Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे

Categories
Breaking News Education social पुणे

Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे

 

Wildlife Week | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (Annasaheb Waghire College Otur) मध्ये वन्यजीव सप्ताहाचे (Wildlife Week) औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS Department), वनस्पतीशास्त्र (Botany Department)  व प्राणीशास्त्र विभाग (Zoology Department) तसेच वन विभाग जुन्नर (Forest Department Junnar) यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त विशेष व्याख्यान तसेच वन्यजीवांवर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे (Dr Abhay Khandagale) यांनी दिली.

आपल्या मनोगतामध्ये  वैभव काकडे यांनी असे मत व्यक्त केले की, पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व सर्व प्राणिमात्रामुळे अबाधित आहे कारण पर्यावरणाचे संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य वन्यजीव अप्रत्यक्षपणे करीत असतात. वन्यजीव आहेत म्हणूनच अन्नसाखळी अबाधित आहे व अन्नसाखळी अबाधित असल्यामुळेच पर्यावरण संतुलन होत असते. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे लोकांनी त्यासाठी जागरूक राहून वन्यजीवांना अभय दिले पाहिजे असेही मत ओतूर वनपरक्षेत्रित अधिकारी श्री वैभव काकडे यांनी व्यक्त केले.

याचबरोबर माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे व्यवस्थापक श्री महेंद्र ढोरे यांनी आपल्या मनोगत मध्ये मानव बिबट संघर्ष व सहजीवन या विषयावरती मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी बिबट जीवनचक्र, त्याच्या सवयी, भक्ष, प्रज्योत्पादन इत्यादी गोष्टी विशद केल्या याबरोबरच बिबट समस्यांची मूळ कारणे काय आहेत व मानव बिबट सहजीवनासाठी आपण आपले वर्तन कसे ठेवावे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी असेही आवाहन केले की आपल्या परिसरामध्ये बिबट पिल्ले आढळल्यास त्यांना न हाताळता तात्काळ वन विभागास संपर्क करावा जेणेकरून त्यांचे संरक्षण केल्या जाऊ शकते.

सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी श्री वैभव काकडे, वनपरिक्षेत्रीत अधिकारी ओतूर, श्री महेंद्र ढोरे व्यवस्थापक बिबट निवारा केंद्र माणिक डोह, वनरक्षक श्री गीते श्री राठोड श्री बेल्हे आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे, डॉ बी एम शिंदे, डॉ व्ही डी जाधव, प्रा सागर पारधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजयकुमार राहंगडाले यांनी प्रास्ताविक केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी अमोल बिबे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन निलेश काळे यांनी व्यक्त केले

Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural Education पुणे

Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

Annasaheb Waghire College Otur | ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयांमध्ये दि.२४ ते २९ जुलै २०२३ या कालावधीमध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.  उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”या विषयावरील आधारित निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे (Dr Abhay Khandagale) यांनी दिली. (Annasaheb Waghire College )Otur

आज महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० “या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य खंडागळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये डॉ.खंडागळे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलते शिक्षणाचे प्रारूप, अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षणामध्ये आलेली क्रेडिट सिस्टीम, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे असलेले स्वातंत्र्य, तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही कोर्स ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने पुर्ण करण्याची असलेली मुभा, विद्यार्थी केंद्रित व समाजाभिमुख शिक्षण या सर्व गोष्टींचा उल्लेख केला तसेच हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे असेही मत व्यक्त केले.

