PMC Vs TATA Projects | महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | टाटाच्या उज्वल कंपनीला महापालिकेला द्यावे लागणार व्याजासहित पैसे

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Vs TATA Projects | महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | टाटाच्या उज्वल कंपनीला महापालिकेला द्यावे लागणार व्याजासहित पैसे

| बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान

PMC Vs TATA Projects | पुणे | शहरातील पथ दिव्यांच्या (LED Fitting) माध्यमातून वीज बचत (Electricity Saving) करण्यासाठी महापालिकेकडून (PMC Electricity Department) प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स (TATA Projects) च्या उज्वल कंपनीला (Ujwal Pune) देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. मात्र कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेलाच महागात पडला आहे. कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली होती. तसेच याविरोधात औदयोगिक न्यायालयात देखील दाद मागितली होती. उज्वल  कंपनीला सात टक्के व्याजासह २ कोटी ८१ लाख १९ हजार रूपये देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला दिले होते. या विरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मात्र तिथे ती याचिका फेटाळली गेली. त्यामुळे उज्वल कंपनीला पैसे द्यावे लागणार हे सिद्ध झाले आहे. (PMC Pune)
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला होता. मात्र हे प्रकरण महापालिकेच्याच अंगाशी आले आहे. आता अडवलेले बिल व्याजासहित द्यावे लागणार आहे.

New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

| स्मार्ट पुणे फौंडेशनच्या वतीने ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ कार्यक्रमाचे आयोजन

New Parliament Building  | Vinayak Deshpande | भारताच्या नव्या संसद भवनाचे (New Parliament building) नुकतेच २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे ६,२०,००० चौ. फुटाचे अद्वितीय बांधकाम २१ महिन्यात पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) चे प्रमुख सल्लागार आणि कोथरुडचे सुपुत्र  विनायकजी देशपांडे (Vinayak Deshpande)यांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ स्मार्ट पुणे फौंडेशन (Smart Pune Foundation) यांच्या आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, ४ जून २०२३ ला हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला (Dr Sandip Butala) यांनी दिली. (New Parliament building | Vinayak Deshpande)

कोथरुड, मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. देशपांडे यांचा सत्कार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil), राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javdekar) यांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विनायक देशपांडे यांची मुलाखत प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ हे घेणार आहेत. यामध्ये हा प्रकल्प उभारताना आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात, विविध अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा करून याची माहिती देणार आहेत. ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ असे याचे स्वरूप असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि स्मार्ट पुणे फौंडेशनचे अधक्ष डॉ. बुटाला यांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि कोथरुडकर असलेल्या विनायक देशपांडे यांच्या कौतुक समारंभाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील डॉ. बुटाला यांनी केले आहे.


News Title | Pune’s son Vinayak Deshpande, who led the construction of the new Parliament building, was felicitated on Sunday

Tata Group Vs Shrinivas Kandul | टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’ | महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC पुणे

टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’

| कंदूल यांच्या विरोधात मनपा आयुक्तांकडे तक्रार

| महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. तर दुसरीकडे कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला आहे. दरम्यान कंपनीने आता वेगळीच भूमिका घेत विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची तक्रार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. कंपनीच्या या आक्रमक भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून महापालिका आयुक्त आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला.
महापालिकेच्या विद्युत विभाग मार्फत २०१० सालापासून शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील प्रकाशासाठी एलईडी पथदिवे उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले होते कारण यामुळे उर्जा बचत होत होती. त्यानुसार इस्को तत्वावर टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये पथदिवे सहित प्रत्येक फिडर स्काडा सिस्टीम च्या अंतर्गत बसवण्याचा कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले. कंपनीला कामानुसार रनिंग बिले देखील देण्यात येऊ लागली. आतापर्यंत ११८ कोटींची बिले देखील देण्यात आली. मात्र कंपनी प्रत्यक्ष जागेवर बसवलेल्या फिटिंग नुसार बिले न देता वाढीव बिले देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी निदर्शनास आणून दिली.
लेखापरीक्षक यांनी दुसरा आक्षेप काढला आहे. त्यानुसार कंपनी कडून स्काडा सिस्टीम चालू केली नसतानाही काही बिले विद्युत विभागाकडून अदा करण्यात आली आहेत. टेंडर मधील अटीनुसार बिल अदा करण्यासाठी स्काडा consumption रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र हा रिपोर्ट नसताना देखील बिल अदा केले गेले. त्यामुळे अदा केले गेलेल्या बिलापैकी ५ कोटी ४४ लाख कंपनी कडून वसूल करावेत. असे एकूण १५ कोटी उज्वल कंपनी कडून वसूल करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
त्यानुसार विद्युत विभागाने कंपनीवर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. कंपनी कडून १५ कोटी वसूल करण्या बाबत देखील पत्र देण्यात आले आहे. शिवाय काम चोख करण्याबाबत बजावले आहे. यावर कंपनी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. कारण कंपनीने याबाबत महापालिकेची राज्य सरकार कडे तक्रार केली आहे. महापालिका वेळेवर बिले देत नसल्याने आमचे नुकसान होत आहे. असे कंपनीचे म्हणणे आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला आहे. यावर आता महापालिका राज्य सरकारला आपला सविस्तर अहवाल पाठवणार आहे.
दरम्यान कंपनीचे हे सर्व काम उघड करणारे आणि कंपनीच्या कामाबाबत वारंवार आक्षेप घेणारे आणि महापालिकेचे हित पाहणारे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांना कंपनीकडून  टार्गेट केले जात आहे. कंपनीने कंदूल यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केलीआहे. कंदूल यांनी आमचे आर्थिक नुकसान केले आहे. शिवाय बिले वेळेवर न देणे, नसलेल्या चुका काढणे, असे आरोप कंपनीकडून कंदूल यांच्या विरोधात करण्यात आले आहेत. त्यामुळे कंदूल यांना या पदावरून हटवून तिथे दुसरा अधिकारी द्यावा, अशी मागणी कंपनीने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान यावर महापालिका आयुक्त यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कंपनीच्या चुका काढणाऱ्या आणि महापालिकेचे हित पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये, एवढी अपेक्षा महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Chief Auditor objection | ‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’ | टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश | विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत

Categories
Breaking News PMC पुणे

‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’

| टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान

| मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश

| विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत

पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
वास्तविक पाहता हे काम विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे असताना देखील मुख्य लेखापरीक्षकांनी ही बाब उघडकीस आणली आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले आहे. आता मात्र उशिरा जाग आलेल्या विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला आहे.
महापालिकेच्या विद्युत विभाग मार्फत २०१० सालापासून शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील प्रकाशासाठी एलईडी पथदिवे उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले होते कारण यामुळे उर्जा बचत होत होती. त्यानुसार इस्को तत्वावर टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये पथदिवे सहित प्रत्येक फिडर स्काडा सिस्टीम च्या अंतर्गत बसवण्याचा कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले. कंपनीला कामानुसार रनिंग बिले देखील देण्यात येऊ लागली. आतापर्यंत ११८ कोटींची बिले देखील देण्यात आली. मात्र कंपनी प्रत्यक्ष जागेवर बसवलेल्या फिटिंग नुसार बिले न देता वाढीव बिले देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी निदर्शनास आणून दिली.
मुख्य लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार रनिंग बिलामध्ये T५ फिटिंग चे ५६ watt चे consumption equivalent sodium ७० watt म्हणजे ८३.५१ watt घेण्यात आले आहे. तसेच T५ ४*२४ फिटिंग चे ९६ watt चे onsumption equivalent sodium १५० watt म्हणजे १८०.८४ watt घेण्यात आले आहे. त्यामुळे वीज बचती मध्ये वाढ होऊन ठेकेदारास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.
आक्षेपानुसार प्रत्यक्ष जागेवर बसविलेल्या फिटिंगच्या Wattage नुसार देय्यके अदा होणे अपेक्षित आहे. सर्व बिलांसाठी एनर्जी सेहिंग काढण्यासाठी T-५ फिटिंगचे ५६watt चे consumption equivalent sodium ७०watt म्हणजे ८३.५१watt घेण्याऐवजी actual wattege प्रमाणे म्हणजेच ५६watt तसेच ८ lux घेऊन तसेच T५ (४*२४) फिटिंगचे ९६watt चे consumption equivalent sodium १५०watt म्हणजे १८०.८४ watt घेण्याऐवजी actual wattege प्रमाणे म्हणजेच ९६watt तसेच वरील
तक्त्यानुसार १५ lux घेऊन एनर्जी सेहिंग काढणे अपेक्षित आहे.  T-५ फिटिंगसाठी IS standards प्रमाणे lux level, रस्त्याची रुंदी, पोलची उंची, पोलमधील अंतर या बाबी विचारात घेऊन Joint Survey करून equivalent sodium घेणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी T-५
फिटिंग्जचे आवश्यक lux मिळत नाही फक्त याच T-५ साठी जॉईंट सर्वे रिपोर्ट वरून equivalent sodium घेणे अपेक्षित आहे, सर्व T-५ साठी नाही असे या अटी व शर्ती नुसार दिसून येते. परंतु या ठिकाणी सर्वच T-५
Fitting चे Without Survey जास्त Wattege equivalent म्हणून घेऊन ज्यादा बिल देण्यात आलेला आहे. त्यामुळे बिलांची वसुलपात्र रक्कम काढण्यात आली आहे.

तसेच विद्युत विभागाने ११/१०/२०२१ पासून वेळोवेळी जॉईंट सर्वे रिपोर्ट विभागाकडे सादर करण्यासाठी तोंडी तसेच लेखी मागणी करून सुद्धा आज तागायत आपण या विभागाकडे जॉईंट सर्वे रिपोर्ट दिलेला नाही. सदर रिपोर्ट बाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) व मा. महापालिका आयुक्त यांनी सुद्धा प्रत्येक बैठकीत सूचना केलेले आहे. त्यामुळे जॉईंट सर्वे रिपोर्ट नसताना आपणास बिल क्रमांक ९ ते ७२ जे जादा वीजबचतीचे बिल अदा करण्यात आले.  ते निविदा अटी व शर्तीमधील तक्तानुसार T-5 फिटिंगचे Equivalent घेऊन वीजबचतीचे बिल देणे अपेक्षित असताना तसे न दिल्याचे मुख्य लेखापरीक्षक यांचे तपासणीअंती दिसून आलेले असून तसे कागदपत्रांवरूनही स्पष्ट होत आहे. म्हणून  सहमहापालिका आयुक्त तथा मुख्य लेखापरीक्षक पुणे मनपा यांनी  १०,५६,८५,६०५.७७/ रक्कम वसूल करण्यास सूचना केल्या आहेत.

त्याचप्रमाणे लेखापरीक्षक यांनी दुसरा आक्षेप काढला आहे. त्यानुसार कंपनी कडून स्काडा सिस्टीम चालू केली नसतानाही काही बिले विद्युत विभागाकडून अदा करण्यात आली आहेत. टेंडर मधील अटीनुसार बिल अदा करण्यासाठी स्काडा consumption रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र हा रिपोर्ट नसताना देखील बिल अदा केले गेले. त्यामुळे अदा केले गेलेल्या बिलापैकी ५ कोटी ४४ लाख कंपनी कडून वसूल करावेत. असे एकूण १५ कोटी उज्वल कंपनी कडून वसूल करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.

याला विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. वास्तविक पाहता हे काम विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे असताना देखील मुख्य लेखापरीक्षकांनी ही बाब उघडकीस आणली आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले आहे. आता मात्र उशिरा जाग आलेल्या विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला आहे. यावर आता उज्वल कंपनीची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.