OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का

: इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

दिल्ली : राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळ्याने राज्याच्या बाजूने मुकूल रोहतगी बाजू मांडत आहेत.

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, राज्याने केलेल्या इम्पिरिकल डेटाच्या मागणीला सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी संदर्भात युक्तीवाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालाने राज्य सरकारला दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये ६ महिन्यांसाठी ओबीसी जागांना स्थगिती देता येईल किंवा ओबीसी जागांवर जनरल कॅटेगरीतून निवडणुका घेता येतील. राज्य सरकारनं ३ महिन्यात ट्रीपल टेस्टची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यास निवडणुकीला स्थगिती देऊ असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायालयीय सुनावणीतील महत्वाचे मुद्दे 

राज्य सरकारनं ३ महिन्यात ट्रीपल टेस्टची अंमलबजावणी करण्यासाठी आश्वस्त केलं, तर निवडणुकीला स्थगिती देऊ – सुप्रीम कोर्ट

ओबीसी आऱक्षणासंदर्भात (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालात (Supreme Court) आज सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान मोठ्या घडामोडी घडत असून केंद्र सरकारने नव्या प्रतिज्ञापत्रातही इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. आता याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्याने केली आहे. निकाल राज्याच्या बाजुने लागला नाही तर राज्य सरकारलाच पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. आता सर्वोच्च न्यायालय का निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना राज्य सरकारने म्हटंल की, ओबीसी डेटा ९८ टक्के योग्य असल्याचं केंद्र सरकारनं संसदेत कबूल केलंय. संसदेच्या स्टॅंडींग कमिटीसमोर केंद्र सरकारनं ही दिली माहिती. २०१५ मध्ये गृह मंत्रालयानं ग्राम विकास स्टॅंडींग कमिटीसमोर माहिती दिली होती

Yogesh Tilekar : OBC Reservation : पवारांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आग्रही नाहीत  : भाजपाचे ओबीसी  आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पवारांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आग्रही नाहीत

: भाजपाचे ओबीसी  आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

पुणे : राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी देऊन इम्पिरिकल डेटा तातडीने गोळा करण्यासाठीआक्रमक भूमिका घेण्याऐवजी ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ हेराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतनाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे ओबीसी  आघाडीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाची भुजबळांना खरंच चिंताअसेल तर त्यांनी राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाला तातडीने निधी देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणीही टिळेकर  यांनी केली.

टिळेकर  यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केलेले नाही. आरक्षणाचे प्रमाण ठरविण्यासाठीमागासवर्गीय आयोगाकडून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातलीआहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला निधी देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही , हे वारंवार दिसून येत आहे. राज्य सरकारमधील सरंजामी प्रवृत्तींना ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची इच्छाच नसल्याने मागासवर्गीय आयोगाला निधी मिळण्यात विलंबहोत आहे. ओबीसी समाजाचे नेते म्हणविणारे छगन भुजबळ यांनी  या सरंजामी प्रवृत्तींपुढे लोटांगण घातले असल्याने त्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणे सोडून मूग गिळून गप्प राहणे पसंत केलेआहे.  राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगास निधी देण्याकरिता भाग पाडण्याऐवजी भुजबळ हे केंद्रसरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा , अशी भूमिकाघेऊन या विषयाला आणखी फाटे फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आघाडी सरकारने तातडीने मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करून दिला असता तर इम्पिरिकल डेटा गोळाही झाला असता.

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच  नगरपंचायतींच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू शकलेनाही . आघाडी सरकार असेच निष्क्रीय राहिले तर आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ओबीसी समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही, असेही टिळेकर   यांनी पत्रकात नमूद केले आहे.

OBC Reservation : NCP : खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

Categories
Breaking News Political पुणे

  खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

: OBC आरक्षणासाठी आंदोलन

पुणे : मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अठरा पगड जातीतील ओबीसी बांधवांचं हक्काचं आरक्षण हिरावले गेलं आहे. म्हणून आज मोदी सरकारमधील खासदार, पुणेकरांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

याबाबत  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कि  मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातील नवे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात UPA सरकारने ओबीसी बांधवांचा इम्पिरिकल डेटा स्वीकारून ओबीसी बांधवांचं आरक्षण अबाधित राखले होते. मात्र मे २०१४ मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं आणि इम्पिरिकल डेटा मध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले. नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपची व RSS ची मनुवादी वृत्ती आहे. या देशातील ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण स्थगित होण्यालाही भाजप कारणीभूत आहे.

