Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Eco Friendly Diwali | PMC Pune | पुणे मनपा (Pune Municipal Corporation) तर्फे शहरातील नागरिकांनी दिवाळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने (Eco Friendly Diwali) साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी हा सण अंधार करुन दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांनी हवा प्रदुषण तसेच ध्वनी प्रदुषण यांसारख्या उदभवणाऱ्या समस्यांना आळा घालण्याकरिता पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा यासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी केले आहे. (PMC Pune News)

हवा प्रदुषण:-

फटाके हे वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात तरी शहरातील हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी
प्रत्येक नागरिकांनी फटाक्यांचा वापर करणे टाळावे.

ध्वनीप्रदुषण :-

मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदुषण करतात, अशा फटाक्यांचा वापर करू नये. दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई केली आहे. तरी. यांसारखे फटाके उडविणे टाळावे. नागरिकांनी शांतता क्षेत्र जसे की शैक्षणिक संस्था, दवाखाने न्यायालये इ.ठिकाणी फटाके उडवू नये

पर्यावरणपूरक पर्याय:-

नागरिकांनी घर सजविण्यासाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाश देणारे LED दिवे किंवा अपारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की सौर दिवे वापरावेत.
रेडिमेड (Plaster of Paris) पासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात त्यांचा वापर न करता दगड मातीपासून किल्ले बनवावेत.
• रासायनिक रंग/ रांगोळी न वापरता नैसर्गिक सहित्यांसह रांगोळी आकर्षक बनवावी.
तसेच प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा रिमायकल करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरुन इको फ्रेंडली सजावट करावी.
हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त झाल्याने श्वसनाचे आजार होवू शकतात यासाठी जास्त धूर उत्सर्जितकरणाऱ्या फटाक्यांचा वापर करणे टाळावे.

