Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार | खासदार सुप्रिया सुळे

| टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिले.

सुळे यांनी आज वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसोबत टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शहराचा विकास झालाच पाहिजे. आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विकासाच्या बाजूनेच आहोत, तथापि विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी चर्चा करायलाच हवी. त्यासाठी आपण विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

कोथरूड हून पुणे विद्यापीठ तसेच पाषाण-बाणेर-औंध या भागात जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक कोंडी कमी।करण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या रस्त्याचे नियोजन केले आहे. यात बालभारती ते पौड फाटा रस्ता तसेच कोथरुड, पाषाण आणि सेनापती बापट रस्ता या दोन रस्त्यांना जोड देण्यात येणार आहे. यासाठी वेताळ टेकडी फोडून दोन बोगदे आणि एक पूल उभारण्यात येणार आहे. तथापि याला शहरातील पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असून गेल्या आत्यावड्यापासून हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे. यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीही स्थापन झाली असून या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. १६) खासदार सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते.

त्यानुसार आज दुपारी खासदार सुळे यांनी समितीच्या सदस्यांसोबत वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या भावना समजून घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. टेकडी फोडून प्रस्तावित रस्ता आणि बोगदे रद्द करावेत तसेच वेताळ टेकडीला ‘नैसर्गिक वारसास्थळ’, ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर करावे, अशी समितीची मागणी आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी असे त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, हर्षद अभ्यंकर, सुषमा दाते, प्रदीप घुमरे, अवंती गाडगीळ, गौरी मेहेंदळे, अंगद पटवर्धन यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

River bank improvement project : नदी काठ सुधार प्रकल्प : चर्चा होत राहणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

नदी काठ सुधार प्रकल्प : चर्चा होत राहणार

: कालच्या बैठकीत उत्तरे मिळाली नाहीत 

पुणे – मुळा-मुठा नदी  काठ सुधार प्रकल्पावर ( River Bank Improvement Projects) सामाजिक संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर बुधवारी सविस्तर चर्चा  करण्यात आली. मात्र, काही मुद्द्यांवर महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) उत्तर मिळाले नसल्याने यासाठी चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेला या प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण व इतर कामे करता येणार आहेत.

पुणे महापालिका, जलसंपदा विभाग, राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचे (सीईआयएए) प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची काल सिंचन भवन येथे सुमारे पाच तास बैठक झाली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सीइआयएएचे पंकज जोशी, सीडब्लूपीआरएसचे डॉ. आर. जी. पाटील यांच्यासह, संस्थांचे प्रतिनिधी सारंग यादवडकर, जिवीत नदीच्या शैलजा देशपांडे आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला. हा ४७०० कोटी रुपयांचा प्रकल्प असून, ११ टप्प्यांमध्ये त्याचे काम केले जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचे भूमिपूजन होत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या प्रकल्पावर प्रश्‍न उपस्थित केले. पर्यावरण, नदीला येणारा पूर यावर चर्चा करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले होते. पवार यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महापालिका, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची मुंबई येथे बैठक घेतली. त्यानंतर या प्रकल्पाच्या सर्व शंकांबद्दल चर्चा करण्यासाठी पुण्यात बुधवारी (ता. १६) बैठक होईल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानुसार काल सिंचन भवन येथे बैठक झाली.
त्यामध्ये महापालिकेच्या तज्ज्ञ सल्लागारांनी नदी काठ सुधार प्रकल्प कसा आहे याचे सादरीकरण केले. संस्थांच्या प्रतिनिधींनी नदीकाठ सुधार प्रकल्पाबाबत त्यांचे असलेल्या आक्षेपांचे सादरीकरण केले. त्यात नदीच्या पूर क्षेत्रात होणारी वाढ, नदीपात्रातील रस्ते बंद होणार असल्याने वाहतूक नियोजन, नद्यांचे प्रदूषण, नदीतील जैवविविधतेचे रक्षण, नदीत बांधले जाणारे बंधारे, नदीत सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार यासह इतर मुद्दे या बैठकीत सामाजिक संस्था व पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थित केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाबाबत व पर्यावरणाविषयी मिळालेल्या मान्यतांची माहिती दिली. आजच्या बैठकीत प्रकल्पबाबतचे समज गैरसमज दूर करण्यासाठी पहिला प्रयत्न झाला. प्रकल्पाबाबतच्या प्रश्‍नावर महापालिका व सीडब्लूआरएसच्या अधिकाऱ्यांकडून पुढील बैठकीत उत्तरे दिली जाणार आहेत. त्याबाबत येत्या आठवड्यात दुसरी बैठक होणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाणार आहे.

River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

Categories
Breaking News PMC पुणे

नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

पुणे : मुळा-मुठा नदी काठ सुधारणा प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतल्याने त्या आक्षेपांबाबत महापालिकेचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे. या प्रकल्पाबाबत सामाजिक संस्थांच्या हरकतींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, भविष्यात शहराला पुराचा धोकाही होण्याची शक्यता व इतर आक्षेप सामाजिक संस्थांनी घेतला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याप्रकल्पावर पुण्यातील एका कार्यक्रमात बोट ठेवून याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकल्पाच्या धोक्यासंदर्भात मुंबईत १२ मार्च रोजी शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चर्चा करताना पर्यावरणवादी व महापालिकेचीही बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती १५ दिवसात त्यांचा अहवाल सादर करणार आहे.याच वेळी या प्रकल्पावर पुण्यातील सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरणवादी यांच्याशी चर्चा करण्यासाठी १६ मार्च रोजी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची बैठक होईल असे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यानुसार ही बैठक उद्या सकाळी ११ वाजता होत असून, महापालिकेने या प्रकल्पावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात याचा विचारू करून त्याबाबत तयारी करण्याची लगबग सुरू होती.
“बैठकीत शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर महापालिका प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. त्यावेळी महापालिकेचा आराखडा तयार करणारे तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत.’’
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका