Pune Congress : भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता : रमेश बागवे

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता : रमेश बागवे

पुणे  काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा 

      पुणे :   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा संत कबीर चौक, नाना पेठ ते महात्मा फुले स्मारक, गंज पेठ, पुणे पर्यंत काढण्यात आली व आंदोलन करण्यात आले.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची शुद्ध फसवणूक केलेली आहे. पेट्रोल-डीजेलच्या भाववाढी बरोबरच दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीने सुध्दा आकाशाला गवसणी घातलेली आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. भाजपने पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे भाजप, खोटे बोलणारा पक्ष म्हणजे भाजप असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. भाजपच्या नगरसेवकांनी अनावश्यक ठिकाणी खोदकाम करून टक्केवारी व ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. याचा कळस म्हणजे टेंडर न काढता बिल काढण्याचे पाप भाजपने केलेले आहे. यांच्या कथनी आणि करनीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. मोदींनी देशातील जनतेला ज्याप्रकारे जुमलेबाजी करून फसविले तसाच नेमका प्रकार पुण्यात देखील भाजपची मंडळी करत आहे. एकीकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठेवतात तर दुसरीकडे त्या कार्यक्रमाच्या होर्डिंग्ज मधून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला गायब करतात. महामानवांपेक्षा यांच्यासाठी यांचे नेते मोठे झाले आहेत. आज भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे.’’

     यावेळी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून या अनियंत्रीत महागाई विरोधात लढत आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून देशाची अर्थव्‍यवस्था उध्दवस्त केली आहे. जे सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्यांनी त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.’’

     याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला अध्यक्षा सोनाली मारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     या जनजागरण पदयात्रेत केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.

     या जनजागरण पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे, आबा बागुल, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता पवार, भीमराव पाटोळे, अनिल सोंडकर, उस्मान तांबोळी, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेविड, वाल्मिक जगताप, सुनिल पंडित, मुख्तार शेख, अशोक जैन, बाबा धुमाळ, मुन्नाभाई शेख, अरूण वाघमारे, रमेश सकट, सुनील घाडगे, प्रवीण करपे, सतीश पवार, प्रदिप परदेशी, शिलार रतनगिरी, सुजित यादव, जयकुमार ठोंबरे, जावेद निलगर, नंदू मोझे, रजनी त्रिभुवन, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, मंजूर शेख, विठ्ठल गायकवाड, विजय मोहिते, दिपक ओव्‍हाळ, छाया जाधव, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन

: तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

पुणे : १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री  अमित शहा येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले. परंतु या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही. त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत.  त्यामुळे कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पार्टीतर्फे महापुरुषांचा फोटो न लावणाऱ्या  भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला. शिवाय आंदोलन देखील करण्यात आले. मात्र त्याच वेळी आपल्या भाषणातून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील जुने दाखले देत विरोधी पक्षाची बोलती बंद केली. विशेष म्हणजे या बाबत निषेधाची तहकुबी देण्याचा राष्ट्रवादी चा प्रयत्न फसलेला दिसून आला.

: करणी आणि कथनी यात फरक – प्रशांत जगताप

शुक्रवार ची सभा सुरु झाल्याबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या या विषयावरून आंदोलनाला सुरुवात केली.   यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी भाजपला या प्रकारा बाबत माफी मागण्यास सांगितले.  जगताप म्हणाले कि, “या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे . भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मते  मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो”.

: आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी – गणेश बिडकर

या विषयावरून गणेश बिडकर आपल्या भाषणात म्हणाले, महानगरपालिकेने वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा प्रयत्न केले नाहीत. केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण केले. अनेक वर्षे हातात सत्ता असतानाही आपल्याला जे जमले नाही ते भारतीय जनता पक्षाने करून दाखविले. याचे दुःख असल्याने हा खटाटोप सुरू आहे. या दोन्ही महपुरूषांचे पुतळे पालिकेत बसत असल्याने हा पालिकेच्या इतिहासातील सुवर्णदिवस आहे.

