Pune Sewage Treatment Plant |10 CMD पेक्षा जास्त घरगुती सांडपाणी निर्माण केल्यास STP प्रकल्प अनिवार्य करा | महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Sewage Treatment Plant |10 CMD पेक्षा जास्त घरगुती सांडपाणी निर्माण केल्यास STP प्रकल्प अनिवार्य करा | महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Pune Sewage Treatmet plant | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) राज्यातील सर्व महानगरपालिकांना मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्यात असे नमूद केले आहे की, एकूण बांधकाम क्षेत्र 20000 चौरस मीटरपेक्षा कमी आहे आणि दररोज 10(CMD) क्यूबिक मीटरपेक्षा जास्त घरगुती सांडपाणी (Sewage Water) निर्माण केल्यास सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP Plant) बसविणे बंधनकारक राहील. त्यानुसार आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना त्वरित बंधनकारक करावे. अशी मागणी पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे (Rakesh Dhotre Enviornment Consultant) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

 धोत्रे यांच्या निवेदनानुसार गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर नदी प्रदूषणाने त्रस्त आहे.यामागील मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलकुंभात आणि शेवटी नदीत जाते. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की पारंपारिक उपचार सुविधा स्त्रोतावर 100% निकाल देत नाहीत. पुणे शहरातील मुख्यतः प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि काही प्रमाणात प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी नदीत प्रवेश करते. ज्यामुळे शेवटी नदीचे प्रदूषण होते. आणि विष्ठेतील जीवाणूंची संख्या जास्त असते, ज्यामुळे ते पाणी मानवी वापरासाठी अयोग्य बनते.

 

​आम्ही पर्यावरण सल्लागार म्हणून पुणे शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी  SIBF उपचार प्रणाली उपलब्ध करून देण्याची स्थानिक प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेला विनंती करीत आहोत. जेणेकरून नदी प्रदूषण रोखण्यास मदत होईल. असे धोत्रे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Due to the pollution of rivers the health of Pune residents is in danger!  

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Due to the pollution of rivers the health of Pune residents is in danger!

| Demand to make it compulsory for income holders to undertake their own STP project

 |  Complaint of ex corporator Haridas Charvad to guardian minister

 Pune River Pollution |  Due to the pollution of rivers in Pune, the health of Pune residents is in danger.  So water must be treated and released while releasing it into the river.  Former corporator of BJP Haridas Charwad (BJP Pune) has complained to Guardian Minister Ajit Pawar.
 According to Charwad’s statement, dams supplying water to Pune city and district are located in Sinhagad area, Varasgaon, Panshet, Khadakwasla dams have been constructed on rivers Mossi, Mutha and Ambi.  From Panshet Dam area to Khadakwasla, there has been massive urbanization on both sides of the river.  Villages and settlements are being newly created and large five-star resorts, hotels and farm houses have been built on both sides of the river.  All these developed areas are discharging all their drainage water directly into the river without any treatment.  Also, since all the Gram Panchayats near the river do not have their own Sewage Treatment Plant (STP), the Gram Panchayats are forced to release sewage into the river.  Due to this, the river is getting dirty and polluted to a large extent.  Further, this water is being released through canals for drinking by Pune residents and for agriculture in rural areas.
 A survey in this regard should be made mandatory for all income holders to have their own Sewage Treatment Plant (STP) or similar system and ban on discharge of sewage into the river.  This demand has been made by Bharatiya Janata Party Pune city vice president corporator Haridas Charwad.  In this regard, he has made a statement to Pune District Guardian Minister Tase Pune Collector, Pune Municipal Commissioner and Chief Engineer Khadakwasla Irrigation Department, Sinchan Bhawan.
 In view of water scarcity, if the sludge from Khadakwasla dam and other two dams is removed by Pune Municipality, the storage capacity of Khadakwasla dam will be increased and the water of rivers will be fully utilized.  Increased FSI for construction, metro FSI, FSI for purchase, will put a huge strain on the system.
 1. Rivers above Khadakwasla Dam i.e. up to Panshet Varasgaon Dam should be desilted and cleaned.
 2. The Government of Maharashtra should immediately provide space and funds for the construction of sewage treatment plants (STP) in all village panchayats along the rivers from Varasgaon, Panshet to Khadakwasla dam area.
 3. Obligation of Sewage Treatment Plant ( STP ) or similar system ( Small Unit, Natural Project) to private investors.
 Haridas Charvad has demanded that a survey should be done immediately in this regard.
 —

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी

| नगरसेवक हरिदास चरवड यांची पालकमंत्र्याकडे तक्रार

 

Pune River Pollution | पुण्यातील नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नद्यात पाणी सोडताना प्रक्रिया करून सोडले जाणे आवश्यक आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हरिदास चरवड (Haridas Charwad BJP Pune)  यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

चरवड यांच्या निवेदनानुसार पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे सिंहगड भागात आहेत, मोसी, मुठा आणि आंबी या नद्यांवर वरसगाव, पानशेत, खडकवासला अशा धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. पानशेत धरण परिसर ते खडकवासल्यापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात नागरिकीकरण झालेली आहे. गावे तसेच लोकवस्ती नव्याने निर्माण होत आहेत तसेच नदीकिनारी दोन्ही बाजूला मोठ मोठे पंचतारांकित रिसॉर्ट्स, हॉटेल तसेच फार्म हाऊस झालेली आहे. सदर सर्व विकसित झालेल्या भाग त्यांचे सर्व ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया नकरता थेट नदीमध्ये सोडत आहे. तसेच नदी लगतच्या सर्व ग्रामपंचायतीकडे स्वतःचे मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) नसल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायतींना मैलापाणी नदीमध्ये सोडावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी अस्वच्छ व प्रदूषित होत आहे. पुढे हे पाणी कालव्यांद्वारे पुणेकरांना पिण्यासाठी तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी सोडले जात आहे.

या बाबत सर्वेक्षण करून सर्व मिळकत धारकांना स्वतःचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली बंधनकारक करावी तसेच मैलापाणी नदीमध्ये सोडण्यास बंदी घालण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेस पुणे जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त आणि मुख्य अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग , सिंचन भवन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाण्याची कमतरता पाहता खडकवासला धरणासह इतर दोन धरणांमधील गाळ पुणे मनपाद्वारे द्वारा काढल्यास खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढेल व नद्यांच्या पाण्याचा पुरेपूर वापरही होईल शहरांमध्ये होणारी प्रचंड वाढ भविष्यकाळामध्ये मोठ्या संकटाला आमंत्रण आहे. बांधकामांना वाढवून दिलेले FSI, मेट्रो FSI, विकत मिळणारे FSI, यामुळे यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे.

1. खडकवासला धरणाच्या वरील म्हणजे पानशेत वरसगाव धरणा पर्यंतची नद्या गाळ काढून स्वच्छ करून घ्याव्यात.
2. वरसगाव , पानशेत ते खडकवासला धरण क्षेत्रातील नद्यांलगतच्या सर्व ग्रामपंचायतीस मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे जागा आणि निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.
3. खाजगी मिळकतदारांना मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली ( छोटे युनिट, नैसर्गिक प्रकल्प) बंधनकारक करावा.
याबाबत तातडीने सर्वे व्हावा अशी मागणी हरिदास चरवड यांनी केली आहे.