MLA Sunil Kamble | पुणेकरांना कायमस्वरूपी 40% करसवलत द्या  | आमदार सुनील कांबळे यांनी  औचित्याचा मुद्दा उपस्थित केला 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना कायमस्वरूपी 40% करसवलत द्या

| आमदार सुनील कांबळे यांनी  औचित्याचा मुद्दा उपस्थित केला

पुणे | पुणेकरांना देण्यात येणारी 40% कर सवलत रद्द करण्यात आलेली आहे. शिवाय महापालिकेने वाढीव बिले देखील पाठवली आहेत. यामुळे पुणेकर हवालदिल झाले आहेत. हा निर्णय रद्द करत 40% करसवलत कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आमदार सुनील कांबळे यांनी याबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला आणि करसवलत कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी सरकारला केली.
सुनील कांबळे यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार  शहराच्या तात्कालीन परिस्थिती मुळे नागरिकांना टॅक्स भरणे शक्य व्हावे म्हणून पुणे महानगर पालिकेच्या मुख्य सभेमध्ये मुख्य सभा ठराव  समत करणेत येऊनकरपात्र रकम ठरविताना १०% ऐवजी १५% सूट द्यावी. आणि घरमालक स्वतः रहात असलेल्या जागेचे भाडे वाजवी भाड्याच्या ६०% इतके धरण्यात यावे याप्रमाणे कर आकारणी करावी असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सन २०१०-२०१२ चे लेखापरिक्षणामध्ये की करपात्र रक्कम ठरविताना १०% ऐवजी
१५% सूट देणेबाबत कायद्यामध्ये तरतूद नसल्याने याबाबत आक्षेप घेतला व त्यावर लोकलेखा समितीमध्ये चर्चा झाली. त्यानुसार मुख्य सभा ठरावाचे विखंडन करण्याबाबत शासनाच्या पत्रानुसार महापालिकेने प्रस्ताव सादर केला. शासनाने त्यावर मुख्य सभा ठराव विखंडीत केला. तसेच ५% फरकाच्या रकमेची वसुली २०१० पासून करणेबाबत आदेश देण्यात आले.
संपूर्ण ठरावाचे विखंडन केले गेले असल्याने मिळकत करातून देण्यात येणारी ४० टक्के सवलतही रद्द केली; त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ नुसार मा. महापालिका मुख्य सभा
ठराव  क्र. १, २ व ४ थे निर्णय अमान्य केले असून क्र. ३ चा निर्णय
मान्य केला आहे. तसेच इमारतीचे वाजवी भाडे ६०% धरून करपात्र मुल्याच्या ४०% दिलेल्या सवलतीच्या अनुषंगाने वसुल करावयाची फरकाची रक्कम दि. ०१/०८/२०१९ पासून पुढे दसुल करण्यास मे. शासनाने मान्यता दिली तथापि एमएमसी अॅक्ट कलम १२९ प्रमाणे रिटेबल व्हॅल्यू किंवा
कॅपिटल व्हॅल्यू महानगरपालिका ठरवू शकते त्याचा दर काय असावा हे ठरवण्याचे अधिकार सुध्दा या कलमाद्वारे महानगरपालिकेलाच आहेत. यात राज्य सरकारची लोक लेखा समिती हस्तक्षेप करू शकत नाही.
शासनाने मुख्य सभा ठराव क्र. ५ दि. ०३/०४/१९७० विखंडीत करताना कोणतिही तारीख नमूद न केल्याने सदरील ठराव हा सन १९७० पासून रद्द ठरत आहे. असे करावयाचे झाल्यास मोठ्या प्रमाणात मिळकत कर आकारावा लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे फरकाची रक्कम मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे व ती अनेक वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने वसूली करावयाची झाल्यास त्याचा बोजा सध्याचे मिळकतधारकावर पडून प्रचंड लोकक्षोभास सामोरे जावे लागेल. तसेच त्यानुसार कारवाई करताना महापलिकेसही प्रशासकीय कामामध्ये अनेक अडचणी उद्भवणार आहेत. दि. ०१/०८/२०१९ पासून या  सवलती काढताना संबंधित मिळकत धारकांना खास (स्पेशल) नोटीस बजावणे, स्वाक्षरी घेणे. नोटीस अमान्य असल्यास सुनावणी घेणे तसेच इतर अशी कार्यवाही करावी लागेल. दि. ०१/०८/२०१९ पासून ते आजपायेतो अनेक मिळकतीच्या मालकी हक़ामध्ये तसेच प्रत्यक्ष जागेवर देखिल मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब नोटीस बजावताना अडचणी निर्माण होणार आहे. मुळ मिळकतीचे मिळकतधारक मयत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळ मिळकतीस सवलती दिल्या.
तथापि, त्यानंतर त्या मिळकतीचे नुतनीकरण होणे, मिळकतीचा नाश होणे इ. व यांसारख्या घटनांमुळे नोटीस देणे व वसुली करणे अशक्यप्राय होणार आहे. त्यामुळे हे अव्यवहार्य आहे. दि. ०१/०४/२०१९ पासून सर्व नवीन मिळकतींना १५% ऐवजी १०% सवलत देण्यात येत असल्याने फरकाची रक्कम वसूल करू नये, ज्या मिळकतना ४०% सवलत देऊन मिळकत कराची आकारण
करण्यात आलेली आहे, अशी आकारणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १९ नुसा कायम ठेवावेत यावर शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही करावी. अशी मागणी कांबळे यांनी केली.

MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार ? | सुनील टिंगरे यांचा सवाल | विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली.

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार : सुनील टिंगरे

|विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली

 
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान भू-संपादनासाठी आपली घरे तत्काळ खाली करणार्‍या विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील नागरिकांची पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या लोकांना घरे कधी दिली जाणार? असा प्रश्‍न वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला.
या संदर्भात सुनील टिंगरे यांनी सांगितले कि वर्ष २००८-०९ च्या दरम्यान पुणे शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. त्यामध्ये रस्ते, क्रीडांगण व क्रीडा संकुल यांचा समावेश आहे. यामध्ये लोहगाव एयरपोर्ट से नगररोड दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे आयुक्त म्हणून प्रविणसिंह परदेशी कार्यरत होते. परदेशी यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जवाबदारी देखील होती. विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील काही घरे रस्ता रूंदीकरणात बाधा आणत होती. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देवून तेथील १३८ घरे व १५ दुकानांची जागा संपादित केली गेली. नागरिकांनी देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लगेचच आपल्या घरांचा ताबा दिला. त्यानंतर आता १४ वर्षे झाल्यावरण सुद्धा नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही.
पुनर्वसनासाठी येथील नागरिक मनपा आणि झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण दोन्हीकडे हेलपाटे मारत आहेत, परंतु दोघांकडून एक-दूसर्‍याकडे बोटे दाखविली जात आहेत. बाधितांमधील काही लोक दगावली देखील आहेत. भगवान श्रीराम यांचा वनवास देखील १४ वर्षांनंतर संपला होता, या लोकांचा वनवास कधी संपणार? हा प्रश्‍न यावेळी सभागृहात उपस्थित केला. या सर्व लोकांना लवकरात लवकर घरे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

पर्यायी रस्ता विकसित न केल्याने नागरिकांची अडचण

यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी लोहगाव परिसरातील पोरवाल रस्त्याची वाहतूक समस्येचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी सांगितले कि अत्यंत रहदारी असणार्‍या पोरवाल रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी दोन-दोन तास नागरिकांना वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. पोरवाल रस्त्याला दो पर्यायी रस्ते आहेत, परंतु मनपा प्रशासनाकडून संबंधित रस्त्यांना डेवलप न केल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आतापर्यंत अनेक समस्या वाहतूक कोंडीमुळे झाल्या आहेत. ट्रैफिक मुळे एक रूग्णाचा मृत्यु झाला आहे तर एक महिलेची रस्त्यावर गाडीमध्ये प्रसूती झाली आहे. चार वर्षोंपूर्वी लोहगावचा मनपा मध्ये समावेश झाला आहे, परंतु येथील समस्या जशाच्या तशा आहेत. रस्ते, पानी, डे्रनेज सगळ्या समस्या आहेत, परंतु ट्रैफिक जामची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना लवकर दिलासा दिला जावा.

Police Recruitment | राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती

| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई| राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.

Monsoon Session | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई| सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

MLA Sunil Kamble | संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार | आमदार सुनील कांबळे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार | आमदार सुनील कांबळे

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू नये व सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट वार्षिक 21 हजारावरून साठ हजारापर्यंत करण्यासाठी तसेच लाभार्थ्याला मिळणारे अनुदान दुप्पट मिळवून देण्यासाठी आता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मी विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित करून शासनाकडून मंजूर करून घेईल. असे आश्वासन आमदार सुनील कांबळे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिले

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमर्फत सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील उत्पन्न दाखला सादर केल्या नंतरच माहे जूलै २०२२ पासून अनुदान दिले जाणार उत्पन्नाचा दाखला दिला नाही तर सदरचा लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहणार नाही म्हणून सदर लाभार्थ्यांसाठी तहसिलदार पुणे शहर व तहसिलदार संजय गांधी योजना या कार्यालयांने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री सुनील कांबळे साहेब यांच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन केले यावेळी २८० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले.

२१४-पुणे कॅन्टोमेट मतदार संघातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मिळावा म्हणून दि.२७/०७/२०२२ रोजी महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक विदयालय
ढोले पाटील रोड रुबी हॉल शेजारी, पुणे या ठिकाणी सकाळी
११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिबीराचे आयोजन केले होते सदर शिबिरासाठी तहसीलदार पुणे शहर व तहसीलदार पुणे शहर संजय गांधी योजना यांनी सहकार्य केले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहर संजय गांधी तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास तसेच मतदार संघातील पदाधिकारी महेश पुंडे, सुशांत निगडे, श्रीराम चौधरी, सुरेश माने, उमेश गायकवाड, निलेश मंत्री, जयप्रकाश पुरोहित, बाळासाहेब घोडके, रामचंद्र देवर, सुरेश धनगर, स्वाती धनगर, चंद्रकांत कांबळे, प्रनोती सोनवणे, आशिष सुर्वे, विशाल कोंडे, गणेश यादव, दिनेश नायकु, सुरेखा कांबळे, ज्ञानेश्वर कोठावळे, रुपेश खिलारे, आशिष जाणजोत, रफिक शेख, राजू नायकोडे व कार्यकर्ते उपस्थित होते