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

Categories
social देश/विदेश महाराष्ट्र लाइफस्टाइल संपादकीय

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

        रस्त्यासाठी वाहन आहे, की वाहनासाठी रस्ता आहे. हेच आज कळेनासे झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची गर्दी पाहिल्यानंतर कुणाच्याही मनामध्ये प्रश्न पडतो, की ही वाहन येतात कुठून आणि जातात कुठे ? या वाहनाची प्रचंड गर्दी रस्त्यावर आहे. ही वाहनं इकडून तिकडं अगदी सुसाट वेगामध्ये जात आहेत. कोणत्या कामासाठी जातात? त्यांची काय कामे आहेत? असे अनेक प्रश्न मनामध्ये फेर धरू लागतात आणि अपेक्षेप्रमाणे  त्याची उत्तरे माञ कुणाकडेच मिळत नाहीत. आज प्रत्येक घरोघरी वाहनाची संख्या खूप वाढलेली आहे. मग त्यामध्ये दोन चाकी असो किंवा चार चाकी असो. डोईप्रमाणे वाहनांची संख्या प्रत्येक घरामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. घरामध्ये कोणतेही एक वाहन असेल तरीही आपली कामे होतात परंतु आज प्रत्येक जण इतक्या घाईगडबडीमध्ये आहे. प्रत्येकाला वाहनाची आवश्यकता स्वतः गणिक वाटू लागले आहे. घरामध्ये जेवढेही व्यक्ती आहेत त्यांची प्रत्येकाची कामे वेगवेगळ्या ठिकाणी असलेली पाहायला मिळत आहेत.  त्या कामाची किंवा गरजेची पूर्तता करण्यासाठी  प्रत्येकजण आता गाडीवर स्वार होऊ पाहत आहे.
        दारातून बाहेर पाय टाकला की तो पाय गाडीवरच असावा अशी मानसिकता प्रत्येकाची होऊ लागली आहे. कदाचित माणसाच्या गरजा, माणसाची कामे वेगवेगळ्या दिशेला असतील हे कोणीही नाकारू शकत नाही कारण घरापासून भाजी मार्केट लांब असेलही. समजा ते दोन किलोमीटर असेल, मुलांची शाळा दोन किलोमीटर असेल, दवाखाना दोन-तीन किलोमीटर असेल, नातेवाईकांची, मित्रमंडळीची घरे दोन तीन किलोमीटर असतील. तिथपर्यंत जाण्यासाठी आपण वेळेची बचत करतोय हे चांगलेही आहे; पण वाहन आणि माणूस याचे नाते इतके घट्ट झाले आहे की आता माणसाला वाहनांचे व्यसन लागलेली आहे हे नाकारून चालणार नाही. खरोखरच कामासाठी वाहन चालवणाऱ्यांची संख्या आणि एखाद्या कामानिमित्त वाहनाची आवश्यकता नसून अशा वाहन चालवणाऱ्यांची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर काहीही काम नसताना वाहन चालवणाऱ्या धारकांची संख्या नक्कीच जास्त आहे. हे कोणीही मान्य करेल. कोणत्या कामासाठी कोणत्या वाहनाची  आवश्यकता आहे. याचा विचार आत्ता प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
            आजची तरुणाई तर या वेगावर इतकी आरूढ झालेले आहे, की त्यांच्या गाडीचा प्रचंड वेग पाहून, त्यांच्या गाडीचा सायलेन्सरचा आवाज ऐकून कुणाच्याही मनाचा थरकाप उडेल. अशीही तरुणाई अपघाताला बळी पडते ती कायमचा मृत्यू घेऊन किंवा कायमचं अपंगत्व घेऊन. हायवेचं चित्र तर फार विचित्र पाहायला मिळत आहे . ताशी १०० ते १२० च्या वेगाने चाललेल्या गाड्या हे कशाचा द्योतक आहे ?कोणती गडबड आहे? कदाचित त्यांना गडबड असेल तर ही मंडळी लवकर का निघत नाहीत. याचा विचार  आपण कधी करणार आहोत. अशा ह्या अपघाताचे चित्र किंवा प्रसंग आपल्याला हायवेवर सर्रास पाहायला मिळते .तसे तर भारतामध्ये दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो. भारतामध्ये अतिवेगाने गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित अपघाताचे प्रमाणही जास्तच आहे. एखाद्या रोगापेक्षा किंवा एखाद्या आपत्तीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाण हे वाहन अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे आहे. हे निर्विवाद सत्य आहे. याची आकडेवारी आपल्याला इंटरनेटवर किंवा भारत सरकारच्या ‘रस्ते व वाहतूक परिवहन ‘ संकेतस्थळावर मिळूही शकेल ;पण आपल्याला हा आकड्याचा खेळ न खेळता त्यामध्ये अडकून न राहता प्रत्येकाने जागृत होणं आवश्यक आहे. रोज किती तरी अपघात होतात ते आपल्या हलगर्जीपणामुळे! ते आपल्या दृष्टीलाही पडतात.
