MLA Chetan Tupe : आमदार चेतन तुपे यांनी फडणवीस यांना दाखवला आरसा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार चेतन तुपे यांनी फडणवीस यांना दाखवला आरसा

: फडणवीसांच्या काळात भाजपला 99 टक्के अन् शिवसेनेला 0.61% निधी

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात कमी निधी मिळाल्याची आकडेवारीच त्यांनी सभागृहात सादर केली होती. आता, राष्ट्रवादीनेही आकडेवारी शेअर करत फडणवीसांना आरसा दाखविण्याचं काम केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा केली. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधकांनी राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करत राष्ट्रवादीचे नेते आमदार चेतन तुपे यांनी फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील आकडेवारीच सभागृहात सांगितली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना, २०१८-१९ मध्ये एकूण अर्थसंकल्पाच्या ९९.३९ टक्के एवढा निधी भाजपच्या खात्यांना दिला गेला होता. तर शिवसेनेच्या खात्यांना ०.६१ टक्के एवढा निधी दिला होता. तसेच २०१९-२० मध्ये भाजपच्या खात्यांना ९९.४० टक्के तर शिवसेनेच्या खात्यांना ०.६० टक्के निधी देण्यात आला होता, अशी माहिती तुपे यांनी सभागृहासमोर मांडली. दरम्यान, फडणवीस सरकारनेच शिवसेनेला सर्वात कमी निधी दिला होता, असेही तुपेंनी सांगितले.

दरम्यान, गडकिल्ले असो किंवा तीर्थक्षेत्र, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विकासासाठी मोठा निधी दिली आहे, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास चेतन तुपे यांनी व्यक्त केला. ज्याप्रमाणे गडकिल्ले, स्मारकांना निधी दिला त्याप्रमाणेच कोविड काळात वस्तूसंग्रहालये बंद असल्यामुळे त्यांच्या मिळकतीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांनाही निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

निधीबाबत काय म्हणाले होते फडणवीस

अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच दिल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी ३ लाख १४ हजार ८२० कोटी रुपये म्हणजे तब्बल ५७ टक्के निधी हा राष्ट्रवादीच्या खात्यांना मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या खात्यांना १ लाख १४ कोटी रुपये म्हणजे २६ टक्के निधी मिळाला आहे. सर्वांत कमी १६ टक्के म्हणजे ९० हजार कोटी रुपये हे शिवसेनेच्या खात्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षीही असेच चित्र होते. ज्या ठिकाणी पगार जास्त द्यावा लागतो ती खाती काँग्रेसकडे आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.
राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

 

Devendra Fadanvis Vs NCP : फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब  राजकीय जीवनामध्ये  सक्रिय : पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब  राजकीय जीवनामध्ये  सक्रिय

: पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण प्रभावाने सक्रिय आहेत. त्यांनी या काळात राजकीय आणि सामजिक अवकाश व्यापून टाकला आहे. मात्र, २० वर्षांच्या, त्यातही निम्मा काळ नागपूर शहरातील एका मतदारसंघापुरते सक्रिय असणाऱ्या फडणवीस यांनी पवार साहेबांवर टीका करणे अगदीच हास्यास्पद आहे. शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदावर बसावे लागले आहे. त्याचीच मळमळ फडणवीसांच्या मनातून अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. असा टोला पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

 

जगताप म्हणाले,  साहेबांनी सहा दशकांच्या कारकीर्दीमध्ये १४ निवडणुका लढवल्या आणि सर्वच्या सर्व वाढत्या मताधिक्याने जिंकल्या. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर देशाच्या १३ राज्यांमध्ये आमदार निवडून आणणे, तीन राज्यांमध्ये खासदार निवडून आणणे, केंद्रातील सत्तेमध्ये सहभागी होणे, ही किमया शरद पवार साहेबच करू शकतात. या जोडीला बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट संघटनांची धुराही त्यांनी सांभाळली. राज्यातील अनेक संस्था-संघटनांना आधार दिला. अनेक संघटना उभारून, त्या जागतिक दर्जाच्या केल्या. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संबंध निर्माण केले. याउलट, फडणवीसांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठीही कोणत्या तरी लाटेचा आधार घ्यावा लागतो. पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल.

केवळ निवडणुकीचा विचार करून लोकप्रिय घोषणा करायच्या आणि कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकायची, हा पवार साहेबांचा स्वभाव नाही. राजकारण करत असताना, केवळ निवडणुकांपुरता विचार करायचा नसतो. तर, या राजकारणातून सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करायचा असतो, माणसांना जोडायचे असते. त्यांची आयुष्ये उभी करायची असतात. पवार साहेबांनी राज्यामध्ये किती नेते उभे केले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. आजही, फडणवीस यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले, तर पवार साहेबांच्या आशीर्वादावर मोठे झालेले नेतेच त्यांना दिसतील. फडणवीसांनी एकदा पक्षाची झूल अंगावरून फेकून उभे राहावे, मग त्यांना त्यांची ताकद काय आहे, हे कळून येईल. केवळ स्पर्धेपूर्वी औषधे खाऊन दंडाच्या बेटकुळ्या फुगवण्यासारखी फडवणीसांची अवस्था आहे. तर, पवार साहेबांच्या तालमीमध्ये फडणवीसांपेक्षा जास्त ताकदीचे कितीतरी नेते तयार झाले आहेत. पण, कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते झालेल्या फडणवीस यांना वास्तवाचे भान आलेले नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.