जगताप पुढे म्हणाले,  अवधूत वाघ नावाच्या एका इसमाने औरांगाबाद खंडपीठात ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं. हा अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचा राज्य सरचिटणीस आहे, राज्य प्रवक्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपची सत्ता असतानाच भाजपचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ याने ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले, ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला. हा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज भाजपचे खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. बापट हे संसदेचे सदस्य आहेत, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. खा. बापट यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. केवळ RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमच्या ओबीसी बांधवांना वेठीस धरण्याच काम करू नये असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. देशाचे नेते  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळात १९९० साली मंडल अयोग्य स्वीकारून ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. त्यानंतर आमच्या ओबीसी बांधवांना जिल्हा परिषद, महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळालं, राज्यात ओबीसी नेतृत्व उभं राहिलं. हीच बाब भाजपच्या मनुवाद्यांनी खटल्यामुळे ओबीसी आरक्षण घालवण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे. याचा जाब येत्या काळात ओबीसी बांधवांकडून भाजपला नक्कीच विचारला जाईल.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,ओबीसी सेल शहराध्यक्ष .संतोष नांगरे,महिला शहराध्यक्षा .मृणालिनीताई वाणी, प्रदेश प्रतिनिधी .प्रदीप देशमुख, कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे,दिपक पोकळे आदिंसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

OBC : State Election Commission : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) जागांवरील निवडणुकांना स्थगिती

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) जागांवरील निवडणुकांना स्थगिती

राज्य निवडणूक आयुक्त यांची माहिती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही  मदान यांनी सांगितले.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

· भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

· भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

· राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

· महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

OBC Reservation : Chandrakant Patil : ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा

– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के जागा वगळून ऊर्वरित ७३ टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी.

त्यांनी सांगितले की, एखाद्या नगरपंचायतीमधील एकूण १७ जागांपैकी ओबीसी आरक्षित पाच जागांची निवडणूक वगळून ऊर्वरित १२ जागांची निवडणूक घेतली तर त्या बारा नगरसेवकांकडूनच नगराध्यक्ष निवडला जाईल. अर्थात शहरातील पाच वॉर्डातील मतदारांना त्यामध्ये काहीच भूमिका असणार नाही. एकूण सदस्य संख्येच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी सदस्य उपलब्ध असल्यास अशा प्रकारे नगराध्यक्ष किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख निवडण्यास कितपत कायदेशीर वैधता राहील याबाबतही शंका आहे.

ओबीसींच्या जागा वगळून निवडणूक घेतली तर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होऊन त्या जागांवर कधी निवडणूक होणार याबद्दलही अनिश्चितता आहे. एकूण या बाबी ध्यानात घेता निवडणूक आयोगाने राज्यात सध्या चालू असलेली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असेही ते म्हणाले.

OBC Reservation : Chandrakant Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीने ओबीसींची फसवणूक केली, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

: भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे : महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले होते, तरीही महाविकास आघाडी सरकारने केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन ओबीसींची फसवणूक केली. न्यायालयात टिकणार नाही, असा अध्यादेश काढण्याच्या प्रकाराची चौकशी करा. या अध्यादेशामागे कोण आहे, हे स्पष्ट करा. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. चुकीचा अध्यादेश काढून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एंपिरिकल डेटाची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाला जबाबदारी दिली. माहिती गोळा करण्यासाठी मागास आयोगाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने त्याला निधी आणि आवश्यक संसाधने दिली नाहीत. परिणामी राज्य मागासवर्ग आयोगाचे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम इंचभरही पुढे गेले नाही. त्यामुळे कंटाळून काही सदस्यांनी राजीनामा दिला.

ते म्हणाले की, २०११ साली केंद्र सरकारने जनगणना करताना गोळा केलेली सामाजिक आर्थिक पाहणीची माहिती आणि सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला एंपिरिकल डेटा यांचा काही संबंध नाही. केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा न्यायालयाने जो एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितला आहे त्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित करावे.