MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार |  मंत्री उदय सामंत | आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार |  मंत्री उदय सामंत

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न

MLA Ravindra Dhangekar | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना (Merged villages) पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी उपस्थित केला होता. (MLA Ravindra Dhangekar)

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. (PMC Pune News)

या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

News Title |MLA Ravindra Dhangekar | Funds will be given for water supply to newly included villages in Pune Municipal Corporation Minister Uday Samant | The question was raised by MLA Ravindra Dhangekar

Drinking water | पुणे शहराचे पाणी कमी करू नका | पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या | महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहराचे पाणी कमी करू नका | पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या 

| महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी 

 
पुणे | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाची बैठक महापालिकेत झाली. उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कमी करू नका. त्यासाठी पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन पाण्याचे नियोजन करा. कारण शहरासाठी 15 ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशी मागणी महापालिका प्रशासनाच्या वतीने जलसंपदा विभागाकडे करण्यात आली. त्यावर याबाबत कालवा समितीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे जलसंपदा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

या वर्षी मार्च महिन्यापासूनच तीर्व उन्हाळा चालू झाला असून, नागरिकांच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. तसेच, या वर्षी पावसाळा समाधानकारक होईल अगर कसे, याबाबत आत्ताच खात्री देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी गुरुवारी बैठक आयोजित केली होती. त्यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता उपस्थित होते. तर महापालिकेकडून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.80 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी पेक्षा ही स्थिती चांगली आहे. मात्र पावसाची अनिश्चितता लक्षात घेत महापालिकेने यंदा 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढ्या पाण्याची मागणी केली आहे. म्हणजेच आगामी 150 दिवसासाठी 7.50 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच शेतीसाठी जलसंपदा विभागाकडे 9 टीएमसी पाणी शिल्लक राहते. मात्र एक. आवर्तन हे 5 टीएमसीचे असते. दुसऱ्या आवर्तनासाठी फक्त 4 टीएमसी शिल्लक राहतात. त्यामुळे 1 टीएमसी पाण्याची भरपाई पिण्याच्या पाण्यातून होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने मागणी केली आहे कि पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या. जेणेकरून पुणेकरांवर कपातीची वेळ येणार आहे. यावर पाटबंधारे विभागाने हा निर्णय कालवा समितीवर सोपवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ कालवा समिती घेण्यात येणार आहे. त्यात हा निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदाने स्पष्ट केले.
| जलसंपदाकडून 125 कोटी बिलाची मागणी
दरम्यान पाणी नियोजनाच्या बैठकीत देखील जलसंपदा विभागाने महापालिकेकडे थकीत बिलाचा तगादा लावला. जलसंपदा च्या म्हणण्यानुसार महापालिकेने 235 कोटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका म्हणते घरगुती वापर आणि वाणिज्यिक पाणी वापराचे एवढे बिल होत नाही. शिवाय आम्ही औद्योगिक दराने बिल देणार नाही. दरम्यान महापालिकेने आतापर्यंत 44 कोटींचे बिल अदा केले आहे. तसेच महापालिका एसटीपी प्लांट बाबत दंड द्यायला तयार आहे. मात्र हे सगळे बिल 70-80 कोटीच्या घरातच आहे. 

Baner, Balewadi Water issue | बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा |  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा |  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे | बाणेर व बालेवाडी (Baner, Balewadi) येथील नागरिकांची पाण्याची समस्या (Water problem) सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा (Water Distrubution) सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी दिल्या.

विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.  (Pune Municipal Corporation)

बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांला ४६ एमएलडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे राहण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह आदी पाण्याच्या टाकीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.  (PMC Pune)

मनपा आयुक्त श्री. कुमार म्हणाले, वारजे डब्लूटीपी ते बालेवाडी एकूण १८.९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी नियोजित असून त्यापैकी १६.७२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच जुने खराब झालेले पंप बदलून त्याजागी वाढीव क्षमेतेचे नवीन पाईप बसविण्यात येत असून येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Water Distribution | शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री 12 डिसेंबर ला घेणार बैठक 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री 12 डिसेंबर ला घेणार बैठक

| महापालिका आणि पाटबंधारेचे अधिकारी राहणार उपस्थित

पुणे | शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठ्या (Water Distribution) बाबतच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत पालकमंत्र्यानी नुकतीच बैठक घेतली होती. मात्र यात पाटबंधारे (Irrigation) आणि महापालिका (PMC Pune) अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर पाटबंधारे आणि महापालिका यांच्यात देखील बैठक पार पडली. याच अनुषंगाने आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) 12 डिसेंबर ला बैठक घेणार आहेत. त्यासाठी पाटबंधारे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहतील. (Pune municipal corporation)
शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण न झाल्याने वितरण व्यवस्थेत बऱ्याच अडचणी येत आहेत. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नाकरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. पालकमंत्र्यांनी 12 डिसेंबर ला याबाबत बैठक बोलावली आहे. याआधी देखील पालकमंत्र्यांनी पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागासोबत बैठक घेतली होती. मात्र यात महापालिका आणि पाटबंधारे अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली होती. (Irrigation dept pune)
यावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे विभागासोबत बुधवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पाटबंधारे ने जी चुकीची बिले किंवा ज्यादा दर लावले आहेत. ते दुरुस्त करून देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली. त्यानुसार पाटबंधारे विभाग माहिती सादर करणार आहे.