Tag: Aditya Thackeray
Aditya Thackeray visited Vetal Tekadi | वेताळ टेकडीचा बळी देण्याचा पुणे महापालिकेचा घाट
| आदित्य ठाकरे यांचा आरोप
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
: मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
.औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात.
अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहे. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
”पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली” –
”औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्त होतात. याचं शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सुफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे”, असा टोलाही पवारांनी लगावला.
तुम्ही कोण? महात्मा गांधी कि वल्लभभाई पटेल?
”राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?” अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.
राऊत-राणा एकत्र जेवतात
राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? –
कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली – राज ठाकरे
पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे., असा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.
भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला –
निवडणुका नाही, उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.
अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान –
पुण्यातील अंध विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.
आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक
: पुणे महापालिका निवडणुकीची तयारी
पुणे : राज्यातील विविध महापालिकेच्या प्रभाग रचना (pmc draft ward structure) काल (मंगळवार) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीची (PMC Elections) तयारी केली असून पुणे महापालिकेत (Pune Corporation) देखील सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने तयारी सुरू झाली असून येत्या 6 आणि 7 तारखेला शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विविध कामांचे उदघाटन आणि पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.
शहर अध्यक्ष संजय मोरे यांची माहिती
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर (Pune Corporation Ward Structure) झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), आणि शिवसेनेच्यावतीने स्वबळाची तयारी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रविवारी आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर असून या दोन दिवसात विविध विकास कामाचं (Development Work) उदघाटन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत बैठक घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.
आम्ही स्वबळाची तयारी केली
गेल्या 2 वर्षांपासून पक्षाच्यावतीने स्वबळाची तयारी सुरू असून शिवसंपर्क अभियान, शिवसंवाद कार्यक्रम घेण्यात येत असून शहरात पक्ष वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलं जातं आहे. पुढं आघाडी होणार की नाही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) घेतील.पण आम्ही आमची स्वबळाची तयारी केली असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितलं.