Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar |  निर्भय बनो (Nirbhay Bano Pune) चे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle), ॲड. असीम सरोदे (Aseem Sarode), विश्वंभर चौधरी (Vishwanbhar Chaudhari) यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune NCP) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या (Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) वतीने बालगंधर्व चौक (Balghandhrav Chowk pune) येथे आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मोदी सरकार चले जाव, पुणेकरांनो सावधान खतरे में है संविधान अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
The karbhari You tube video | https://youtu.be/td-03m-uCeE
प्रशांत जगताप म्हणाले कि, सरकारी आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या गुंडांनी पुण्यात केलेला लोकशाहीचा खून सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. “हा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते सरसावले तेव्हा गुंडांनी महिला, युवती कार्यकर्त्यांची मर्यादा न पाळता सर्वांवरच हल्ला केला.
“माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी समृद्ध अशा पुण्यभूमीत, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुणे शहरात काल हुकूमशाहीची दहशत सर्वांनीच अनुभवली. सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांच्या गुंडांकडून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जगताप पुढे म्हणाले, आपल्या डोळ्यांसमोर पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली. यानंतर महायुतीच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, महिला भगिनींवर युवती कार्यकर्त्यांवर निर्लज्जपणे हात उभारला. या दडपशाहीला न घाबरता यापुढेही पुणे शहरात जिथे अन्याय दिसेल तिथे  पवार साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता न्यायासाठी उभा असेल.” असे ही प्रशांत जगताप म्हणाले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रवींद्र माळवदकर, डॉ.शशिकांत कदम, उदय महाले, मयूर गायकवाड, रूपालीताई शिंदे, भक्त्ति कुंभार, पायल चव्हाण, ऋतुजा देशमुख, ज्योतीताई सूर्यवंशी, नीताताई गलांडे,आसिफ शेख, सुवर्णाताई माने, जावेद शेख, मंगलताई पवार यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Nikhil Wagle should not cross the border  | Pune city Shiv Sena warning

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

 Nikhil Wagle should not cross the border  | Pune city Shiv Sena warning

 Nikhil Wagle Latest News |  Pune Shivsena has clarified its position regarding the objectionable statement made by Nikhil Wagle regarding Bharat Ratna.  City Shiv Sena Chief Pramod Nana Bhangire, Joint Communications Chief Ajay Bhosale and Yuva Sena State Secretary Kiran Sali have taken the stand that Nikhil Wagle should not cross the line and should apologize for his statement.
 According to a statement released by City Shiv Sena, the so-called journalist Nikhil Wagle, who spreads hatred through his statements and criticizes every Hindu leader, is the last understanding of Pune City Shiv Sena.  Learn to make statements in a democratic manner, withdraw the objectionable statement made about Bharat Ratna LK Advani immediately.  Otherwise Shiv Sena will not allow you to move around Pune city.  Shiv Sena has given this warning.  In the statement, it is further said that the experience of humiliation after the statement made about Balasaheb Thackeray is close to his heart.  Therefore, Shiv Sena is fully supporting the position taken by Bharatiya Janata Party Pune City and Nikhil Wagle immediately said about this. Apologize  Such a role has been presented by Shiv Sena.

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये | पुणे शहर शिवसेनेचा इशारा 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये | पुणे शहर शिवसेनेचा इशारा

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी भारतरत्न बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधाना संबंधी पुणे शहर शिवसेनेने (Pune Shivsena) आपली भूमिका विशद केली आहे. निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये आणि आपल्या विधानाबाबत वागळेंनी माफी मागावी, अशी भूमिका शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire), सहसंपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale Shivsena Pune) आणि युवासेना राज्यसचिव किरण साळी (Kiran Sali Yuvasena) यांनी घेतली आहे. (Nikhil Wagle News)
शहर शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार आपल्या विधानातून विद्वेष पसरवणाऱ्या तसेच प्रत्येक हिंदू नेत्यावर गरळ ओकणाऱ्या तथाकथित पत्रकार निखिल वागळे यांना पुणे शहर शिवसेनेची शेवटची समज आहे. लोकशाहीची आब राखून विधाने करायला शिका, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबत केलेले आक्षेपार्ह विधान तात्काळ मागे घ्या. अन्यथा शिवसेना तुम्हाला पुणे शहरात फिरू देणार नाही. असा इशारा शिवसेनेने दिला आहे. निवेदनांत पुढे म्हटले आहे कि बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या विधाना नंतर ओढवलेल्या नामुष्कीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पुणे शहराने घेतलेल्या भूमिकेचे पुणे शहर शिवसेना पूर्णपणे समर्थन करीत असून निखिल वागळे याने तात्काळ या संबंधी माफी मागावी. अशी भूमिका शहर शिवसेनेनं मांडली आहे.

 Pune Congress challenge to Pune BJP from Nirbhay Bano Sabha!

