Tag: Vidhansabha
सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार : सुनील टिंगरे
|विधानसभेत आमदारांनी प्रश्नाला वाचा फोडली
पर्यायी रस्ता विकसित न केल्याने नागरिकांची अडचण
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती
| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई| राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई| सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार | आमदार सुनील कांबळे
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू नये व सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट वार्षिक 21 हजारावरून साठ हजारापर्यंत करण्यासाठी तसेच लाभार्थ्याला मिळणारे अनुदान दुप्पट मिळवून देण्यासाठी आता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मी विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित करून शासनाकडून मंजूर करून घेईल. असे आश्वासन आमदार सुनील कांबळे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिले
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमर्फत सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील उत्पन्न दाखला सादर केल्या नंतरच माहे जूलै २०२२ पासून अनुदान दिले जाणार उत्पन्नाचा दाखला दिला नाही तर सदरचा लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहणार नाही म्हणून सदर लाभार्थ्यांसाठी तहसिलदार पुणे शहर व तहसिलदार संजय गांधी योजना या कार्यालयांने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री सुनील कांबळे साहेब यांच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन केले यावेळी २८० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले.
२१४-पुणे कॅन्टोमेट मतदार संघातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मिळावा म्हणून दि.२७/०७/२०२२ रोजी महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक विदयालय
ढोले पाटील रोड रुबी हॉल शेजारी, पुणे या ठिकाणी सकाळी
११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिबीराचे आयोजन केले होते सदर शिबिरासाठी तहसीलदार पुणे शहर व तहसीलदार पुणे शहर संजय गांधी योजना यांनी सहकार्य केले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहर संजय गांधी तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास तसेच मतदार संघातील पदाधिकारी महेश पुंडे, सुशांत निगडे, श्रीराम चौधरी, सुरेश माने, उमेश गायकवाड, निलेश मंत्री, जयप्रकाश पुरोहित, बाळासाहेब घोडके, रामचंद्र देवर, सुरेश धनगर, स्वाती धनगर, चंद्रकांत कांबळे, प्रनोती सोनवणे, आशिष सुर्वे, विशाल कोंडे, गणेश यादव, दिनेश नायकु, सुरेखा कांबळे, ज्ञानेश्वर कोठावळे, रुपेश खिलारे, आशिष जाणजोत, रफिक शेख, राजू नायकोडे व कार्यकर्ते उपस्थित होते