परवा असाच एका मुलाचा अपघात पहावा लागला.कानामध्ये इयरफोन लावून तो तरुण  भन्नाट वेगाने गाडी चालवत असताना अपघाताला बळी पडला. कारण काय तर त्याच्या कानामध्ये असलेला इयरफोन. या इयरफोनमुळे पाठीमागून आलेली गाडी कळत नाही ना पुढून आलेली गाडी कळत नाही आणि ही तरुणाई अपघाताला बळी पडते ती अशा छोट्या छोट्या कारणामुळे. तो  मुलगा क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये कानामध्ये असलेल्या इयरफोनवर गाणं मात्र जोर जोरात चालू असलेलं पाहायला मिळालं.  त्याच गाण्याच्या धुंदीमध्येच तो तरुण शेवटच्या घटका मोजत होता. सर्वांनी त्याला दवाखान्यात नेण्याची, वाचवण्याची धडपड प्रामाणिकपणे केली. परंतु अशा ह्या प्रसंगामधून प्रत्येकाने बोध घेण्याची वेळ आली आहे.  मानवी मनाला कशाचीही शुद्ध राहिली नाही. ना विचारांना बुद्धी. हे चित्र काय सांगते? कुठे चाललोय ? इतके गाड्यांचे व्यसन का लागले आहे? हे  खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे.
        अमेरिकी सारखी आपली परिस्थिती नाही. अमेरिकेमध्ये वर सांगितल्याप्रमाणे घरापासून शाळा- महाविद्यालय, दवाखाना, मार्केट, नोकरीचे ठिकाण ही स्थळे लांब- लांब आहेत . कारण भारतापेक्षा अमेरिका क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार ते योग्यही आहे; पण भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत. रस्त्यामध्ये खड्डे आहेत. आणि यामधून वाहन चालवत असताना आपलं मन, शरीर याच्यावर विपरीत परिणाम होत असतो .आपला मानसिक समतोल, मनाची एकाग्रता वाहन चालवताना ढासळत आहे ही प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये नाही. ट्रॅफिकमध्ये आपण थांबतो; पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक नियम पायदळी तुडवून अधून मधून पुढे जाण्याचा मार्ग शोधतच असतो. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये कधी येणार? आपण आपल्या इच्छित स्थळी पायीही जाऊ शकतो पण आता पायी चालणं म्हणजे मागासलेपणाचे वाटू  लागलं आहे. गाडी चालवण्यामध्ये आत्ता प्रतिष्ठा आली आहे. मुंबई ,पुणेची परिस्थिती तर फार वेगळी आहे. कदाचित तिथे रेल्वे जीवनवाहिनी असल्यामुळे माणूस कमीत कमी रेल्वेमध्ये घटकाभर बसतो तरी. पण आपल्यासारख्या अर्बन , निमशहरी भागामध्ये मात्र प्रत्येकाचा अट्टाहास आहे तो गाडीचा. गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे जर तरुणी बसली असेल किंवा पुरुषाच्या पाठीमागे जर त्याची पत्नी बसली असेल तर गाडीचा वेग कसा वाढतो हे न सांगणेच बरे. आपण गाडी घेतो तो दुसऱ्याच्या इर्षेमुळे, प्रतिष्ठेमुळे आणि नवीन गाडी घेतल्यानंतर आपण सहज फेरफटका मारतो, काम नसताना उगीचच रोडवर जाण्याचा अट्टाहास करतो.
        गाडीचा वेग वाढवण्यापेक्षा आपण आपल्या विचाराचा वेग वाढवणे आवश्यक आहे. आपल्या विचाराची प्रगती होणे आवश्यक आहे. नाही तरी आपण या सर्व भौतिकसुविधा आपल्या सोयीसाठी घडवून आणू ; पण त्यामधून जर आपल्या प्रगतीला बाधा येत असेल तर अशा भौतिकसुविधाचा उपयोग आपल्या जीवनासाठी प्रगतीची अधोगती कधी करेल हे सांगता येत नाही. आपण अशा मोहात पाडणाऱ्या भौतिक सुविधा पासून चार पावलं किंवा चार हात लांब राहिलेलंच बरं! आपल्याला प्रगती करण्यासाठी या सगळ्या भौतिक सुविधांची आवश्यकता आहेच; पण कोणती वस्तू केव्हा वापरायची हे मात्र आपल्याला कळणे फार गरजेचे आहे. वाहन आपण आपल्या सोयीसाठी घेऊ पण आपण  वाहनावर स्वार होण्याऐवजी वाहनच आपल्यावर स्वार होऊ नये एवढे मात्र एवढे मात्र या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.
   —-
 –  प्रा. दशरथ ननवरे
  (लेखक  दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
    संपर्क | ८६६९११८५९७

Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!

| स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल

 | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

 पुणे.  गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरात मोठी धामधूम सुरू आहे.  मात्र हा आवाज करत असताना निसर्गाची काळजी गणेश मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात नाही.  याचा लोकांना फक्त त्रास होतो.  विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या 21 वर्षांपासून पुण्यातील रहिवासी ध्वनिप्रदूषणाने हैराण झाले आहेत.  गेल्या वर्षीच्या विसर्जनात ध्वनी प्रदूषणाची पातळी थोडी कमी झाल्याचे दिसून होती. कारण कोरोनामुळे १९ वर्षांतील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण आढळून आले होते. गेल्या वर्षातील सरासरी आवाज 59.8 डेसिबल होता.  यंदा मात्र हा आवाज दुपटीने वाढून 105.2 डेसिबल झाला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील नागरिकांचे गेल्या दोन दिवसापासून जगणे मुश्किल झाले आहे. डीजे आणि ढोल ताशाच्या आवाजाने नागरिक मेटाकुटीला आले. सीईओपी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हे मूल्यांकन केले आहे.

  – आवाजाचे मापन मुख्य 10 चौकांमध्ये केले जाते

 दरवर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख 10 चौकांचे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी सीईओपी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सरावा केला जातो.  यामध्ये बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबर्या गणपती चौक, भाऊसाहेब गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, खंडूजीबाबा चौक अशा चौकांचा समावेश आहे.  या संदर्भात महाविद्यालयाच्या उपयोजित विज्ञान विभागाच्या पर्यावरण विज्ञान संशोधन केंद्राचे डॉ.महेश शिंदीकर म्हणाले की, महाविद्यालयाकडून गेल्या 22 वर्षांपासून हे काम केले जात आहे.  चालू वर्षातही कॉलेजचे कौतुक झाले.  त्यानुसार अनेक प्रकरणे समोर येत आहेत.  लक्ष्मी रोडवर यंदा आवाजाच्या तीव्रतेने कहर केला आहे.  लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र दिवस रात्रीच्या नियमातील सरासरीपेक्षा हा आवाज दुपटीने ओलांडला गेला. दोन दिवस येथील वातावरण अतिशय असह्य होते, असे मत स्थानिक रहिवाश्यानी नोंदवले.

 – आवाज वाढीस प्रशासनाचे नरमाईचे धोरण कारणीभूत

 डॉ.शिंदीकर यांच्या मते ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे.  यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनीही यात मोलाचे सहकार्य केले.  मात्र असे असले तरी प्रशासनाच्या नरमाईच्या धोरणामुळे हा आवाज वाढला आहे. असे मत शिंदीकर यांनी व्यक्त केले. निरीक्षणानुसार विसर्जनात आवाजाची सर्वात कमी पातळी 9 सप्टेंबर ला सायंकाळी 4 वाजता म्हणजे 64 डेसिबल नोंदवली गेली. तर सर्वाधिक आवाज 10 सप्टेंबर ला सकाळी आठ नंतर खंडूजी बाबा चौकात 128.5 (अति धोकादायक) नोंदवला गेला.
या उपक्रमात यावर्षी विद्यार्थी स्वयंसेवक सुयोग लोखंडे, जयवंत नांदोडे, तन्मय पाठक, सर्वेश कोळेकर, शिवकुमार वारकड, योगेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष मोजणीत सहभाग घेतला तर आकडेवारीचा निष्कर्ष काढण्यासाठी अंकिता महाजन, गौरी जाधव, अनुष्का पाटील, स्नेहल गुडल, श्रेया इंगळे, शिल्पा मांदळे, जयश्री मिसाळ यांनी सहकार्य केले. तर माजी विद्यार्थी विनीत, आदित्य लंके, युवराज चव्हाण, मनोज राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

 – आवाज पातळी अशी आहे?

 वर्ष.            आवाज पातळी (डेसिबल)
 2008       101.4
 2010      100.9
 2012.     104.2
 2013.     109.3
 2016.      92.6
 2018.     90.4
 2019.      86.2
 2020.      59.8
2022.       102.5