E Vehicle Charging | पुणे महापालिका आवारात विद्युत चोरी | ऋषिकेश बालगुडे यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिका आवारात विद्युत चोरी | ऋषिकेश बालगुडे यांचा आरोप

पुणे | पुणे महापालिका आवारात विद्ईयुत चोरी होत असल्याचा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी केला आहे.  याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बालगुडे यांनी केली आहे.

बालगुडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार  महानगरपालिका वतीने मोटार वाहन विभाग मार्फत ई मोटार वाहने भाड्याने घेण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. चिनू ट्रेव्हलस या ठेकेदारला टेंडर दिले गेले.  यानंतर त्यांना विद्दुत विभागाने आयुक्त यांच्या मान्यतेनुसार मनपा इमारती मध्ये चारचाकी वाहने ई व्हेईकल चार्जिंग स्टेशन साठी जागा भाड्याने देण्यासाठी भूमी मालमत्ता व्यवस्थापन ला पत्र पाठवले. साधारण गेले १ वर्षभर ठेकेदार यांना जागा देण्यासाठी कोणताही पत्र व्यवहार केला नाही. तसेच विद्दुत विभागाने व्हेईकल डेपो ला कळविले नाही. यात ठेकेदार यांनी सुद्धा व्हेइकल विभागाला कळविणे भाग होते. मनपा भूमी जिंदगी विभागाचा कोणताही करारनामा झाला नसल्याचे समजते. बेकायदा विद्दुत कनेक्शन चिनू ट्रेव्हलस ठेकेदाराने पुणे मनपा मुख्य आवारातील पार्किंग मध्ये घेतले आहे. त्यातून अनेक महिने बेकायदारित्या चारचाकी वाहने चार्जिंग करत आहे. विद्दुत विभाग अधिकारी वाईकर यांना समक्ष हि घटना आज निदर्शंनास आणून दिली आहे. बेकायदा विद्युत चोरी केली महानगरपालिका आवारात होत असेल हि गंभीर बाब आहे..या बाबत त्वरीत विद्युत चोरी बाबत गुन्हा दाखल करावा. व विद्युत भाडे वसूल करणायत यावे. मनपा जागेमध्ये काही आपत्कालीन घटना ई व्हेईकल चार्जिंग बाबत घडली यास जवाबदार कोण?
या ठेकेदारचा तात्काळ ठेका रद्द करावा. कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात येऊ नये. नव्याने या बाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. आपल्याला या आधी ३१-१-२०२३ रोजी निवेदन देण्यात आले आहे.तरी याची कारवाई अहवाल प्राप्त व्हावा. अशी मागणी  ऋषिकेश बालगुडे यांनी केली आहे.

Rushikesh Balgude | मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी  | पोलीस आयुक्तांना दिले निवेदन 

Categories
Breaking News PMC Political पुणे

 मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी

| पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

पुणेकरांचा जीव टांगणीला लावणाऱ्या  मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार शहरात पुणे महानगरपालिका वतीने पाणी पुरवठा, ड्रेनेज,रस्ते,स्मार्ट सिटी, मोबाईल कंपनी व इतर बाबत शहरात सर्वत्र रस्ते खोदाई करण्यात आली. खोदाई बुजविताना पुणे मनपाच्या ठेकेदार कडून निकृष्ट दर्जाहीन काम होते आहे, असे आम्ही पुणे मनपा आयुक्त यांना हि बाब मार्च, एप्रिल मध्ये मिडिया यांच्या द्वारे समोर आणली आहे. या कामाच्यामुळे संपूर्ण शहर खड्डेमय व चिखलमय झाले आहे. यामुळे नागिरकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

खड्ड्यामुळे नागरिकांना पाठीचे व इतर आजार झाले आहे. मनपा प्रशासन यांच्यामुळे नागरिकांचे छोटे मोठे अपघात घडत आहे. यातून कुठल्याही नागरिकाचा जीवाला काही झाल्यास याला सर्वस्वी जवाबदार पुणे मनपा अधिकारी, संबंधित ठेकेदार ,आयुक्त यांची राहील. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, याबाबतचे निवेदन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभजी गुप्ता यांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे, प्रदेश सोशल मीडिया काँग्रेस सचिव विशाल गुंड, जतिन परदेशी, युवक काँग्रेसचे प्रणव नामेकर उपस्थित होते

PMC Gardens : उद्यानातील बंद अवस्थेमधील फुलराणी कारंजे, खेळणी सुरु करा  : कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

उद्यानातील बंद अवस्थेमधील फुलराणी कारंजे, खेळणी सुरु करा

: कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे शहरातील सर्व उद्याने आता खुली झाली आहेत. शहरातील उद्यानमध्ये पर्यटक,लहान मुले ,नागरिकांची गर्दी होत आहे.मात्र  उद्यानामध्ये गेल्यावर फुलराणी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे उद्यानातील फुलराणी आणि कारंजे सुरु करावी, अशी मागणी कॉंग्रेस चे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे..

बालगुडे यांच्या पत्रानुसार शहरातील सर्व उद्याने आता खुली झाली आहेत. शहरातील उद्यानमध्ये पर्यटक,लहान मुले ,नागरिकांची गर्दी होत आहे. यातील पेशवे उद्यान,नानासाहेब पेशवे जलाशय,सरदार घोरपडे उद्यान,वडगाव शेरी,कर्वेनगर जावळकर उद्यान, यामध्ये फुलराणी सुरु करण्यात आल्या होत्या. या सर्व फुलराणी काही तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत,तर काही उद्यानामध्ये असणारे कारंजे ,खेळणी हे सुधा नादुरस्त आहेत.पर्यटक,लहान मुलांना सुट्ट्या असल्यामुळे पालक त्यांना उद्यानामध्ये गेल्यावर फुलराणी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. महापालिका प्रशासन यांच्या दुर्लक्ष पणामुळे या फुलराणी, कारंजे खेळणी हि अवस्था झाली आहे,
तरी  आपण व्यक्तिगत लक्ष घालावे, या सुविधा लवकरात लवकर चालू कराव्यात. असे पत्रात म्हटले आहे.