP | बाह्ययंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचे पॅनल नियुक्त करण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.. त्यानुसार विविध पदांवरती शासकीय विभाग, निमशासकीय विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था ,महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींना कंत्राटांवर भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा बाह्य एजन्सीमार्फत कंत्राटी नोकरभरतीचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी तर्फे शास्त्री रोड, नवी पेठ भागात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यास भरती परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात विविध शासकीय विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या भरती साठी गेली काही वर्षे एमपीएससी व इतर भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. सरळ सेवा भरतीची हे लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. असे असताना या नवीन कंत्राटी धोरणामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत. अंदाजे ७५००० सरकारी जागा या एजन्सी/ कंत्रादारांकडून भरल्या जातील असा अंदाज आहे.

या आदेशानुसार भरती केलेल्या पदासाठी निर्धारित पगाराच्या केवळ ६० टक्के रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला हातात दिली जाणार आहे आणि दरमहा १५ टक्के रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदाराला मिळणार आहे. हे कंत्राटदार आणि मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचे आणि वशिल्याच्या भरती चे कुरण ठरणार आहे. स्पर्धा नसल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे तर वंचित घटकातील मुलांना संधीच मिळणार नाही. तसेच या पद्धतीमुळे संबंधित व्यक्तीचे जनतेप्रती उत्तरदायित्व व जबाबदारी राहणार नाही, जनतेस सेवाहमी मिळणार नाही. असे आक्षेप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले व दिल्ली पंजाब आदी ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. तसेच कंत्राटावर असणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याचे धोरण आम आदमी पार्टीची सरकारे राबवत आहेत असे असताना महाराष्ट्रात मात्र याच्याबरोबर उलटे धोरण भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांचे शिंदे फडणवीस पवार सरकार राबवत आहे असे सांगितले.

आजच्या आंदोलनात मुकुंद किर्दत यांच्या सह अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड अमोल काळे, किरण कद्रे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, शाशिभूषण होले, अभिजीत गायकवाड,साजिद कुरेशी, इरफान रोड्डे, मनोज थोरात, सय्यद अली, संजय रणधीर, शंकर थोरात,तानाजी शेरखाने, किरण कांबळे, अविनाश भाकरे, असगर बेग, जिबरील शेख, असिफ मोमीन, उमेश बागडे, शेखर ढगे, माधुरी गायकवाड, फाबियन समसन, अजय पैठणकर, प्रभाकर कोंढाळकर, शिवाजी डोलारे, उत्तम वडावराव , सुनील भोसले, किर्तीसिंग चौधरी, बाबा शिरसाट, बापू रणसिंग, सखाराम भोकर,निखिल खंदारे इत्यादीनी सहभाग घेतला.

 

Aam Aadmi Party | ISRO | इसरोच्या शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे आम आदमी पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन

Categories
Breaking News Political social पुणे

Aam Aadmi Party | ISRO | इसरोच्या शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे आम आदमी पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन

Aam Aadmi Party | ISRO | चंद्रयान-3 मोहीम (Chandrayaan 3 Mission) यशस्वी करत भारताला प्रगतीपथाकडे नेणाऱ्या इसरोमधील (ISRO) शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे आम आदमी पक्षातर्फे (Aam Aadmi Party) हार्दिक अभिनंदन करण्यात आले. (Aam Aadmi Party | ISRO)
 २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या इस्रो (ISRO) या अंतराळ विषयक संशोधन करणाऱ्या संस्थेने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अंतराळात प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान ३ या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाय रोवले. आणि त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा पाय ठेवण्याचा बहुमान भारत देशाला मिळाला. आज पर्यंत अनेक देशांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मोहिमा यशस्वी झाल्या नाहीत. रशियाचे लुना 25 हे यान देखील दोनच दिवसांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोसळले असल्याने भारताच्या यानाचे काय होणार याबद्दल साशंकता होती, परंतु शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतर आणि २०१९ मध्ये आलेल्या चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान ३ मध्ये केलेल्या बदलांमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला, तसेच चंद्रावर उतरणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथा देश ठरला.
भारताच्या या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारत अधिक वेगाने प्रगती करेल आणि जगात एक वेगळे नावलौकिक प्राप्त करेल अशी आशा निर्माण झाली आहे.
सदर चंद्रयान ३ मोहिमेचा भाग असलेल्या सर्व शास्त्रज्ञांनी भारताला एक नवीन नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल आम आदमी पक्षातर्फे त्यांचे हार्दिक आभार तसेच अभिनंदन केले जात आहे शास्त्रज्ञांनी असेच प्रयत्न करून देशाचे नाव आणखी पुढे नावे हीच अपेक्षा आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे. तसेच ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेने तारांगण उभारले आहे, त्याच धर्तीवर पुण्यातही पुणे महापालिकेच्या माध्यमातून एक अंतराळ निरीक्षण व संशोधन केंद्र उभारले जावे ज्यामुळे शहरातील अनेक लहान मोठ्या मुलांना ग्रहताऱ्यांविषयी अभ्यास करता येईल आणि भविष्यात अनेक शास्त्रज्ञ हे पुण्यातूनही निर्माण होतील अशी अपेक्षा पक्षातर्फे व्यक्त केली गेली.

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Pimpari Chinchwad Smart City | AAP |आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) कडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे.  येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खड्यांमध्ये झाडे लावू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू. असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (Raviraj Kale) यांनी दिला. (Pimpari Chinchwad Smart City | AAP)

काळे यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते. स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी. अशी मागणी काळे यांनी केली आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)


News Title |Pimpari Chinchwad Smart City | AAP | Paper boats left by AAP in stagnant water in Pimpri Chinchwad city

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

 Pimpari Chinchwad Municipal Corporation  | पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpari chinchwad city) इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील (Indrayani, pawana, Mutha River) जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिले आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो.  येत्या आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू. तसेच  आयुक्त (PCMC Commissioner) म्हणून त्याच जलपर्णीचा हार करून घालू. असा इशारा  आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (AAP city President Raviraj Kale) यांनी दिला आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)
आप पार्टीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार  गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आपण काम पाहत आहात. परंतु आजपर्यंत आपणसुद्धा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी  खेळण्याचा प्रकार चालू आहे. आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आली होते. मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर  सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना  कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले का दिले जात होते? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का? महानगरपालिकेचे बोधवाक्य बदलण्याची हीच योग्य वेळ आहे “कटिबद्ध जनहिताय”बदलून “कटिबद्ध ठेकेदार” हिताय असे जाहीर करावे एवढेच महानगरपालिकेकडून बाकी राहिले आहे.
निवेदनांत पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नाही. आपणसुद्धा ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहत आहात*.गेल्यावर्षी आम्ही 15 तरूणांनी मुळा नदीपात्रात उतरून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती आणि तिच जलपर्णी मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्टाद्वारे पाठवली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती. ठीक त्याच प्रमाणे यावेळी आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
News Title | Pimpari Chinchwad Municipal Corporation |  AAP warns Pimpri Chinchwad Municipal Commissioner to garland Jalparni

PCMC | मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी करावी – रविराज काळे

Categories
Breaking News Political social पुणे

मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी  करावी – रविराज काळे

 दापोडी येथिल 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदिपात्रात सोडण्यात येत आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे.
काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गंभिर बाब म्हणजे मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगार मैला कोणत्या सुरक्षा साधनांशिवाय उचलण्याचे काम करत होते. कामगारांच्या पायात बूट नव्हते, हंडग्लोज नव्हते. हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी निकम  यांच्या समोर चालू होता. त्यांच्यासोबत ठेकेदार देखिल हजर होता परंतु त्या ठेकेदाराला बोलण्याची किंवा या सर्व चालू असलेल्या प्रकाराची विचारायची देखिल हिंमत झाली नाही.असे पालिकेचे अधिकारी काम करत आहेत.मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात आले या प्रश्नी तेथील सुपरवाईजर यांना विचारले असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरे नव्हती.
        या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदिपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे असे निदर्शनास आले.यामुळे नदिपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.संबंधित ठेकेदारामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी.संबधीत प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि आम आदमी पार्टीचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,निरज सुतार यांनी केली आहे. अन्यथा मनपा समोर आंदोलन करण्याचा इशारा देखिल दिला आहे.

AAP | Kasba By election | आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

Categories
Breaking News Political पुणे

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे,  एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे  आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल” असे त्यांनी सांगितले.

विजय कुंभार म्हणाले, “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

 

Aam Aadmi Party | दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर | विविध प्रकल्पांची करणार पाहणी

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर

| विविध प्रकल्पांची करणार पाहणी

दिल्ली विधानसभा आणि महापालिकेवर (Delhi Legislative Assembly and Municipal Corporation) एकहाती सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार, नगरसेवक पुण्यातील कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प आणि उत्पन्न वाढीसाठी मिळकतकर याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी १४ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.२१) आणि गुरुवारी (ता. २२) शहरातील विविध ठिकाणी भेटी देणार आहे. (Pune Municipal corporation)

पुणे शहरातील कचरा फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर उघड्यावर टाकणे बंद केले, त्यानंतर कचरा जिरविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये कचरा डेपो येतील लाखो टन कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅपींग करणे, तो परिसर दुर्गंधीमुक्त करणे, वृक्षारोपण करणे अशी कामे केली.(PMC Pune)

ओला कचरा जिरविण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू केले. सध्या शहरातील१३ प्रकल्प सुरू आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छ संस्थेमार्फत घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे मॉडल अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. दिल्ली विधानसभेत आपची सत्ता आहे. पण महापालिकेत भाजपची सत्ता होती. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणूका झाल्या, त्यामध्ये आपने महापालिकेवरही सत्ता मिळवली आहे. दिल्ली महापालिकेत दिल्लीतील सर्व ७ खासदार, १४ आमदार आणि सर्व नगरसेवक यांच्या विविध समित्या स्थापन केल्या जातात. त्यापैकी एक समिती पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये आमदार, नगरसेवक आणि अधिकारी असे १४ जणांचे शिष्टमंडळ आहे. महापालिकेत त्यांची आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.(Aam aadmi party)

Health Officer : PMC : आरोग्य प्रमुख डॉ भारती यांना मुदतवाढ 

Categories
Breaking News PMC Political पुणे

आरोग्य प्रमुख डॉ भारती यांना मुदतवाढ

:राज्य सरकारकडून 4 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढीचा आदेश

पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांचा महापालिकेतील प्रति नियुक्ती वरील कालावधी 4 ऑक्टोबर 2021 लाच संपला होता. त्यावर डॉ भारती यांनी सरकारकडे कालावधी वाढवून मागितला होता. त्यावर बरेच दिवस निर्णय झाला नव्हता. अखेर सरकारने डॉ भारती यांना 4 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. दरम्यान डॉ भारती यांच्या मुदतवाढी ला जोरदार विरोध होत होता. सरकारचे आदेश डावलत आपल्याच विभागात आपल्या पत्नीला नोकरी दिल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता. शिवाय त्यांच्या कालावधीत आरोग्य विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील आप पार्टीने केला आहे.