Kanhaiya Kumar : ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेस मध्ये या : काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचे आवाहन 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेस मध्ये या

: काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचे आवाहन

पुणे : काँग्रेस चे चरित्र या देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक रंगाची फुले फुलवण्याचा विचार आहे हा. या देशात अतिवाद चालत नाही. सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेस मध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नेतृत्व तोच पक्ष करेल ज्याला देश समजेल. ज्यांनी रेल्वे नाही बनवली, ज्यांनी बीएसएनएल नाही बनवले ते एका सेकंदात या कंपन्या विकणारच. ज्यांनी बनवले तेच या कंपन्या वाचवणार. एक बडबोला माणूस अर्ध्या रात्री ऊठून बोलेल तर देश वाचणार नाही तर विकणारच. गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा, असं कन्हैया कुमार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी केला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाचा समारोप कन्हैयाकुमार यांच्या प्रमुख ऊपस्थितीत गुरूवारी सायंकाळी काँग्रेस भवनच्या आवारात लोकशाही बचाव सभेने झाला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शहराध्यक्ष रमेश बागवे, सप्ताहाचे संयोजक प्रदेश ऊपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर ऊपस्थित होते.

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्वागत केले. मोहन जोशी यांनी प्रास्तविकात भाजपावर टीका करत जनतेचा आता मोदींवरचा विश्वास ऊडत चालला असल्याचे सांगितले. सभेच्या सुरूवातीला हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले तिन्ही सेनादलांचे प्रमूख जनरल बिपिन रावत व अन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Service-Duty-Sacrifice Week : शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता : मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता

: मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

: सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात १९७१ च्या युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान

पुणे : “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळला. बांगलादेश मुक्ती संग्रामात इंदिराजींचे आणि माणिक शॉ यांच्या नेतृत्वातील भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे. देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा निर्णय घेत इंदिराजींनी भारताला प्रगतीपथावर नेतानाच शत्रू राष्ट्राला भारताकडे वाकड्या नजरेने बघू नका, असा इशारा दिला. स्वतंत्र भारताला मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात इंदिरा गांधी आणि भारतीय सैन्याचे अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. इंदिराजींना खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ अशी उपमा दिली होती, ही आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर सैनिकांचा, वीरमाता व वीरपत्नींना सुवर्ण विजय महोत्सवानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश कमिटीचे वीरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक विनोद मथुरावाला, लता राजगुरू, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

सुनील केदार म्हणाले, “इतिहास नीटपणे माहित असेल, तर उज्ज्वल भविष्याचा प्रवास चांगला होतो. अनेक शूर-वीरांच्या बलिदानातून, योगदानातून हा स्वतंत्र भारत देश सक्षमपणे प्रगतीपथावर चालत आहे. मात्र, आजच्या पिढीतील अनेकांना स्वातंत्र्य लढ्याचे महत्व समजत नाही. त्यामुळे शूर-वीरांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला नीटपणे सांगण्याची आवश्यकता आहे. सैन्यातील लोकांसोबत बोलताना सुद्धा स्फूर्ती चढते. देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखली पाहिजे. इतिहास समजून घेत, शूर-वीरांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्यासह पाकिस्तान, चीन यांच्यासोबत झालेल्या युद्धांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “युद्धातील वीर जवान, बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय सैन्याच्या १९७१ मधील या शौर्याचा स्वर्ण विजय महोत्सव आपण साजरा करतो.” कर्नल साळुंखे, कर्नल पाटील यांनीही आपले अनुभव सांगितले. लेखा नायर यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य पुरंदरे आभार मानले.
——————-
या वीरांचा झाला सन्मान

१९७१ च्या युद्धातील योगदानाबद्दल कर्नल सदानंद साळुंके, शहीद मेजर दडकर यांच्या वीरपत्नी गीता दडकर, कर्नल संभाजी पाटील, लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे, सुभेदार संपत कोंडे, वायुदलातील रामचंद्र शेंडगे, विठ्ठल बाठे, शहीद हवालदार प्रल्हाद दिघे (वीरपत्नी लक्ष्मीबाई दिघे), शहीद लक्ष्मण जाधव, शहीद तुळशीराम साळुंके (वीरपत्नी मंगलाताई साळुंके), शहीद मारुती माने (वीरपत्नी श्रीमती माने), गोविंद मासाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच शहीद सौरभ फराटे (वीरमाता मंगल फराटे), शहीद शिवाजी भोईटे (स्वप्ना भोईटे), मेजर लेखा नायर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Ghanshyam Nimhan : Blood donation Camp : कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद  : सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम 

Categories
Political पुणे

कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

: सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम

पुणे : रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे,  भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा श्रीमती सोनियाजी गांधी व मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य या कार्यक्रमा अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या निमित्त आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक  घनश्याम निम्हण यांनी केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ७६ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळेस रक्तदात्यांना हेल्मेट व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

: सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, शिवाजीनगर मतदार संघातील, जेष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, पुणेशहर ओबीसी सेल अध्यक्ष  प्रशांत सुरसे, राजु नाणेकर, द स पोळेकर, दिपक ओव्हाळ, आशिष गुंजाळ, राहुल वंजारी, राजेंद्र शिरसाठ, संदिप मोकाटे, राजु साठे, राजाभाऊ कदम, सुमित डांगी, अविनाश बहिरट, सुरेश नांगरे, फैयाज शेख, मुख्तार शेख, संजय मोरे, .संदिप मोरे, जीवन चाकणकर, दत्ता जाधव, चंद्रशेखर कपोते तसेच बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.विठ्ठल आरूडे, मा.विजय सरोदे, मा.विनोद रणपिसे, मा.अनिल कांबळे, मा.प्रशांत टेके, मा.इंद्रजित भालेराव, मा.मैनुद्दीन अत्तार, माजी नगरसेवक मा.नंदलाल धिवार, सोशल मिडीया अध्यक्ष मा.मयुरेश गायकवाड, अल्पसंख्याक सेल विभाग काँग्रेस कमिटी बोपोडी अध्यक्ष मा.साजिद शेख, व मागासवर्ग पुणेशहर अध्यक्षा सौ सुंदरताई ओव्हाळ, बोपोडी ब्लाॅक काँग्रेस प्रभाग क्रमांक ८ च्या अध्यक्षा सौ शोभाताई आरूडे, सौ अक्तरी शेख भाभी, सौ पपिताताई सोनवणे, पुणेशहर सेवादल काँग्रेस कमिटी संघटीका सौ नीता कदम, सौ नाणेकर ताई, सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर, नागरीक, कार्येकर्ते व बंधु भगिनीनचे अभिनंदन व आभार आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक घनश्याम निम्हण यांनी मानले.

Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

 राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले 

: कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप

पुणे : गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या ५८ कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. मात्र राष्ट्रवादीने ऐन वेळेला पलटी खात भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असा आरोप कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे. 

: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे

बागवे पुढे म्हणाले,  मुख्य सभेमध्ये सत्ताधारी भाजपाने उपसूचना देवून समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यामध्ये समावेश केला. हा विषय मंजूरीसाठी आल्यावर काँग्रेसच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करीत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर प्रस्ताव महानगरपालिकेच्या अहिताचा आहे आणि पुणे शहरावर आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाची पुणे शहराला गरज नसताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरावर आर्थिक भार लादणारा हा प्रस्ताव आहे आणि स्मार्ट सिटीने काढलेल्या निविदांची देखभाल दुरूस्ती पुणे मनपाने करावी असा हा पहिल्याच प्रकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका अनेक सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. काँग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये काँग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले.‌ या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले. या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून अनेक प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील.

  बागवे म्हणाले, महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले.

Farmers Law:  किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार : पूर्व विधायक मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र शेती हिंदी खबरे

 किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार

-पूर्व विधायक मोहन जोशी

 पुणे: पूर्व विधायक और प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी ने कहा कि किसान विरोधी कानूनों को रद्द करना किसानों के शांतिपूर्ण संघर्ष की जीत और प्रधानमंत्री मोदी के अहंकार की हार है.
 राष्ट्रपिता महात्मा गांधी की भावना में और उनके शांतिपूर्ण तरीके से, देश के किसानों ने मोदी सरकार के कृषि कानून के खिलाफ लंबी और कड़ी लड़ाई लड़ी. सांसद राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ने भी इस लड़ाई का पूरा समर्थन किया. महाराष्ट्र में बंद कर दिया.  कृषि कानून के खिलाफ हस्ताक्षर का अभियान चलाया गया. किसानों और शहर के कई नागरिकों ने बंद और हस्ताक्षर अभियान का अनायास ही प्रतिक्रिया दी.   उन्होंने कहा, “इस तरह तरह-तरह के किसानों का पक्ष लेकर इसने लोगों में एक प्रतिक्रिया पैदा की है और फिर केंद्र सरकार को किसान विरोधी कानूनों को लागू करने की कोशिश कर रहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अहंकार को झुकना और हराना है. ऐसा मोहन जोशी ने पत्र में कहा.
 इस आंदोलन के दौरान कई किसान मारे गए.  आज उन किसानों के बलिदान को याद किया जाता है. किसानों के आंदोलन को दबाने के लिए पुलिस बल का प्रयोग किया गया.   बीजेपी के केंद्रीय मंत्री मिश्रा के बेटे ने प्रदर्शन कर रहे किसानों को कुचल दिया और उनकी हत्या कर दी.  सरकारी दमन के विरोध में किसानों ने शांतिपूर्ण विरोध जारी रखा. अंतत: उनके संघर्ष की जीत हुई. यह एक ऐसी घटना है जिसे देश में किसान आंदोलन के इतिहास में नोट किया जाना चाहिए, ऐसा भी मोहन जोशी ने कहा.