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

 Pune Congress challenge to Pune BJP from Nirbhay Bano Sabha!

 Nirbhay Bano Sabha Pune |  Nirbhay Bano sabha pune will be held tomorrow in the presence of Nikhil Wagle, Amol Palekar, Asim Sarode.  However, the city BJP (Pune BJP) has objected to the presence of Nikhil Wagle.  BJP city president Dhiraj Ghate has also expressed his intention to disrupt the meeting.  But this challenge of BJP has been accepted by Pune Congress.  We are fully prepared to make tomorrow’s meeting a success.  Pune Congress has given this assurance.
 What did the BJP say?
 After the ‘Bharat Ratna’ award was announced to former Deputy Prime Minister LK Advani, who has always made derogatory remarks about the country’s beloved Prime Minister Narendrabhai Modi, the Bharat Ratna to Advani is like one rioter giving kudos to another rioter.  Some blind people who are polluting the atmosphere of the society with such nausea in their minds are going to hold a meeting called ‘Nirbhay Bano’ on 9 February 2024 at Sane Guruji Smarak in Pune.
 In the last ten years, the country is developing rapidly under the leadership of Narendrabhai Modi.  Modi ji’s name is being praised all over the world.  But seeing all this, some people’s stomach hurts.  Therefore, the leaders who hold constitutional positions in the country are deliberately defamed through this meeting.  The speakers who participate in this meeting are always making noise through their social media handles as well.
 Even after the Bharat Ratna Award was announced to Advani, these select people had stooped to the lowest level and disrespected this highest honor of the country.  At the same time Modi and Advani were insulted.
 The only aim of the organizers is to create a rift in the society through the Nirbhay Bano Sabha and burn their political nest from it.  Bharatiya Janata Party has always stood against such divisive and divisive tendencies in the society.  The culture of Khot Bol but Retun Bol is being propagated by the speakers in the name of being fearless.  But Pune City Bharatiya Janata Party will not tolerate this.
 Through this letter, we are demanding that we should not allow Nirbhay Bano Sabha to stop those who make anti-national statements in time.  While the country is fear-free, Char Talaki is pushing his agenda to become Nirbhay.  Pune City Bharatiya Janata Party will not be peaceful unless this agenda is thwarted.
 What has Congress said?
 The meeting of ‘Nirbhay Bano’ which will be held tomorrow on Friday is against tyranny and mob rule.  But the very cultured president of Bharatiya Janata Party, Dhiraj Ghate, has threatened to disrupt the meeting and has also given a statement to the police station there.  In fact now the new police commissioner Amitesh Kumar has come and he is very vigilant about law and order.  He had taken out a parade of all the village gangsters to the big gangsters in Pune at the Police Commissionerate.  Therefore, the police commissioner will determine the disposition of this fanatic gangster, but for this meeting, all the constituent parties in the India Aghadi and the Mahavikas Aghadi will work to protect the democracy there and conduct the ‘Nirbhay Bano’ meeting properly.
      In fact, the constitution has given us the right to express our opinion, the right to speech.  Despite this, some anti-constitutional people are trying to contaminate the environment of Pune through gangsterism and mob rule.  Democracy is not afraid of such threats.  We are fully prepared to make tomorrow’s meeting a success.  Pune City District Congress Committee President Arvind Shinde has given this information through this letter.

Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान! 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान!

 

Nirbhay Bano Sabha Pune | निखिल वागळे(Nikhil Wagle), अमोल पालेकर (Amol Palekar), असीम सरोदे (Asim Sarode) यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात निर्भय बनो सभा (Nirbhay Bano sabha pune) घेतली जाणार आहे. मात्र निखिल वागळे यांच्या उपस्थित राहण्याबाबत शहर भाजपने (Pune BJP) आक्षेप घेतला आहे. तसेच सभा उधळून लावण्याचा इरादा भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे. मात्र भाजपचे हे आव्हान शहर कॉंग्रेस (Pune Congress) ने स्वीकारले आहे. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी खात्री पुणे कॉंग्रेस ने दिली आहे.

  • भाजपने काय म्हटले होते?

देशाचे लाडके पंतप्रधान  नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल कायम अवमानकारक वक्तव्ये करणारे, देशाची माजी उपपंतप्रधान  लालकृष्ण अडवाणी जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला शाबासकी देण्यासारखे आहे. अशी आपल्या मनातील मळमळ ओकून समाजातील वातावरण कलुषित करणारे काही नतद्रष्ट लोक येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे ‘निर्भय बनो’ नावाची सभा घेणार आहेत.

गेल्या दहा वर्षात नरेंद्रभाई मोदी  यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा वेगाने विकास होतो आहे. जगभरात मोदी जींच्या नावाचे कौतुक केले जात आहे. पण हे सगळं बघून काही लोकांच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक देशातील घटनात्मक पदांवर असणाऱ्या नेत्यांची बदनामी या सभेच्या माध्यमातून केली जाते. या सभेत सहभागी होणारे वक्ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरूनही कायम गरळ ओकत असतात.
अडवाणी  यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही या निवडक लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून देशातील या सर्वोच्च सन्मानाचा अनादर केला होता. त्याचबरोबर मोदी  आणि अडवाणी  यांचा अपमान केला होता.