सदर शैक्षणिक सप्ताहामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” २०२० या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वा कुटे, द्वितीय क्रमांक सायली अहिनवे तर तृतीय क्रमांक सुरज राजोरे यांनी मिळवला.
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घोलप तनुजा व डुंबरे अपेक्षा, द्वितीय क्रमांक आहेर प्रगती व डुंबरे अनुष्का यांनी तर तृतीय ठोंगिरे पायल यांनी क्रमांक मिळवला.
याचबरोबर पोस्टर स्पर्धेमध्ये अक्षदा पोपळे व श्रावणी सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक तर सानिका गिजरे व सानिका डुंबरे यांनी द्वितीय क्रमांक तर सुरज वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ.के.डी सोनवणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. बी.एम.शिंदे, डॉ.एस.एस लंगडे, डॉ.एस.बी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे, डॉ.निलेश काळे,डॉ.वसंतराव गावडे,डॉ.अजय कवाडे तसेच कार्यालयीन कर्मचारी निखिल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


News Title | Annasaheb Waghire College Otur | “National Education Policy Week 2020” celebrated with enthusiasm in Annasaheb Waghire College Otur

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा

Categories
Breaking News Education social पुणे

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा

Annasaheb Waghire College Otur | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (Pune District Education Association) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर (Annasaheb Waghire Collège Otur) या ठिकाणी १९८८ पासून आज पर्यंत ३५ वर्ष वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत  पदार्थ विज्ञान विभागात कार्यरत असणारे डॉ सुंदरराव ढाकणे  (Dr Sundarrao Dhakne) हे आपल्या नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्निक सेवापूर्ती गौरव समारंभ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे व सेवक कल्याण समितीचे समन्वयक डॉ. ए.एम.बिबे यांनी दिली. (Annasaheb Waghire College Otur)
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे व एम.फुक्टो चे अध्यक्ष डॉ.एस.पी लवांडे सर ओतूर ग्रामपंचायतचे सरपंच मा.प्रशांत डुंबरे, उपसरपंच रईस मणियार, डॉ.एस डी.अघाव,  श्री नामदेव सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्यावतीने डॉ. सुंदरराव ढाकणे  यांना ३५ वर्षाच्या सेवेबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी सन्मानपत्राचे वाचन डॉ.डी.एम टिळेकर यांनी केले.
 सदर कार्यक्रमामध्ये  प्रमुख पाहुणे डॉ.पंडित विद्यासागर सरांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. ढाकणे सरांनी महाविद्यालयामध्ये गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करून त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांच्या बदलत्या व महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल ही त्यांनी आपले विचार मांडले. शिक्षण म्हणजे  विद्यार्थ्यांचें ज्ञान व क्षमतांचा विकास करणे होय असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी आपल्या भाषणात डॉ ढाकणे त्यांनी  लहानपणाच्या हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून कशाप्रकारे आपले शिक्षण पूर्ण करत स्वतःचा व महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपले बहुमोल योगदान दिले याबाबत मत व्यक्त केले.  डॉ.एस. पी.लवांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ.ढाकणे यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देत असतानाच आपला महाविद्यालयातील उपप्राचार्य पदाचा प्रदीर्घ अनुभव तसेच पदार्थ विज्ञानातील आपल्या ज्ञानाचा फायदा  चिंचोली या आपल्या मूळ गावी असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.  आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी डॉ.ढाकणे यांच्या काम करण्याच्या सचोटीबद्दल तसेच मीतभाशी स्वभावाबद्दल आवर्जून उल्लेख केला. तसेच त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये पदार्थ विज्ञान विभागामध्ये पदव्युत्तर पदवी तसेच संशोधन केंद्र सुरू करणे महाविद्यालयांमध्ये यू.जी.सी रुसा या सारख्या विविध योजना राबवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच नॅक मुल्यांकनामध्ये आय.क्यू.एस.सी समन्वयक म्हणून गेली अनेक वर्ष केलेल्या कामाबद्दल  गौरव उद्गार काढले. तसेच सदर प्रसंगी प्रा.आंद्रे मॅडम, प्रा.बाळासाहेब हाडवळे, डॉ. निलेश हांडे, डॉ.हरिभाऊ बोराटे, डॉ उमेशराज पनेरु,  डॉ.रमाकांत कस्पटे, प्रा.महेश गंभीर, श्री.हेमंत डुंबरे तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश पडवळ व श्रीमती प्रतिभा डुंबरे, डॉ.ढाकणे यांचे चिरंजीव अभिजित ढाकणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी ढाकणे यांच्या पत्नी सौ.संगीता ढाकणे मुलगा अभिजित व मुलगी आरती  तसेच त्यांचे मित्र व नातेवाईक, ओतूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे व  आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.के. डी सोनावणे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  डॉ.वसंतराव गावडे, डॉ दत्तात्रेय टिळेकर, डॉ निलेश काळे, डॉ अनिल लोंढे, डॉ विनायक कुंडलीक  तसेच श्री. मिलिंद ढगे व श्री.जयसिंग डुंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——
News Title | Annasaheb Waghire College Otur |  Otoor College Vice Principal Dr.Sudanarrao Dhakne’s service completion ceremony celebrated