: काय आहे शासन आदेश :-

डॉ. आशिष हिरालाल भारती, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कु.क.) पुणे यांच्या सेवा संदर्भाधी दि.३०.०९.२०२० च्या शासन आदेशान्वये पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ.आशिष भारती यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी दि.०४.१०.२०२१ रोजी संपुष्टात आला आहे.
२. आता, या शासन आदेशान्वये डॉ. आशिष भारती यांना पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावरील प्रतिनियुक्तीस दि.०५.१०.२०२१ पासून पुढे एक वर्ष म्हणजेच दि.०४.१०.२०- पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत होणारी वशिलेबाजी, विलंब याची चौकशी व्हावी :  आम आदमी पक्ष
डॉ अभिजीत मोरे, आप प्रवक्ते याच्या म्हणण्यानुसार आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ योगिता रामचंद्र गोसावी या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्या संवर्गाची प्रारुप यादी दिनांक १७/१२/२०२० रोजी जावक क्रमांक अतिमआ/साप्रवि/आस्था/६४८३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली. या संवर्गाची अंतिम यादी दिनांक २०/०४/२०२१ रोजी जावक क्रमांक अतिमआ/ आस्था/साप्रवि/४८८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आणि नेमणूक पत्र देण्यात आले. आरोग्य प्रमुखांच्या पत्नी असलेल्या संवर्गाच्या नेमणुका करण्यासाठी आरोग्य प्रमुखांनी दाखवलेली तत्परता इतर संवर्गासाठी का दाखवली गेली नाही?

कोविड संकटकाळात असून देखील आणि योग्य पात्रता असलेले डॉक्टर पुणे मनपात सेवा देण्यासाठी तयार असताना, छाननीमध्ये ते पात्र होऊन प्रारुप यादी प्रसिद्ध होऊन वर्ष ते दीड वर्षे होऊन देखील अंतिम यादी का जाहीर केली जात नाही? भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि राजकीय लागेबांधे असणाऱ्या उमेदवारांना घेण्यासाठीच ही प्रक्रिया मुद्दाम रखडवली गेली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने यांच्या दुर्दशेसाठी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा कारणीभूत आहे. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यांचे सर्व लक्ष ठेकेदारी, कमिशनबाजी, भ्रष्टाचार याकडेच लागले असून त्यामुळे सामान्य जनतेचे मात्र मरण आहे.

आम आदमी पक्ष मागणी करत आहे की- आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत होणारी वशिलेबाजी, विलंब याची चौकशी व्हावी आणि पात्र डॉक्टरांना विनाविलंब नेमणूक पत्र देण्यात यावे.

Chandigarh Mayor Election 2022: भाजपा की सरबजीत कौर बनीं चंडीगढ़ की मेयर : AAP उम्मीदवार को 1 वोट से हराया 

Categories
Breaking News Political देश/विदेश हिंदी खबरे

 भाजपा की सरबजीत कौर बनीं चंडीगढ़ की मेयर

AAP उम्मीदवार को 1 वोट से हराया

चंडीगढ़ : नगर निगम चुनाव के परिणाम में किसी पार्टी को स्पष्ट बहुमत नहीं मिलने के बाद शनिवार को मेयर का चुनाव भी हो गया। भाजपा की सरबजीत कौर चंडीगढ़ की नई मेयर चुनी गई हैं। उन्होंने आम आदमी पार्टी की उम्मीदवार को 1 वोट से हराया। भाजपा प्रत्याशी को जहां 14 वोट मिले, वहीं AAP उम्मीदवार के खाते में 13 वोट गए। एक वोट फटा हुआ मिला, जिसे रद्द कर दिया गया। कुल 28 वोट पड़े। एक वोट रद्द करने को लेकर AAP पार्षदों और कार्यकर्ताओं ने भारी हंगामा किया। बता दें कांग्रेस और शिरोमणि अकाली दल ने वोटिंग का बहिष्कार किया।

 आम आदमी पार्टी ने जीती थी सबसे ज्यादा सीटें

हाल ही में संपन्न हुए चंडीगढ़ नगर निगम चुनावों में खंडित जनादेश आया क्योंकि किसी एक दल को स्पष्ट बहुमत नहीं मिला। आम आदमी पार्टी (AAP) ने 35 नगर निगम सीटों में से 14, भाजपा ने 12 और कांग्रेस ने आठ सीटों पर जीत हासिल की, जबकि शिरोमणि अकाली दल को सिर्फ एक सीट मिली। आम आदमी पार्टी इस प्रदर्शन से बहुत खुश थी और विजयी जुलूस में खुद अरविंद केजरीवाल शामिल हुए थे। केजरीवाल  का कहना था कि यह पंजाब विधानसभा चुनाव 2022 का ट्रेलर है, लेकिन मेयर नहीं बनने से पार्टी को झटका लगा है।