निर्भय बनो सभेच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढे एकच उद्दिष्ट आयोजकांचे आहे. भारतीय जनता पार्टी या स्वरुपाच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दुही माजवणाऱ्या प्रवृत्तींच्या कायमच विरोधात उभी राहिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती निर्भय बनोच्या नावाखाली रुजविण्याची वृत्ती यातील वक्त्यांकडून सुरू आहे. पण पुणे शहर भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही.
देशविघातक वक्तव्ये करणाऱ्यांना वेळीच आळा घालण्यासाठी आपण निर्भय बनो सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो म्हणून आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावल्याशिवाय पुणे शहर भारतीय जनता पार्टी शांत राहणार नाही.

  • कॉंग्रेस ने काय म्हटले आहे?

‘निर्भय बनो’ ची उद्या शुक्रवार  रोजी होणारी सभा ही गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात घेतली आहे. परंतु  भारतीय जनता पार्टीचे अतिशय संस्कारी अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळवून लावायची धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. खरे तर आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आले आहेत आणि ते कायदा व सुव्यवस्था या बाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठे गुंड सगळ्यांची परेड पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे या धर्मांध गुंडाचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच परंतु या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार आहेत.

     खरे तर संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही. लोकशाही ही असल्या धमक्यांना घाबरता नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.

journalist Nikhil Wagle | पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात

| ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत

पुणे – पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात आहे. गोदी मीडियाने पत्रकारितेचा घात केला आहे. पत्रकारितेला या गोदी मीडियापासून वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण होत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी  व्यक्त केले. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वागळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, पुरस्कारार्थी सकाळच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर, ‘एबीपी माझा’चे अभिजित कारंडे, पुढारीच्या बातमीदार सुषमा नेहरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वागळे पुढे म्हणाले, ‘‘मराठी पत्रकारिता बदलत आहे. ही पत्रकारिता आता उच्चवर्णियांपुरती मर्यादित राहिली नसून, ती आता बहुजनांकडे सरकत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ मुद्रित (प्रिंट) नाही.आता दूरदर्शन (टी.व्ही.), डिजिटल पत्रकारिता आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील पत्रकारिता ही मल्टिमीडिया झाली आहे. त्यामुळे ही सर्व माध्यमे ही एकमेकांशी पूरक आहेत. सध्या डिजिटल माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे.

 

त्यामुळे डिजिटल पत्रकारितेमुळे ट्रोलिंग होत असले तरी ट्रोलिंग हा गाळ आहे. अगदी सुरवातीच्या काळात वाहत्या पाण्यातूनसुद्धा असा गाळ येतच असतो. आजची पत्रकारिता हा गोदी मीडिया झाला आहे. या गोदी मीडियानेच पत्रकारितेचा मोठा घात केला आहे. माध्यम संस्था या जाहिरातीच्या आमिषाने विकल्या जात आहेत. काही पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून पत्रकारितेचे स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. यामुळे सध्याची पत्रकारिता अर्धमेली झाली आहे. यासाठी आपणच जबाबदार आहोत.’’

प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी पुरस्कारांमागची भूमिका विशद केली. पुरस्कारार्थी चैत्राली चांदोरकर यांच्या अनुपस्थितीत पती नीलेश यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारार्थी पाटसकर, कारंडे, नेहरकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश गुजर आणि अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले. यावेळी विश्‍वस्त वि.अ. जोशी,डॉ. सतीश देसाई, चारुचंद्र भिडे, प्रकाश भोंडे आदी उपस्थित होते.
विद्यापीठात वरुणराज भिडे अध्यासन ः डॉ. गोऱ्हे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकार वरुणराज भिडे यांच्या नावाने अध्यासन असावे, अशी इच्छा होती. यानुसार हे अध्यासन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्र दिले होते. या पत्रानुसार पाटील यांनी ही मागणी मान्य केली असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना सांगितले.
राज्यात वाचकांचे दबावगट निर्माण व्हावेत’
सध्या पत्रकार आणि संपादकांना स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. यासाठी ज्याप्रमाणे युरोपिय देशांमध्ये जसे वाचकांचे दबावगट आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वाचकांचे दबावगट निर्माण होण्याची गरज आहे. वाचक आणि प्रेक्षक हेसुद्धा माध्यमांचे स्टेक होल्डर (भागधारक) असतात. यामुळे पत्रकारांना स्वातंत्र्य मिळून त्यांना वाचक आणि संविधानाकडे अधिक लक्ष देता येईल, असे मत निखिल वागळे यांनी यावेळी व्यक्त केले.