 

Pune First : Ganesh Bidkar : अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम

Categories
PMC Political social पुणे महाराष्ट्र

अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम

– सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

पुणे : पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी, यासाठी “पुणे फर्स्ट” हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ही एक वेबसाईट असून याचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच झाला. पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून पुणे फर्स्ट उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुणे हे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात फक्त राज्यातच नव्हे तर देशात अग्रेसर असणारे शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुणे महानगरपालिका हे देशातील सर्वात मोठे शहर ठरलेले आहे. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहेच, पण भविष्यातही सर्वच बाबतीत पुणे कायमच अग्रेसर राहावे, विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत यासाठी गट- तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून “पुणे फर्स्ट” या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, मान्यवरांनी मार्गदर्शन करावे यासाठीचे व्यासपीठ म्हणून सुद्धा हा मंच काम करेल, असे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या शहरी विकासाचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. www.punefirst.org या वेबसाईटला भेट देऊन नागरिकांना या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सभागृह नेते बिडकर यांनी केले आहे.

Atal Shakti Mahasampark Abhiyan : देवेंद्र फडणवीस म्हणतात, पुणे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते!

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुणे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते : देवेंद्र फडणवीस

: 25 डिसेंबरला भाजपचे अटलशक्ती महासंपर्क अभियान

पुणे : पुण्यात लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जार्इल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे प्रकाधन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते काहीही करू शकतात. पुण्यात चांगले काम केले आहे. लोकांमध्ये सकारात्मकतेची भावना आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करा.

राणे म्हणाले, पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरुकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरुक राहायला पाहिजे.

पाटील म्हणाले, भाजपचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखांहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत या माध्यमातून संघटनचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याची योजना करण्यात आली आहे. त्यासाठी मंडल बैठका, प्रभाग बैठका, शक्ती केंद्र बैठका, बूथ बैठका, बूथ समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे दीड लाख कुटुंबांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाचे प्रमुख राजेश पांडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आठ मंडलातील ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तीकेंद्र प्रमुख, ३००० बूथप्रमुख आणि ३३ हजार बूथ संपर्क कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध योजना आणि विकासकामांबरोबर कॉल सेंटर, मतदार नोंदणी, यू ट्यूब चॅनेलची माहिती दिली जाणार आहे.

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप!

Categories
Breaking News Political पुणे

पुणेकरांच्या मनात केवळ भाजप

: देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. महिला, कार्यकर्ते यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ”महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही” असा विश्वास भाषणातून व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले, जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे.

फडणवीस म्हणाले, उदघाटनाला आलेल्या नागरिकांची ही गर्दी पाहून भाजप महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मला अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

”कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.”

पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली

”जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाही. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

Pune BJP : पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती

Categories
Political पुणे

पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे : शहर भाजपच्या नवीन वास्तूतील कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्या शुक्रवारी  सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पुणे शहर भाजपाचे कार्यालय बुधवार पेठेतील जोगेश्वरी मंदिराच्या शेजारील इमारतीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील ‘हॉटेल सन्मान’ येथे शहर कार्यालय स्थलांतरित केले होते.

कार्यालयाच्या कामकाजासाठी असलेली अपुरी जागा, पार्किंग, शहराचा वाढता विस्तार, भाजपाच्या कामातील नागरिकांचा वाढता सहभाग आणि अपेक्षा लक्षात घेऊन पुणे शहर भाजपा कार्यालय उद्यापासून महापालिका भवनासमोरील नवीन जागेत स्थलांतरित होत आहे.

साडेचार हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या प्रशस्त जागेत कार्यालयाचे अत्याधुनिक सोयीसुविधांनी आणि संपर्काच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानक्षम कार्यालय बनविण्यात आले आहे. बैठक कक्ष, स्वतंत्र पदाधिकारी कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. या नवीन वास्तूच्या माध्यमातून पुणे शहरातील भाजपाचे जनसेवेचे काम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचेल आणि भाजपा दिवसेंदिवस अजून संघटनात्मक रित्या सशक्त होत जाईल असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, चित्रा वाघ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.

Nawab Mallik vs Devendra Fadanvis : सत्तेत राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात! : नवाब मलिक यांचा टोला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सत्तेत राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात!

: नवाब मलिक यांचा टोला

पुणे : राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात कोरोना असतानाही सरकारने कुठलाही प्रकल्प रद्द केला नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. महागाई, बेरोजगारी मोठा प्रश्न असताना ऑनलाइन नोकरी देण्याच काम आम्ही केलं आहे, असं मंत्री नवाब मालिकांनी सांगितले. पुढे बोलताना मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात.

पुण्यात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मलिक बोलत होते. मलिक पुढे म्हणाले, जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारला डेडलाईन देत होते. त्यात कधी चंद्रकांतदादा म्हणत होते सरकार पडेल, यांनी साम दाम दंड भेद याचा वापर केला. परत आता सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंनी मार्चची डेडलाईन दिली. त्यांना माहिती आहे आता सरकार पडत नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात. सध्या फडणवीस त्यांच्या पक्षात छोटे होऊ लागले आहेत. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, असं नवाब मलिक म्हणाले. विनोद तावडे यांची भाजपच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. यावर बोलताना मलिक म्हणाले, ज्यांना भाजपमध्ये तिकीट नाकारले ते आता भाजप पक्षाचे सरचिटणीस झाले याचा अर्थ काय?