Childrens Day : Sachin Aadekar : बालदिनाचे औचित्य साधत नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

Categories
Political पुणे

बालदिनाचे औचित्य साधत नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

पुणे : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साज-या केल्या जाणा-या बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच प्रभागातील कै.सुभाष तात्या तोंडे आणि कै.मारुती नाना निकम यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील ठोसरपागा स्मशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

बालदिनाचे महत्व आणि पं. नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन लहान मुले आणि मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहानमुलांना गुलाबाचे फुल आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच आकाशामध्ये फुगे सोडून मुलांनी शांतीचा संदेश दिला.

पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष सोनाली मारणे, माजी नगरसेविका नीता परदेशी, पं. जवाहरलाल नेहरु स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, साहिल केदारी, राष्ट्रवादी चे प्रभाग अध्यक्ष मच्छिंद्र उत्तेकर, शिवसेनेचे अनंत घरत उपस्थित होते. श्रीमती स्मिता सुभाष तोंडे आणि श्रीमती कमल मारुती निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभाग क्र. २९ मधील जेष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

PMRDA Election : Prashant Jagtap : शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली  : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. त्याबद्दल, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नगरसेवक व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चितच आमचा उत्साह दुणावणारा आहे. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. अशी खंत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री आदरणीय सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते, शहरप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेली ही ‘पीएमआरडीए’ नियोजन समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचे निश्चित होते. त्यामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा करू नये, अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आम्हीही आग्रही विनंती करीत होतो. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले आहेत.

आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही.

 

Bharat surana : कॉंग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी : भरत सुराणा यांच्या तर्फे उपक्रमाचे आयोजन

Categories
cultural Political पुणे

कॉंग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी

: भरत सुराणा यांच्या तर्फे उपक्रमाचे आयोजन

पुणे : करोना काळात घरो घरी जाऊन पत्र व पार्सल देण्याची सेवा देत पोस्टमन यांनी करोना योद्धा म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे प्रभाग  क्रमांक  28 मधिल  “पोस्टमन काका” यांना काँग्रेस महिलांकडून औक्षण  करून  “भाऊबीज” अनोख्या पद्धतीने  साजरी करण्यात आली. यावेळी पोस्टमन यांनी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात दिवाळी निमित्त सर्वान साठी फराळ कार्यक्रम  आयोजित  करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या

या कार्यक्रमाचे आयोजन  पुणे शहर  जिल्हा महिला काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस  योगिता  सुराणा  व काँग्रेस  कार्यकर्ता भरत सुराणा यानी  केले होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  रमेश बागवे ,महाराष्ट्र उपाध्यक्ष  मोहन  जोशी, महाराष्ट्र सरचिटणीस अभय छाजेड, चेतन अगरवाल कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सिलार रतनगिरी, सिमा महाडिक, रमेश सोनकांबळे,सचिन आडेकर,नितीन  जैन,रमेश जाधव  सर,अनुसया गायकवाड, रजिया बल्लारी, हलिमा शेख,अल्ताफ सौदागर,विश्वास  दिघे,भारत काळे, धर्म काब॔ळे, सुरेश चोधरी आदी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थितीत  होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगीलालजी सोळंकी  यांनी केले

 

कोरोना मधे पोलिसांचा, डॉक्टरांचा,सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला  परंतु घरोघरी जाऊन आपले महत्त्वाचे पत्र देण्याचे कर्तव्य आम्ही करत होतो  पोस्टमन म्हणून आम्ही केलेल्या कामाची दखल कोणी घेतली नाही   गेले दोन वर्षा पासून  भरत सुराणा, व योगिता सुराणा  हा उपक्रम करून आम्हाला देत असलेल्या भाऊबीज सन्माना मुळे आनंद होत आहे.

       – विनायक खेडेकर , पोस्टमन