Pune Akashvani | पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करू नका

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Pune Akashvani | पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करू नका

| खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Pune Akashvani | मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने (Pune Akashvani Centre) तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे लक्षात घेता येथील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग (Pune Akashvani News Centre) बंद करू नये, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली असून हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी येथे पुर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रसारभारतीने (Prasad Bharti) आकाशवाणी, पुणे केंद्रातील (Akashvani Pune Centre)!प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी उपलब्ध नसल्याने हा विभाग बंद करणार असल्याचे प्रसारभारतीने स्पष्ट केले आहे. परंतु प्रत्यक्षात भारतीय माहिती सेवेतील (आय आय एस) दोन अधिकाऱ्यांची पदे यापुर्वीच प्रसारभारतीने इतर केंद्रांवर स्थानांतरीत केली आहेत. यासंदर्भात पुणे आकाशवाणी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपल्याकडे मागणीचे निवेदन दिले आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
पुणे आकाशवाणी वृत्तविभागामार्फत प्रसारीत होणारी बातमीपत्रे येत्या १९ जूनपासून पुणे केंद्रावर ऐकायला मिळणार नाहीत. या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील बंद होणार आहेत. याबाबतचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील वृत्तविभाग बंद करू नये, अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
पुणे वृत्तविभाग १ मे १९७५ रोजी सुरु झाला असून येथील बातमीपत्रांची लोकप्रियता संपूर्ण राज्यभरात आहे. सध्या युट्युबवरील या विभागाचे चॅनेल आणि सोशल मीडियाद्वारे ही बातमीपत्र जगभरात पोहोचतात. विविध भारतीवरील ठळक बातम्या आणि पुणे वृत्तांत या विशेष बातमीपत्राद्वारे श्रोत्यांना दरम्यानच्या काळातील ताज्या बातम्या मिळत असतात. श्रोतेही सजगपणे या बातमीपत्रांना फॉलो करत आहेत. कोरोना काळामध्ये आदेश मिळाल्यानंतर पुणे वृत्त विभागाने अल्पावधीतच तीन मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे ताबडतोब पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यास सुरुवात केली. सर्व अडचणींवर मात करुन दीड वर्षांहून अधिक काळ ही कामगिरी या विभागाने करुन दाखवली आहे. अशा प्रसंगी सर्व वृत्त कारभार मुंबईसारख्या एकाच केंद्रावर एकवटल्यास कोरोनासारख्या संकटात तिथून बातमीपत्रं प्रसारित करण्यात अडचणी आल्यास पुण्यासारखा वृत्त विभाग अतिशय महत्वाचा आहे हे देखील अधोरेखित झालं होतं, असे सुळे यांनी म्हटले आहे.
हा विभाग बंदच झाला तर श्रोत्यांची देखील मोठी गैरसोय होणार आहे. मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. शिवाय या शहरात आकाशवाणीचे माध्यम आजही लोकप्रिय आहे. हे लक्षात घेता पुणे वृत्तविभाग बंद करु नये. उलट हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी येथे पुर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
—-/
News Title | Pune Akashvani |  Don’t shut down news section of Pune Akashvani
 |  MP Supriya Sule’s demand to the central government

Free booster dose | 15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस | ७५ दिवस राहणार सुविधा 

Categories
Breaking News social आरोग्य देश/विदेश

15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस

| ७५ दिवस राहणार सुविधा

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी 1 टक्‍क्‍यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या सावधगिरीच्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. म्हणजेच दुसऱ्या इंजेक्शननंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेता येतो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरण तीव्र करण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘हर घर दस्तक अभियान 2.0’ ची दुसरी फेरी सुरू केली आहे. ही दोन महिन्यांची मोहीम आता सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 96 टक्के लोकसंख्येला कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 87 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Anurag Thakur | BJP | राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा | अनुराग ठाकूर

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा | अनुराग ठाकूर

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राजकारणाबरोबर कार्यकर्त्यांनी अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवला पाहिजे,असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

ठाकूर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. त्या वेळी सर्किट हाऊस येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.

भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी. धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेलासारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल.

मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.

Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Categories
Breaking News Political Sport देश/विदेश पुणे महाराष्ट्र

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या

| खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

पुणे  : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री  अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली.

यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा या खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते. सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.
आपल्या सर्व देवादिकांच्या हातामध्ये शस्त्रा बरोबर वाद्यांचा देखील समावेश आहे. सरस्वतीची विना, कृष्णाचा शंख, आणि बासरी, शंकराचा डमरू अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. ढोल-ताशा ही लोकवाद्य या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रात घराघरात मंगलकार्य असेल तर तसा पुरणा-वरणाचा नैवद्य दाखवला जातो. तव्दत मंगल कार्यासाठी ढोल-ताशांचे वादन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांची माहिती असे नाही, तर आता गुजरात, गोवा, सेलवासा, आंध्र प्रदेश अशा राज्यातून देखील ढोल ताशा खेळाचा प्रकार आणि प्रसार होतो आहे. आपल्या देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असता, त्यांचे स्वागत देखील ढोल-ताशा खेळाने झाले आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला.

2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.

ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जाण निर्माण करण्याची ताकद या खेळा आहे. ढोल-ताशा वादनासाठी झांजा, ध्वज, लेझीम वाचविण्यासाठी प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि एनर्जीची आवश्यकता असते. ७ ते ८ तास न थांबता, न थकता आणि घामाने वादन करणे हे कुठल्याही खेळाशी म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळातील दमणुकीशी साधणारे आहे. याव्यतिरिक्त अबालवृद्धांना या ढोल-ताशा वादनाने मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. काही मंडळी वादनाचा आनंद घेतात, काही मंडळी या तालावर थिरकण्याचा, नाचण्याचा आनंद घेतात, तर उर्वरित मंडळी यातून निर्माण होणाऱ्या कर्णमधुर लोकसंगीताचा आनंद घेतात. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.