Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत 

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत

 

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी कोथरूड मधील प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली. रात्री ९ वाजता एरंडवने मित्र मंडळाची गणपतीची आरती करून त्यांनी कोथरूड मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कोथरूड मतदारसंघच्यावतीने (NCP Kothrud)  भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

पौड फाटा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,आझाद नगर,गुजरात कॉलनी, वनाज कॉर्नर,जय भवानी नगर,या भागातील अनेक मंडळांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भेट दिल्या .राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने व युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी रॅली चे व कोथरूड मंडळ भेटीचे नियोजन केले होते.

कोथरूड मध्ये सर्व भागात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अनेख नागरिकांनी फोटो काढले.लहान मुलां-मुलींनी सेल्फी घेतल्या.

या वेळी सिध्दार्थ मित्र मंडळाच्या वतीने जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते शिव सन्मान पुरस्कार डॉ मेजर विपुल पाटील यांना देण्यात आला.

या वेळी शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप ,सचिन भाऊ तावरे,किशोर भाऊ कांबळे,ज्योती ताई सूर्यवंशी,नंदिनी पाणेकर,स्वप्नील खवले,ऋषिकेश शिंदे,अमोल गायकवाड,प्रमित गोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने

| ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

NCP Pune Agitation | Jayant Patil | केंद्र सरकारच्या यंत्रणांचा (Central government Agencies) वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  (NCP State President Jayant Patil) यांना समन्स जारी केल्यानंतर आज स्वतः जयंत पाटील  ईडीच्या कार्यालयात(ED Office) गेले आहेत. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील (NCP Pune) समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Pune city president Prashant Jagtap) यांनी दिली. (NCP Pune Agitation | Jayant Patil)

“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है” , “ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. (NCP Pune Agitation)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. श्री. जयंत पाटील साहेब यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. राजेंद्र देशमुख याना निवेदन सुधा देन्यात आले. (Jayant Patil News)

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड़ ,किशोर कांबळे, सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


News Title | NCP Pune Agitation | Jayant Patil Demonstrations by Pune NCP in support of Jayant Patil| ED is home of BJP – City President Prashant Jagtap

NCP | Pune | पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

“राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही” , असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक च्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी” , “द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी” , “पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ” राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत”.

या आंदोलन प्रसंगी शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे,बापू डाकले , संगीता बराटे , गिरीष गुरुनानी , आनंद सागरे,गजानन लोंढे , कुलदीप शर्मा,योगेश सुतार, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajyasabha Election | Jayant Patil | राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून जयंत पाटलांनी केला खुलासा 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून जयंत पाटलांनी केला खुलासा

भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला.” असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजपा करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल.”, असेही जयंत पाटील म्हणाले.

NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध उखडून टाका

: शरद पवार यांचा घणाघात

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Followers) या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांनी  येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.

या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला.

‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था 


‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.

Jayant Patil Vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी १९७८ काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता ? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता ? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ? १९९९ साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का ? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का ? काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन ५० वर्षेही झाली नाहीत व त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना १९५१ साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. १९७५ साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे १९८० साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही.

त्यांनी सांगितले की, देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही.

Sanvad yatra by NCP : महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा

: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचे आवाहन

पुणे : “सरकार म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देत पुणेकरांच्या सेवेत उतरावे व महाविकास आघाडीचे सर्व निर्णय पुणे शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावे”. असे आवाहन राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा असंख्य कार्यकर्त्यांचा परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्यांसोबत संवाद साधण्यासाठी “संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी” या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले.सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे शिवाजीनगर,कोथरूड,कसबा व खडकवासला या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. याअंतर्गत सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये या चार विधानसभेपैकी खडकवासला विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून खडकवासला विधानसभा मतदासंघांत आपण थोड्या फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असे जयंत पाटील म्हणाले.

याप्रसंगी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, “सरकार म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देत पुणेकरांच्या सेवेत उतरावे व महाविकास आघाडीचे सर्व निर्णय पुणे शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावे”

ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिवार संवाद यात्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप,आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे ,जयदेवराव गायकवाड यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

Categories
Breaking News PMC पुणे

नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

पुणे : मुळा-मुठा नदी काठ सुधारणा प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतल्याने त्या आक्षेपांबाबत महापालिकेचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे. या प्रकल्पाबाबत सामाजिक संस्थांच्या हरकतींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, भविष्यात शहराला पुराचा धोकाही होण्याची शक्यता व इतर आक्षेप सामाजिक संस्थांनी घेतला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याप्रकल्पावर पुण्यातील एका कार्यक्रमात बोट ठेवून याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकल्पाच्या धोक्यासंदर्भात मुंबईत १२ मार्च रोजी शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चर्चा करताना पर्यावरणवादी व महापालिकेचीही बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती १५ दिवसात त्यांचा अहवाल सादर करणार आहे.याच वेळी या प्रकल्पावर पुण्यातील सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरणवादी यांच्याशी चर्चा करण्यासाठी १६ मार्च रोजी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची बैठक होईल असे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यानुसार ही बैठक उद्या सकाळी ११ वाजता होत असून, महापालिकेने या प्रकल्पावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात याचा विचारू करून त्याबाबत तयारी करण्याची लगबग सुरू होती.
“बैठकीत शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर महापालिका प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. त्यावेळी महापालिकेचा आराखडा तयार करणारे तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत.’’
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Mula-Mutha River Improvement : Sharad Pawar : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष

: मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत शंका निरसनासाठी समिती गठीत

मुंबई- पुणे येथील मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पाबाबत शंकांचे निरसन व्हावे आणि अडचणींवर मात करून स्वच्छ, सुरक्षित नदी परिसरासाठी काम सुरू व्हावे यासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रस्तावित रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटबाबत आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

पुण्यातील मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत काही पर्यावरणवादी, तज्ज्ञ तसेच स्थानिक सामाजिक संस्थांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करून शंका निरसन करण्यासाठी पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक लवकरच पुणे येथे होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी व नदी हे सर्वसामान्य पुणेकरांचा हक्क अबाधित राहण्यासाठी योग्य कार्यवाही होण्यासाठी तज्ञ समिती कामकाज करेल, असे सांगितले.

Jayant Patil : आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!

: राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी मलिकांच्या  राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आम्ही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्टंच सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपकडून  सुरू आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा घेतला. ते रोज उठून एका मंत्र्यांमागे चौकशी करतील. अशा वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. आम्ही नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. आणि किरीट सोमय्या यांच्याबाबत आता तरी न बोललेलं बरं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

 महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती असून औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या राज्यपालांसारख्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नसल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने युक्रेन मधील वाचवण्यास उशीर केला असून त्यांनी मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.