Marathi Bhasha Din | मातृभाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य” | प्रा.डॉ.वसंत गावडे

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

मातृभाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य” |  प्रा.डॉ.वसंत गावडे

मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. असे प्रतिपादन डॉ वसंत गावडे यांनी केले.
 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे,सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी *मराठी भाषा गौरव दिन* मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.त्यानिमित्ताने  महाविद्यालयात मराठी  विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम *काव्यवाचन ,*तसेच प्रा. डॉ.वसंत गावडे यांचे  “मायबोली मराठी”या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. मराठी भाषेचे व्यक्तित्व अनेक पदरी आहे. मराठीचा इतिहास केवळ अभिजात असण्यापेक्षाही कितीतरी भव्य दिव्य आहे भाषा हा संस्कृतीच्या हस्तांतरणाचा मार्ग आहे. मराठी ज्ञानभाषा म्हणून सक्षम होते आहे. मराठी भाषा अधिकाधिक सशक्त, समृद्ध, आणि सर्वसामान्य करायचा निर्धार आपण करूया.”
             सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी भूषविले, ते आपल्या मनोगत म्हणाले,”कुठलीही भाषा जितकी वापरत राहील तितकी ती अधिक बहरते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेला मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व प्राप्त झाले.”सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ.ढाकणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. के.डी.सोनवणे,डॉ. सुनील लंगडे,डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ संतोष वाळके, डॉ.निलेश काळे,डॉ.रमाकांत कस्पटे, डॉ. छाया तांबे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले.प्रा.रोहिणी मदने यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Annasaheb Waghire College | शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा” | माजी कुलगुरू डॉ.आर. एस माळी यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

“शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा”

| माजी कुलगुरू डॉ. आर. एस माळी यांचे प्रतिपादन

आज महाविद्यालये,विद्यापीठे यांची संख्या वाढली,पण गुणवत्ता वाढली का? याचा विचार नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने व्हावा. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा. कारण नवीन धोरण राबविताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ आर एस माळी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर येथे दि.१० व ११ फेब्रुवारी २०२३.रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 आणि त्याची अंमलबजावणी” या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रासाठी देशभरातील नामवंत शिक्षण तज्ञ,अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले .N.E.P वर ३०० विद्यार्थ्यांनी दोन दिवसात पोस्टर प्रेझेन्टेशन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ.एस.बी. वाळके,डॉ.एम.बी.खंदारे व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन व बीजभाषण प्रमुख पाहुणे डॉ. विजय जोशी (ज्येष्ठ सल्लागार ,रुसा,महाराष्ट्र राज्य) यांनी केले. ते आपल्या बीज भाषणात म्हणाले,”आज आपल्याला नव्या व्यवस्थेची निर्मिती करावी लागेल. इंग्रजी म्हणजे ज्ञान हे अजिबात सत्य नाही.मातृभाषे विषयीचा आदर नवीन धोरणात आहे.व्होकेशनल ट्रेनिंगची आज गरज आहे. जीवन आणि शिक्षण हळूहळू दूर होत गेले. शिक्षणातून येथून पुढे पांढऱ्या कॉलरची फौज तयार होता कामा नये.आजची युवा पिढी प्रचंड स्पर्धेच्या दबावाखालीअसलेली आहे.म्हणून विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण देणे गरजेचे आहे.आज आपल्याला कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण करावयाचे आहे. चळवळीच्या अग्रभागी मध्यमवर्ग असतो. मध्यमवर्गाला आत्ममग्न परिस्थितीतून बाहेर यावे लागणार आहे.” सदर चर्चासत्रा दरम्यान डॉ. गोपाल गौर बनिक(आसाम)यांनी आपले विचार मांडले.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात डॉ.आर. एस.माळी(माजी कुलगुरू,बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव.) म्हणाले,”आज महाविद्यालये,विद्यापीठे यांची संख्या वाढली,पण गुणवत्ता वाढली का?याचा विचार नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने व्हावा. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा. कारण नवीन धोरण राबविताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.”डॉ.पंडित विद्यासागर(माजी कुलगुरू,स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) म्हणाले,”पदवी मिळविल्यानंतर विद्यार्थी जीवन जगण्यास सक्षम व्हावा.गुणवत्ता वाढविण्यासाठी कौशल्य व व्यावसायिक शिक्षण गरजेचे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार.या सर्वांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.” डॉ.डी डी.पाटील,डॉ.दीपक माने, डॉ.प्रवीण सप्तर्षी, प्रोफेसर विनय रावळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.अमृत बनसोड,भारतातील विविध राज्यांतील अनेक संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी, महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.एस.एफ. ढाकणे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे यांनी मानले.

Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

 

जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे १४जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.* *मराठी भाषेचे संवर्धन* या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, स्वरचित *काव्य लेखन स्पर्धा, मराठी भाषेशी संबंधित. *घोषवाक्य लेखन स्पर्धा* ,*प्रश्नमंजुषा*, *मराठी हस्ताक्षर स्पर्धा.*,*भिंतीपत्रक- पोस्टर्स स्पर्धा*,*कथा अभिवाचन स्पर्धा”, काव्यवाचन स्पर्धा “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, संपादक) यांचे विशेष व्याख्यान शनिवार,दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.

ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी ही एक अत्यंत प्रगल्भ भाषा आहे.तिचा इतिहास हा दोन हजार वर्षाचा आहे. मराठी भाषेत अभिजात ग्रंथांचा ठेवा आहे. अनेक बोली मिळून मराठी भाषेची निर्मिती झालीआहे. आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर बसवावे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या दर्जांपेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेचा दर्जा सरस आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीत आदर्शांचा फार मोठा ठेवा आहे तो सर्व मराठीत प्रतिबिंबित झाला आहे. जगातला सर्वात मोठा कवी म्हणून मला तुकाराम महाराज हे श्रेष्ठ वाटतात. मराठी भाषेत अनेक नीती मूल्यांचे शिक्षण आहे. मराठीच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मराठी माणूस तो कदापिही सहन करणार नाही कारण मराठी बाणा हा ताठ कण्यासारखा आहे.”

महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस. एफ.ढाकणे, उपप्राचार्य,डॉ.के.डी.सोनावणे, डॉ. रमेश काशिदे हे मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सृष्टी महाकाळ या विद्यार्थिनीने केले., प्रा.रोहिणी मदने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. छाया तांबे यांनी मानले.

Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

Categories
Breaking News Education पुणे

ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुन ते १० जुलै २०२२ या कालावधीमध्ये पुणे ते पंढरपूर या दरम्यान विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय वारीचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी व कोरोना मुक्त वारी तसेच वृक्षदिंडी चे आयोजन वारी मार्गावर करण्यात आले होते. सदर वारीच्या निमित्ताने वारी मार्गावर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या थीमवर अधारीत पथनाट्याचे पालखी मार्गावर १८ ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. सदर वारीमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील हरीश चौधरी, हर्षल जाधव, सचिन दिवेकर व मनोज गायकर या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती चे काम केले.

वारीमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ अभय खंडागळे यांनी सर्व स्वयंसेवकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एम शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे उपस्थित होते.

World Book Day : ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही : डॉ.शाकुरराव कोरडे यांचे प्रतिपादन 

Categories
Education पुणे महाराष्ट्र

ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही

: डॉ.शाकुरराव कोरडे यांचे प्रतिपादन

पुणे : “पुस्तकांशी मैत्री करणे गरजेचे आहे. कारण ती आपल्याला आयुष्यभर साथ देतात. सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही. पुस्तकातील अनुभव वाचून माणूस शहाणा होतो. अभ्यासक्रमातील पुस्तकांमधून स्वतःच्या पायावर उभे राहता येते.वाचन संस्कृतीचा आज विकास होणे गरजेचे आहे. तसेच वाचन चळवळीला चालना मिळाली पाहिजे. असे प्रतिपादन डॉ.शाकुरराव कोरडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि- पुणे. येथे जागतिक पुस्तक दिन मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शाकुरराव कोरडे हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. एम.शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात पुस्तक पूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,” पुस्तक म्हणजे सल्लागार व संयमी शिक्षक आहे. पुस्तके प्रत्येकासाठी सखा बनला पाहिजे. पुस्तकांनी कधीच कुणाला फसवलं नाही. पुस्तक सर्वांसाठी जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी सदैव दिव्याप्रमाणे ज्ञान रुपाने केवळ तेवत राहते. झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारी पुस्तकांची दालने जीवनात आनंदाची सप्तरंगी उधळण करतात. म्हणून पुस्तके वाचनाची सवय लावा. पुस्तकांमधून मनोरंजन ,करमणूक व ज्ञान या गोष्टी मिळतात.पुस्तकांखेरीज आजची इतर वाचनाची माध्यमे फक्त खत पाणी म्हणून वापरा.”

महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.निलेश हांडे यांनी महाविद्यालयातील संपन्न अशा ‘श्रीकृष्ण तांबे ग्रंथालय’ या दालनातील पन्नास वर्षाच्या समृद्ध ग्रंथालयाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. “ग्रामीण भागातील एक समृद्ध असे हे आपले ग्रंथालय आहे. आजच्या दिवसासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये ग्रंथ पाहण्यासाठी व पुस्तके जी हवी असतील ती वाचनासाठी घेऊन जाण्यासाठी मुक्त प्रवेश असेल असे जाहीर केले.या ग्रंथालयात आज अखेर एक लाख आठ हजार पुस्तकांचा संग्रह आहे.”असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.शाकुरराव कोरडे सर आपल्या “मानवी जीवनातील पुस्तकांचे महत्त्व”या विषयावरील व्याख्यानात म्हणाले,  धर्मग्रंथ सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार देतात. एक चांगले पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते. चांगले पुस्तक वाचन हे संस्काराचे सर्वात मोठे साधन आहे. माणुसकीचे शिक्षण पुस्तके देतात. वाचनामुळे महाराष्ट्राचा इतिहास घडला.विचारांना दिशा देण्याचे काम पुस्तके करतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,’असाध्य ते साध्य करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे’ आपण पुस्तकांचे वाचन केले तरच आपण वाचू शकू.”


अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्ही. एम. शिंदे म्हणाले,” बहुजन समाज हा पुस्तकांमुळेच पुढे गेला. वारकरी संप्रदायाचे संत साहित्य हे जीवनात मोठे होण्यासाठी गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी वाचनामुळे यशस्वी होतात आणि मोठ्या पदांवर जाऊन पोहोचतात.त्यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तके, संदर्भ,अवांतर साहित्य,ललित साहित्य, अनुवादित साहित्य,इ. पुस्तकांचे वाचन करा.त्यातून आपले विचार प्रगल्भ होतील.पुस्तक वाचन ही फार महत्त्वाची गुरुकिल्ली आहे.”

सदर दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांनी सन-2020 -21 या शैक्षणिक वर्षात पुस्तके लिहिली त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये अनुक्रमे डॉ.निलेश काळे यांचे “भारताचा भूगोल”( प्रशांत पब्लिकेशन, जळगाव), डॉ. मन्सूर मौलवी यांचे
” केमिस्ट्री ऑफ बायो मोलेक्युल्स”( निराली प्रकाशन, पुणे) “न्यू इनोव्हेशन इन केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री( बीपी इंटरनॅशनल प्रकाशन ,लंडन ) डॉ. छाया तांबे यांचे “वानप्रस्थ:शाश्वत जीवनाचा मार्ग “(अविष्कर प्रकाशन, पुणे ), प्रा मनोज देशमुख यांचे “काउंटिंग टेक्निक”- (हिमालया प्रकाशन, दिल्ली), या मान्यवर प्राध्यापक लेखकांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या व प्राचार्यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर यांचा जन्म व मृत्यू हे दोन्ही 23 एप्रिल या दिवशी झाले. एन.एस.एस विद्यार्थी प्रतिनिधी गायकर याने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दासू वैद्य यांच्या ‘पुस्तक’या कवितेचे वाचन याप्रसंगी करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनवणे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय टिळेकर ,डॉ.अमोल बिबे, प्रा.अनिल लोंढे,प्रा.अंबादास आंबवणे, डॉ.रमेश काशीदे,डॉ. भूषण वायकर डॉ.विनायक कुंडलीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे यांनी केले.आभार प्रा.रोहिणी मदने यांनी मानले.

Annasaheb Waghire College : मराठी भाषा सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे : डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन 

Categories
cultural Education पुणे महाराष्ट्र

मराठी भाषा  सकस, समृद्ध  व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे

: डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन

 

पुणे : मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे. असे प्रतिपादन ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे  महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी केले.

: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर  येथे मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये ‘”मराठी भाषा” या विषयावरील घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ,”नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचे स्थान” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला व सृजनक्षमतेला चालना देण्यासाठी “मराठी भाषेची महती” या विषयावर स्व:रचित “काव्य लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. तसेच “प्रश्नमंजुषा”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्‍यात आले होते.

महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्रा .डॉ .छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्त्व “या विषयावर समारोपीय भाषण केले.
सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला असला तरीही मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्गाने आपला सहभाग नोंदविला.

प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी “मराठी भाषेचे”महत्व या विषयावर व्याख्यान दिले ते आपल्या व्याख्यानात म्हणाले, “मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे.मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे.मातृभाषा हे संस्कारांचे विद्यापीठ आहे.आपले जीवन समृद्ध करण्यात भाषेचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे.मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी ही ज्ञानभाषा आहे. तिच्यावर कोणीही तज्ञ किंवा विचारवंत यांनी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही .आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे माझ्या मराठी भाषेला अभिजात व ज्ञानभाषा याचा दर्जा आहेच.”

प्रा. डॉ.छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास ” याविषयी आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या “मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध वारसा आहे.मराठी भाषेचा इतिहास पाहताना लोकसाहित्य, लोकसाहित्याची मौखिक परंपरा यांचाही विचार होणे गरजेचे आहे. शिलालेख,ताम्रपट यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे . मराठी भाषा ही संत, पंत ,तंत यांनी समृद्ध केली आहे .मराठी भाषेला प्राचीनत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे.”

: दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या : डॉ. गणेश चौधरी

“भाषा पंधरवडा” समारोप कार्यक्रमात अनंतराव पवार महाविद्यालय,पिरंगुट चे डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्व” या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या विवेचनात ते म्हणाले, “दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या. भाषेला वाचवायचे असेल तर त्या त्या भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. जो माणूस ग्रंथाला गुरू मानतो तो एकाकी कधीही असू शकत नाही. वाचनाने श्रवण, वाचन,भाषण,लेखन ही भाषिक कौशल्ये विकसित होतात. वाचनाने विचारक्षमता वाढीस लागते. व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन विद्यार्थी वर्गाने केले पाहिजे. “भाषा पंधरवडा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .व्ही .एम शिंदे, उपप्राचार्य डॉ .एस .एफ ढाकणे, उपप्राचार्य डॉ .के.डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.